Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

कि॥ कलम सेत माहादजी पाटेल दि॥
वाटेकरी पिकले सेत हरजिनसी बिघे

५० मौजे कोणेगव्हाणे खासा
      माहादजी पा।
५० मौजे सीवडे बा। वाटेकरी
---------
१००

ए॥ बिघे एकसे पैकी बा। कोणेगव्हाणे
येथील पन्नास बिघे सटवोजी भोसलियानी
गुरे व सेरडे घालोन चारिले व बा। सिरवडे
बिघे पन्नास काही मालिस्त करून नेले
व काहीं गुराकडून चारिले ह्मणोन
माहादजी पा। याणी विदित केले यास
सटवोजी भोसले यास यास विचारिता
हृवदित केले की दहा वीस बिघे आपले
गुरानी खादले असेल ह्मणोन तकरीर केली
यासि निर्वाह केला की देशाधिकारी व
पारपत्यगार ता। मा।र यास आज्ञापत्र सादर
करावे की सटवोजी भोसले याणी
माहादजी पाटेलाचे सेत देखील वाटेकरी
सदर्हू सेभरा बिघियामधे चारिले किती
व मालिस्त करून नेले किती हे देसमुख
देसकुळकर्णी व मौजे मजकूरचे वतनदार
व भले लोक ग्वाही साक्ष असतील याला
सफतपूर्वक आळस व कोससि न करिता
बरे चौकस मनास आणोन गाहीसाक्षीने
सेभरा बिघियापैकी सटवोजी
भोसलियाकडे मोझ्या मुकाबलियाने
शाबीत होईल याची बेरीज जे हक्कहिसाबी
होईल ते तपसीलवार बखेर सिकियानसी
व ग्वाहीदाराचे साक्षीनसी साक्षपत्र हुजूर
पाठवणे सदर्हू कलमास ग्वाहीसाक्ष मनास
आणाल ते ऐसी मनास आणने की सदर्हू
कलमाचा निर्वाह होय आण बदलामी न
ये ऐसी परनिस्ट साक्ष मनास आणोन
हुजूर लिहिणे एकूण कलम १

कि॥ कलम माहादजी पा। याची पाचा
आकणीची माळिव्याचा आकणीचा
सोफा मौजे कोणेगव्हाणेचा सटवोजी
भोसलियाणे रात्रीचे येऊन जोरावारीने
मोडोन घेऊन गेले ह्मणोन माहादजी पा।
याणे विदित केले बिता॥

   तुळ्या                                  खांब
  ६ माळीच्या                          १८ माळी
१६ सोफा                               १२ सोफा
------                                   ------
२२                                       ३०

   कड्या                                  हसणी
३५ सोफा                              १८ माळी
६५ माळी                              २४ सोफा
-----                                   --------
१००                                     ४२

यासि निर्वाह देशाधिकारी व पारपत्यगार
ता। मा।र यास आज्ञापत्र ल्याहावे की
ज्या सुतारानी माहादजी पाटेलाचा सोफा
व माळी बाधली त्यास व ते समयी
जे भले लोक असतील त्यास हि व णो
असल त्याची हि साक्ष मनास आणोन
सफल घालोन ग्वाहीसाक्षीनसी व
मौजेमजकूरचे वतनदार याचे विदमाने बरे
चौकस आकस व कोसीस न करिता
परनिस्ट मनास आणोन साक्षपत्र व
सिकियानसी बखेर हुजूर पाठवणे सदर्हू
कलमास ग्वाहीसाक्ष मनास आणाल ते
ऐसी मनास आणने की सदर्हू कलमाचा
निर्वाह होय आण बदलामी नये ऐसी
परनिस्ट साक्ष मनास आणोन हुजून लिहिणे
ए॥ कलम १

 

                                                                                  लेखांक ११

                                                                                      श्री                                                  १६०६ माघ शुध्द ७

                                                                                                                                                                                                                       १/५
                                                                                                                                                                        पांच बंद रास

स्वस्ति श्रीराज्याभिशेक शके ११ रक्ताक्षीनामसंवत्सरे माघ शुध सप्‍तमी मदवासर सभा विदमान


                                                           11 1

 

 

कारणे जाला निवाडा ऐसा जे माहादजी पा। जगदळा कसबे मसूर ता। उबरज व सताजी पा। घाडगा मौजे सिवडे व मौजे वराडे ता। मा।र यामधे व सितोजी व सटवोजी भोसले यामधे कसबे मसूर व मौजे कोणेगव्हाण व मौजे सिरवडे व मौजे सिवडे व मौजे वराडे ता। मा।र या गावीची सितोजी व सटवोजी भोसले एही धामधूम करून सेतेभाते हिरोन घेतली व आणीक हि कितेक आवाडाव केली याच्या कलमाचे कलम राजश्री कविकलश छदोगामात्य व राजश्री सरकारकून एही सदरेस बैसोन निर्वाह केला बितपसील

१ हरीपंतनाना विभक्त जाल्यानंतर त्याणी कृत्यें केलीं
          १ चिरंजीव सौ सालीबाईचे लग्न वैशाख शके १७३८ धोंड दीक्षित वोक यांचे पुत्रास दिल्ही. लग्नांत हरीपंत भोपळे याचा कज्या मोठा जाला.
          १ श्रीमाहायात्रेस पुण्याहून निघोन सडे गेले मिति कार्तिकि शु।। ७ गुरुवार शके १७४४. कुटुंब व चिरंजीव बापू यांस पुणे मुक्कामीं ठेऊन गेले.
             तिरस्थळी यात्रