Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक १५७.


१६९८ वैशाख शुद्ध ८.

श्रीसांब : सुपुत्रो विजयते.

राजा शाहूनरपति हर्षनीधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.
आज्ञापत्र राजश्री पंत प्रधान ता। रामजी कडूसकर सु।। सीत सबैन मया व अलफ. तुह्मीं पेशजी किल्ले घेतले आहेत. हालीहि जेथवर तुमचा हात पोहोंचेल तेथपर्यंत किल्ले हस्तगत करणें. किल्ल्याच्या बंदोबस्ताकरितां र्व फितुरी याजकडील मिलाफी कुल आहेत तीं हस्तगत करून, च्यार रुपये घ्यावयाकरितां राजश्री लक्ष्मण आपाजी तुम्हास लिहितील त्याप्रों करणें.

जाणिजे. छ ७ रबिलावल. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)
--------------------------------------------------------------------------

श्री.

१६९८ वैशाख शुद्ध १०.

पुरवणी राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यासी :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. अपटणाचे तहाचें पत्र बंगाल्यास पावोन त्याचा जाब येई तोपर्यंत मुंबईवाले लडाई करतील असा रंग दिसत नाहीं. परंतु केली गोष्ट आपली सिद्ध होत्ये, ह्मणोन हर्षित आहेत. बारभाईचे दोष: इंग्रेजी च्यार जहाजें धरून नेलीं व वाट अद्यापि सुरळित चालत नाहीं व भडोचेजवळ तीन लक्षाचा मुलूक देऊं केला तो अद्याप नेमून देत नाहीं. ऐवज मसलतीस खर्च जाहला त्याचे ठिकाण नाहीं व हंगामा मिटावा सबब तह केला तो हंगामा मिटत नाहीं, अधिकच होतो. कोपरगांचा तह बंदीखान्यादाखल. त्यास श्रीमंत राजी नाहींत. सखारामपंत व नाना फडणीस या दोघांनीं मात्र तह केला. परंतु शिंदे, होळकर, भोंसले वगैरे सरदार व मोरोबा वगैरे मुछदी राजी नाहींत. सदोबाचें बंड उभें राहिलें आहे. असा चहूंकडून हंगामा भारी दिसतो. त्यास, श्रीमंतास पुण्यास राज्यावर बसविल्यास राज्याच्या आळा बसोन राज्य चालेल. हंगामा दूर होईल. याप्रमाणें बंगालेवाल्यास पत्रें तयार होत आहेत ह्मणून लिहिलें तें कळलें. उत्तम आहे. मसलतीचा भार त्यांजवरी, तेव्हां त्यांचीं साधनें त्यांस सुचतील तीं करावीं, हें उचित असे.

पंधरा दिवसांत बंगालेवाले याचें कृत्य काय आहे तें कळेल. जर कुमक करून पुण्यास न्यावयाचा करार केला आहे त्याप्रमाणें केल्यास उत्तम जाहलें. कदाचित अपटणानें तह केला हाच खरा ह्मटल्यास तूर्त अमदाबाद हातास आली म्हणजे मोठा आश्रा आहे. अमदाबादेस राहिल्यानें पुढें मसलत होईल ह्मणोन लिहिलें. सारे मसलतीचे अर्थ तुह्मी लिहितां तें खरे व येथेंहि सुचतात. परंतु एक ऐवजाची तोड पडत नाहीं. त्यामुळें कांहींच घडत नाहीं. पोटास तों पाहिजे. कलम १.

अमदाबाद हस्तगत होईल. परंतु अमीनखानाचे हातास आल्यास ते आप्पाजी गणेशास बरे म्हणवितील. त्यास, श्रीमंत रायास समागमें फौज देऊन, लांब लांब मजली करून अमीनखान व आपण एक होऊन अमदाबाद हस्तगत करावी. ही गोष्ट केल्यास घडेल म्हणोन लिहिले तें कळलें. परंतु फौजेचे जाणें ऐवजाखेरीज कसें होतें? सारे अर्थ चित्तांत आणून एक विलग, त्यामुळें राहिलें. कलम १.

इंग्रेजानें मसलत धरिली. हा मजकूर गोविंदराव गायकवाड यास लिहावां व त्याजकडे कोणी पाठवावा म्हणून लिहिलें. त्यास, तुमच्या लिहिल्याच्या पूर्वीच पत्रें व कारकून पाठविला आहे. कलम १.

कदाचित खासा स्वारीचें जाणें अमदाबादेकडे होतें तरी शहर हस्तगत लवकरच होतें. परंतु खासा स्वारी गेल्यास दोष फार म्हणून लिहिलें. त्यास, खरेंच आहे शहर सोडून गेलियानें पाठीवरी फितुरी येतील. कलम १.

इंग्रेजाच्या ह्मणण्यांत या उपरी अपटणानें तह केला तोच बंगालेवाले मंजुर करणार नाहींत. कैदेचा तह बंगालेवाल्याच्या मनास येणार नाहीं. पुण्यास न्यावयाचें पत्र पाठविलें आहे त्याची शरम त्यास येईल, म्हणून लिहिलें तें कळलें. कलम १.

गायकवाडाकडील ऐवज करनेलीकडून आला व येणें. त्याची पावती दिल्ही, त्याची नकल पेशजी पाठविली व हालींही नकल पाठविली असें पाहोन समजणें. त्यांतच त्याजकडोन ऐवज येणें तो पावतींतच समजावा. कलम १. जनराल गार्डन यास तुमचे लिहिल्याप्रमाणें पत्र पाठविलें आहे. कलम १.

एकूण कलमें सात. जाणिजे. छ ९ रबिलावल.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १५६.


१६९८ वैशाख शुद्ध ८.

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक बाजीराव गोविंद व विठ्ठल विश्राम कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना ता। छ ७ रबिलावल मु।। बेंकापूर स्वामीचे कृपेंकरून सुखरूप असों. विशेष. इकडून पत्रें, तुंगभद्रा दक्षणतीरींहून येक व उत्तरगिरीच्या मुकामांहून दोन वमुक्काम मजकुरींहून येक, येकूण चार जोड्या समागमें विनंतिपत्रें लिहिलीं, त्यांजवरून सविस्तर निवेदन जालेंच असेल. बंकापुरास मोर्चे लाविले ह्मणून लि।। होतें. त्यास बारा तोफा जोडून, मार तोफाचा बहुत करून, किल्ला जेर करून, काल खालीं करून घेतला. येथून कूच होऊन धारवाडास दाखल होऊन, मोर्चे लाऊन, दो रोजांत धारवाड घेऊन, मिरजपर्यंत येत आहों. अैसीयास, खासास्वारी तिकडून कूच होऊन पुढें दरमजल यावें. ह्मणजे इकडून हे फौज व महाराज करवीरकरवासी आपलें सूत्रांत आहेत त्यांची फौज, दाहा हजारपर्येंत आहे, येकत्र होऊन शत्रूचें पारपत्य सहजात होतें. अखेरीचे दिवस आले, याजकरितां जलदीकरून यावें. पुढें मसलत लांबली तरी, हे छावणीकरितां माघारा फिरतील. याजकरिता, विनंति लिहिली आहे. मोठया प्रेत्नेंकरून येवढ्या भारी सरंजामनसी नबाबास घेऊन आलों. आतां तिकडून विलंब जाहला तरी मग काय करावें ? यास्तव स्वामींनीं या समयांत अंगरेज जें मागतील तें कबूल करून समागमें घेऊन पुढें यावें. याणीं ह्मटल्याप्रमाणें अमलात आणिलें. याप्रों तिकडून जोरा व्हावा ह्मणजे कार्यसिद्धि जाहली. येथें तिकडील नाना प्रकारचीं वर्तमानें येतात. याजकरितां तेथील वर्तमान आह्मांस आठवे रोजीं कळे असें कासीद जोड्या चांगल्या निवडून बाध- मुदतीनें पोंहचत असें रा। करावे. म्हणजे वर्तमान परस्परें वरचेवर कळेल. नबाबानीं स्वामीस पत्र लिहिलें आहे तें पाठविलें आहे. स्वामीनींहि पत्र नबाबास बहुत संतोषाचें ल्याहावें. नबाबाचें लक्ष सर्व प्रकारें स्वामीपासीं आहे. स्वामीकडील वरचेवर वर्तमान कळत नाहीं, ह्मणून बहुत श्रमी होतात. याजकरितां वरचेवर पत्रें येत जावीं. स्वामींच्या आज्ञेवरून मुबलक पैका खर्च करून आले. तेव्हां, यासी संतोषाचीं पत्रें आल्यानें, बहुत संतोषीं होऊन कार्यास पडतील. नबाबांसी आह्मी करार-मदार करून दिल्हा आहे. त्याप्रों संनदा स्वामीच्या आल्या पाहिजेत. त्यास, तपसीलवार संनदा यावयाकरितां मार्ग दुर्गट. याजकरितां नवाबाचें नावें येक संनद कीं, बाजीराव याणीं तुह्मासी करारमदार करून दिल्हा आहे त्याप्रों सरकारांतून करार असे. पत्राचें संनद लेहून, आमच्या लखोट्यांत घालून, पाठवावी. याचें कारण आपण म्हणतील तरी येथील बोलण्यांत भाव आहे कीं, मसलतीस पैका तुम्हापासीं द्यावयास नाहीं आणि धणियाच्या सनदा आणून द्याव्या ह्मणून करार केला त्याही येत नाहीं. यांजकरितां लिहिलें असे. हीं पत्रें पावतांच स्वारी पुढें दरमजल यावी. हा योग घडला तर फारच उत्तम. कदाचित् विलंबाचा प्रकार असला तरी, तेथील मसलतीचा विचार कोणे प्रकारेचा तो पुरवणीपत्रीं तपसीलवार लेहून पाठवावा. स्वामीकडे पैका पाठवावा याविसीं नबाबासी बोललों. त्यास, पैकाही सोईसोईनें पाठवितील. सिंदे, होळकर, स्वामीच्या लक्षी आहेत, ह्मणोन येथें वर्तमान ऐकिलें. त्यास त्याजकडीलहि वर्तमान ल्याहावयाची आज्ञा केली पाहिजे. सारांश गोष्ट तिकडून यावयाची त्वरा जाहल्यानें इकडील श्रमाचें सार्थक आहे. याजकरितां विस्तारें विनंति लिहिली आहे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १५५.


१६९८ वैशाख शुद्ध ७.

राजश्री लक्ष्मण आपाजी यांसि :-
सबैन मया व अलफ. अपटणानें तह केला तो केवळ अयोग्य. अह्मांस परिच्छिन्न अमान्य. तेव्हां लढाईच सुरू राहिली. बारभाई सोनगडपावेतों आले. आह्मीं सुरतेचे पूर्वेस अश्विनीकुमाराजवळ असों. आंग्रेज माघारे आले ते गांवांत (शहरां) राहिले. कदाचित लढाईच परडली तरी इंग्रेजाची कुमक येईल, हा भरवसा नाहीं. बहुधा येणारच नाहीं. त्यांत करनेल नित्य रुष्ट, याजमुळें अगदींच भरवसा नाहीं. तोंडानें देखील गोड बोलत नाहीं. असो ! जे मसलत प्राप्त होईल तसें करूं. तुह्मी येविसीं जनराल-कोशलास सांगोन आमची कुमक करीत, असा हुकूम पाठवावा. आह्मी त्यांजवर चढोन जात नाहीं. तेच चढोन आले तरी मात्र कुमक करीत, इतकाच पुरे. त्याचा हुकुम आला ह्मणजे झक मारीत येतील. असो ! तुह्मी पुसाल. होईल तरी कराल. न ऐकत तरी उपाय काय ? शहरांत जावें तरी फौज उठोन जाईल. मग, बंगालियाचा हुकूम आला तरी केवळ आंगरेजाच्यांनींच काय होणार ? यास्तव बाहेर राहिला. जाणिजे छ. ६ रबिलावल, बृहस्पतिवार.

(लेखनावधि:)

लेखांक १५४.

१६९८ वैशाख शुद्ध ६.

वर्ष सहा महिने गुतरातेवरच तह पडला तरी कबूल करावा लागेल. तेव्हां, इंग्रेजांकडील पा। माघारे द्यावे ऐसा तह आपटणानें ठराविला आहेच. त्याप्रों सारे पा। आमच हवालीं करावे. परगणेयाची स्मरणानें नांवनिसी नेहमी दिल्हे होते.: -
१    उर्पाड
१    जंबुसर
१    आमोद मागाहून मेस्तर शाहानें करून घेतले.
१    आंकलेश्वराचे दरसाल उकते पाहण लक्ष द्यावें.
----


आपटणाचे तहाप्रों हेहि माहाल आह्माकडे येतील. कदाचित् भीड पडलीच तर थोडीबहुत रदबदली आह्मांस ऐकावी लागेल. परंतु आमची मर्जी नर्मदातीरी बहुत. यास्तव हसोट अंकलेश्वर हे तरी घेणें प्राप्त आहे. जंबूसर मातबर, सबब द्यावें लागेल. कदाचित आमोद मात्र आपले रजावंदीनें त्याजकडे ठेऊं. उर्पाड तीही लक्षांचे, आमोद लक्षाचे बेरजेचे अजमासें लि।। आहे. येविसीची तोडजोड कसें बोलावें, त्याचा विचार आपले जागाच दोन दिवस करून, गणदोष मनन करून बोलणें. हा कागद अद्यापि येथें कोणासही जाहीर नाहीं तेथेंही जाहीर नच व्हावा. मेस्तर शाहा पुर्ता ममतेंत असल्यास, त्यास विचार पुसावा. बापू सारस्वत योग्य असीलियास बोलणें. नाहीं तरी जनरालासीच एकांतीं बोलणें. परंतु त्यासहि लोभ असेलच. तेव्हां बोलणें सख्तच पडेल. लोभापुढें वाजवी गैरवाजवी समजत नाहीं. त्याजपासूनच आह्मास काम घेणें. तरी त्याचाच लोभ तोडावा हें त्यास कसें गोड वाटेल ? यास्तव प्रसंग पाहोन बोलावें. परंतु केवळ पोकळ सोडूं नयें. आपटणानेंच त्याचा लोभ तोडला आहे. जर ते आह्मांस दौलतीवर बसवितील तर आह्मीं लिहून दिल्हें आहे, त्यापैकीं एक गांव माघारा घेत नाहीं. व आणिकही मर्जीस आल्यास थोडें बहुत देऊं. परंतु त्याचे कराराप्रों त्याच्यानें सेवटास न जाई, तेव्हां आमचा करार कोठें राहिला ? जवाहीर व पा। माघारें देणें त्यास वाजवीचे रुईनें प्राप्त आहे. वाजवी विचारतील तरी देतीलच. परंतु या कालांत वाजवी ह्मणजे जुलू ह्मणतात. तपशीलवार लिहिलें आहे. उत्तर तपशीलवार लिहिणें आणि बापू सारस्वत हजूर पाठवणें. कलम १

दरमहांत दिल्हे.

१    हसोट
१    आंकलेश्वरचे बाकी
१    बलसाड
१    भूतसर
----


सदरहू च्यार परगण्यांत आमचे केमावीसदार वाजबी असावे. त्यांणीं सालगुदस्ता जबरदस्तीनें ठेविले ते पा। सांप्रत आह्मांकडे देवावे. हसोटची सनद कारनेलींनीं लटकें बोलून दगाबाजीनें नेली आहे, ती सनद माघारी द्यावी. विश्वनाथ दुभाषा व नारो गोपाळ व भालेराव त्रिवर्ग मध्यें होते. विश्वनाथ, नारो गोपाळ याचे हवालींच केली होती कीं, फत्तेसिंगानें चाकरीस बराबर यावें. गोविंदराव याची तिजाई सरकारांत हवाली करावी व तिजाइेचे रुपये सोळा लक्ष साहासष्ट हजार द्यावे. तीनही कामें करावीं. ६०० दिल्ह्यावर हे सनद कारनेलीजवळ द्यावी. ऐसी बाशर्तीची दिल्ही असतां, विश्वनाथ व नारो गोपाळ यांणीं खुशामतीस्तव दिल्ही. ती कारनेलीनें मुंबईस पाठविली. यास्तव विश्वनाथ तेथें गेला आहे. त्यास पुसणें, रुबरु बोलवणें, आणि सनद माघारीं घेणें. आह्मास पा। घ्यावे लागतील यास्तव तेथेंच येव्हांच बोलावें. कलम १.

पा। व जवाहिराचे विषई मग बोलल्यास कसें ठीक पडेल ? हसोटचे वगैरे जाबसाल वाजवीचे येव्हांच बोलत जावें. ऐसें सुचलें तें लिहिलें असें. तुह्मीं तेथें प्रसंग पाहून बोलणें. केवळ येथील लिहिल्यावर च न जाणें. तुह्मीं येक्त्यारी, इतबारी, प्रामाणिक, शाहाणे ऐसे समजोन तुह्मांस पाठविलें. तुह्मावर जनरालाही कृपा करितात. व जनरालाही प्रामाणिक. यास्तव बोलावें. गैरवाजवीं बोलूं लागल्यास मग बोलूं नये. जसा प्रसंग देखावा तसें बोलावें. कलम १.

बापू सारस्वतास पाठवणें. कांहीं काम आहे. फिरोन पाहिजे तरी पाठवूं. कलम १.

येणेंप्रों कलमें लिहिलीं आहेत. उत्तरें पाठवणें. जाणिजे. छ ५ रोवल.

(लेखनावधि:)

श्रीशंकर.

लेखांक १५३.


१६९८ चैत्र वद्य १४.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. खासा स्वारी सुरतेस येऊन राहिली. लोकांचे शिबंदीचा गवगवा. मसलत सर्व प्रकारें बिघडली. सर्व संकटप्राप्त्या एक इंग्रजांचे प्रतिकूलतेमुळें जाली. परंतु याचे घरीं असरियास येऊन राहिल्यानीं दुसरियाचा उपद्रव लागों देणार नाहीं व राहूं तोंपर्यंत जा ह्मणणार नाहीं, ऐसी खातरजमा पक्की होती. यामुळें वीस बेवीस रोज येथें गुजरले. वरचेवर तुह्मांस व जनरालांस पत्रें लिहीत गेलों. अपटणशंसहि दोन पत्रें लिहिलीं. कांहीं तरी सोय निघेल. जनरालांनीं अंग्रेज केला आहे. त्याची काळजी त्यांसच असावी. आजपर्यंत ज्याचा हात इंग्रजांनी धरिला तो सोडला नाहीं. ऐसा यांचा लौकिक ऐकत आलों ऐसें असतां, सांप्रत आह्मांस पटकी बसविली. केवळ विश्वासघात, मोठे दगाबाजहि बेइमानी होत गेले, त्यांच्यानेंहि कोणाचा जाला नसेल ऐसा, जाला आहे. त्यांचें विस्तर कोठवर ल्याहावें ! असो ! एथें दम खाऊन शिबंदीचा गवगवा वारावा, लोकांचे हातून मुक्त व्हावें, तोडजोड पडेल तैसी पाडावी, दुसरे कोठें गेलियास परिणाम नाहीं, ऐसें जाणून लाचारीस आजपर्यंत मुक्काम करून राहिलों. मुंबईस यावें अथवा भडोच सुरत येथें राहावें, तरी शिबंदीनें प्राणाशीं गांठ घातली आहे. यांचे हातून उलगडा जाला म्हणजे मग जो विचार करणें तो करावा. ऐसें असतां, काल छ २७ सफरीं मेस्र गंभीर कारनेल किटीण यांनीं येऊन साफच सांगितलें कीं, इतके दिवस तुह्मी येथें राहिलां, त्यास शहरा-आसपास तसदी फौजेची लागती, फडके वगैरे फौजा तुह्मांवर येणार, आह्मांस कुमक होणार नाहीं, व फौजसुद्धां तुह्मांस ठेऊन घेतलें, याची बदलामीहि आह्मांवर येईल, यास्तव कूच करून जावें, हरकोठें दम खाऊन फौज जगवावी, बचाव जे रीतीनें होईल तैसा करावा, आमचें भरवसियांवर राहूं नये. शहरांत येत असाल तरी दोनशें माणसांनसीं यावें, महमुदीबागांत शहरांत जागा करून देऊं, जाजती लोक आंत घेणार नाहीं. ऐसें तुटकेंच बोलिलें. इतके दिवस मसलतीची उमेदच दाखवीत गेले. टेलरचें पत्र आलें, यांत कांहीं बरें असेल असें ह्मणत होते. त्याचा जाबसाल परस्पर त्यांस जनरालाचा आला व तुह्मींही त्याचें बोलणियाचे भाव सुचवून लिहिलें. बंगालवाले जनरालांचे पत्र तरी आह्मांस पावलें नाहीं. परंतु अर्थ ध्यानांत आला. त्याजवरून केवळ संकटाचे दिवस प्राप्त जाले. तेव्हां फिरंगियाचें राजकारण, सुरतेंत त्याची कोठी आहे, त्याचे हातून दवणकरांसीं लागूं केलें. त्याणीं, येऊन राहावें, आमचे पेटयांत आलियास बाहेरील पेंच पडों देणार नाहीं, फौजसुद्धां बचाव करूं, पुढें गोव्याकडील जाबसाल आणून मसलत करणें तैसी होईल. इतका त्याचा आसरा धरून तूर्त प्राण रक्षावयाकरितां तेथें गेलों. परंतु सर्व भार इंग्रजांवर आहे. ज्या तरेनें आमची कुमक होय ते गोष्ट त्याणीं करावीं. त्यांचे घरींहून दुसरे जागा गेलों, ऐसें न समजावें. कालहरण मात्र केलें आहे. हे अर्थ जनरालासी बोलावे. जाणिजे. छ २७ सफर. तूर्त सुरतेंस आहों. कलकटेकरांचें पत्र पाठविलें आहे, त्याचा जाबसाल तुह्मांकडून आला ह्मणजे करणें तैसें केलें जाईल. छ मजकूर.

श्री.

लेखांक १५२.


१६९८ चैत्र वद्य ७.

अजम मेस्तर बाढम ईस्कोयेर कोशलदार बंदर सुरत दाम महबतहू :-
छ मलाज मुख लिसान दस्तगाहाय अतिजाद दोस्ताआन. आजीज्यानीब चिंतो विठ्ठल सलाम आंके. येथील खैरखुशी जाणून आपली खैरअफीयत कलमीं करीत जावी. दिगर. अजम उइलिम हारनबी जनराल यांस खत अदमीयासोबत पाठविलें आहे. त्यास, ज्याहाजावरून आदमीयाची रवानगी करून मुंबईस पोंहचत ऐसें करावें. व तिकडून जबाब घेऊन येईल त्यास ईजानेबानजीक पोंहचाऊन द्यावें. रो। छ २१ सफर. दराज काय लिहिणें ? हे किताबत.

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १५१.


१६९८ चैत्र वद्य ६.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. सरकारांत खर्चाची वोढ आहे, ही तुह्मांस समजूनच आहे, याविसीं जनरालासी बोलोन कांहीं तोड काढावी, म्हणून तुह्मांस वारंवार लिहिलेंच आहे व तुम्हीहि बोलतच असाल अपटणानें तह केला, त्यांत तीन लक्ष सालिना खर्चास देऊन कोपरगांवीं राहावें ऐसें ठरविलें. त्यास, कोपरगांवीं रहाणें कसें घडतें हा मजकूर विस्तारें पेशजी ऐक दोन पत्रीं लिहिला. कोपिनीच्या स्थलांत राहूं. येथें सदरहू ऐवज जनरालांनीं अपटणास लिहून फितुरि याजकडून आपण घेऊन आमचा खर्च चालवावा. ह्मणून एक दोन पत्रीं लिहिलें होतें. त्याजवरून जनरालाजवळ बोललां. त्यांणीं आपटणास लिहिलें. त्याचा जाब जनरालास आला कीं, कोपीनीच्या स्थलांत राहून खर्चास द्यावयास अनकूल पडणार नाहीं. याप्रों त्याचा जाब आला, ह्मणून जनरालानीं सांगितलें, ह्मणून लिहिलेंच. त्यास, याविसीं पेशजी तुह्मास लिहिलें असेल, त्यावरून तुह्मीं जनरालासी बोललां. परंतु आम्हासहि फितुरि याजकडून खर्चास घेऊन राहावें, हें योग्य नाहीं. खर्च चाला पाहिजे, हें संकट जनरालास. परंतु पदरचा खर्च करून चालववों हि हिंमत न होय. तरी आमचेच ऐवज दोन-तीन आहेत ते दाखवावे. एक, सा लक्षाचें जवाहीर गाहाण आहे तें आपटणानें फितुरियांस द्यावें, ह्मणोन ठराविलें आहे. अपटण आमचे जवाहीर कोण देणार ? जनरालानीं अपटणास साफ ल्याहावें, ज्याणें आह्मापाशीं जवाहीर दिलें त्याचें त्याजवल आह्मीं देऊं, दुसऱ्यास देणार नाहीं, तुह्मी काय समजोन फितुरियास द्यावें ह्मणून ठरावितां, आम्हास दुसरेयास देतां नये, ज्याचें त्यास देऊं म्हणून आपटणास जनरालानीं ल्याहावें आणि आमचें जवाहीर आम्हांस द्यावें. म्हणजे सा लक्षाचे जवाहीर हरयेक जागा ठेवून, निदानीं तीन लक्ष रुपये मिळतील. हा येक ऐवज. दुसरा: कारनेल किटिंग यांणीं फत्तेसिंगाबाबत दहा लक्ष रुपये वसूल करून घेतले. त्यापैं॥ सरकारांत सा सवा सा लक्ष अजमासें दिल्हे आणि पावती दहाची घेतली. त्यापो बक्षीस लक्ष सवा लक्ष जाऊन बाकी वाजवी दोन अडीच लक्ष पावेतों निघतात. याचा तपसील तुम्हांस लिहिलाच आहे. हा ऐवज जनरालांनीं वाजवी आह्मांस देववावा. व मोगल सुरतकर याजकडे चौथाईचा ऐवज येणें. त्यास सालमजकुरीं पैसा आला नाहीं. मोगलाकडे चाळीस पन्नास हजार रुपये येणें. तो सुदामत देत नाहीं. त्यास गंभीरास जनरालांनीं ताकीद करून, सदरहु ऐवज देवावा. हे तीन ऐवज आमचे आह्मांस देवावे. पदरचें देणें यांत लाभत नाहीं. याप्रो जनरालाजवळ बोलोन, जवाहीर वगैरे लिहिल्याप्रों मागोन घ्यावें. आपटणाचें पत्र सरकारांत आलें. त्याचा जाब त्यास लिहिला आहे. तो त्यास जनारलाकडून पावता करावा. त्याच्या मसुद्याची नकल पाठविली आहे. तात्पर्य, बहुत नरम लिहिलें आहे. याचें कारण आमची कुमक इंग्रेजांनीं सोडिली व त्यांजवळून मोंगल तहवरजंग गेला तो आमच्याच सूत्रानें गेला. पुढें दो ती महिन्यांनीं आम्हास उपयोगी पडेल. हालीं उभयतां आंगजोरच आहों. त्यांत फितुरयाची फौज फार सडली. महागाई. वैरण मिळत नाहीं. घोडीं माणसें उपासी मरतात. लोकांस रोजमरा सा सात महिने नाहीं. सबब फौज उटोन जात आहे. तीजमध्यें कुवत नाहीं. याप्रमाणें तिकडील हैराणगत तूर्त आहे. पुढें जमतील. हालीं त्यांची आपली बरोबरी आहे. सबब लढावयाचा विचार ठराविला आहे. सरकारचे फौजेचा लडावयाचा दम भारी आहे. व येथें सुरतेस सरंजाम पाहिजे तो मिळतो. दारूगोळा, सिसें व सिबंदी गाडद मिळते. लोकांतही दम मोठा. यास्तव लडाईची तर्तूद करीत आहों. या दिवसांत गाठल्यास मनसबा ठीक पडतो. पुढें ते भारी होतील. सबब आह्मींहि बलकटीच आंतून करितों. त्यांस न समजावें, समजल्यास सावध होतील. यास्तव नरम जाब आपटण यास लिहिला आहे. लडाई आठ पंधरा दिवसांत व्हावी, ऐसें आहे. गोविंदराव वगैरे बोलाविले आहेत. तेहि इतक्यांत येतील. लडावयाचा केवल निश्चय नाहीं. बनल्यासारिखें होईल. तुह्मी सुरत, मुंबई, भडोच या तीनही स्थलांतून हरयेक मर्जीस पडेल तेथेंच राहूं. तेथें खर्च चालला पाहिजे. तो जनराल देतीलच. परंतु जनरालावरही संकट न पडतां आपला ऐवज त्याणीं उगऊन दिल्यास त्याचे हातीं आहे. येणेंकरून त्यास संकट नाहीं, व आमचो काम समजोन प्रसंगानुरूप बोलणें. जाणिजे. छ २० सफर.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १५०.


१६९८ चैत्र वद्य ६.

राजश्री लक्षुमण आपाजी गोसावी यासि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. कारनेल आपटण याणीं सरकारांत पत्र लिहिलें आहे त्याचा दर जबाब एक खुशकीच्या मागें रवाना केला असे व येक हालीं तुह्मांकडे पाठविला आहे. तरी तुह्मीं जनराल यांचे विद्यमानें मशारनिलेकडे रवाना करणें. अपटणास पत्र लिहिलें आहे त्याची नक्कल पाठविली आहे ही पाहून नजरालास सविस्तर अर्थ समजावणें. जाणिजे. छ २० सफर. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १४९.


१६९८ चैत्र वद्य ५.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यासि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. अपटणाचीं पत्रें सरकारांत करनेल कीटिंग यास हालीं आलीं. त्यांचा भाव पहिल्या लिहिण्यावर सक्तता असे. हालीं नरम भाव लिहिले आहेत जे, आपण तह केला याचा प्रकार कलकत्त्येवाले यांच्या हुकुमाप्रमाणें केलें असे. त्यास, आपणास तूर्त तुमची कुमक करू नये व बारभाईची कुमक करू नये. त्यास, तूर्त तुम्ही हरयेक कोणी मोगल अगर भोसले आपले कुमकेस आल्यास आणावे. यांत आमचा आग्रह नाहीं. आह्मांस विलायतेचा हुकूम आला म्हणजे आम्ही आपली कुमक करूं, विलायतेचा हुकूम, आपणच कुमक करावी, ह्मणून येईल, बारभाईंची कुमक करावी, असा येणारच नाहीं. आह्मीं बारभाईंची कुमक करणार नाहीं. तूर्तचा प्रकार जाहाला. त्यांत तूर्त इंग्रजी कुमक आहे, तो सरंजाम माघारा नेववावा, हें मात्र ठरविलें आहे. यांत आम्हांवर रोष नसावा. कलकत्त्याच्या हुकमावरून करावें लागलें. याप्र॥ हाली नरम-पणाचे लिहिणेयांत भाव आहेत. म्हणून करनेल यांनीं निवेदन केलें व सरकारांत पत्रही आलें. त्यास, करनेल तेथेंच जात आहे. याचा भाव तेथें तुम्हीं मनास आणावा. तेथील कोशलदार वगैरे इंग्रजांस समजला असेल. त्यास, तेथील शोध करून लिहून पाठविणें. छ १९ सफर. मंगळवार पंचमी, प्रात:कालच्या ६ घटिका दिवस.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १४८.


१६९८ चैत्र वद्य ५.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. धौशाचे विद्यमानें नबाब निजामअल्लीखांचें राजकारण आलें आहे. परंतु, जनरालाकडून खातरजमा प॥, त्याविसीं जनरालासीं तुह्मीं बोलिलेंत, त्यांनी उत्तर केलें तें सविस्तर लिहिलेंत तें समजलें. त्यास ये गोष्टीचा अर्जू धौशाची फार आहे कीं, जनरालाकडून पक्की खातरजमा असावी कीं, पक्ष करणें तरी श्रीमंताचाच करूं हे न घडे तरी फितुरीयांकडे कदापी होणार नाहीं. असें लिहिण्यांत यावें व कोणी आमचा विश्वासूक सुरतेस येईल त्याची तेथेंच खातरजमा व्हावी, असे भाव आहेत. त्यासी येविसीं जनरालांनीं धौशाचे नांवें पत्र पाठवावें कीं, श्रीमंतांचें वडिलांचें बोलणें ठरेल. त्याप्रों तुह्मी त्यांचे उपयोगीं पडावें, इकडील संशय कोणेविषयीं न धरावा, आह्मी पुरंदरकर यांचा पक्ष करणार नाहीं, कोणेहि औशीं त्यांची कुमक करणार नाहीं, खातरजमा असों देणें. म्हणून पत्र आह्माकडे पाठवावें, हा उत्तम पक्ष. हें न घडें तरी, याच अन्वयें आमचें तऱ्हीं नांवें पत्र पाठवावें कीं, धौशे व नबाब निजामअल्ली यांनीं तुची कुमक केलिया आम्हांस खुशी आहे. त्यांचे हाते आपण काम करून घ्यावें. पुरंदरकरांची आह्मीं कोणेही औंशीं करणार नाहीं, पत्र साफ यावें, आणि गंभीरास येक जनरालाचें यावें कीं, धौशे व निजामअल्ली यांकडील कोणी तुम्हांकडे भला माणूस आला तरी तुम्हीं खातरजमा करणे. पुरंदरकरांची कुमक जनराल व आह्मीं करणार नाहीं, फुरसत पडली तरी श्रीमंतांचीच कुमक करूं असें पत्र सुरतवरून यावें. ह्मणजें या कार्याचें साधन पक्कें. धौशाचें पत्र साफ आलें आहे. त्याची नकल करून पाठविली असे. तीच जनरालास वाचून दाखवावी. मजकूर ठेवावा. मुख्य पक्ष धौशास जनरालाचे तरजमेविसीं बिनकिलाफ यावें व गींरही लि॥पों यावें. जर धोशास पत्र देत, तरी आमचे तऱ्ही नांवें पत्र अन्वयें यावें. हें जलद करून पत्र धौशाचे मजकुराविसीं सरकारचें पत्र ह्मणून जनराल ह्मणत होते, असें लिहिल्यांत. त्याजवरून तुमचे लिहिले जनरालांस पत्र पाठविलें असे. हें त्यांस ऊन, धौशाचे खातरजमेचें पत्र लिहिल्याप्रमाणें जें येईल तें घेऊन सत्वर पाठवावे. जनरलांस पत्र लिहिलें आहे. त्याचा सोदा तुम्हांकडे पा।. असे. मजकूर त्याअन्वयें बोलणें. जाणिजे. छ. १९.

(लेखनावधि)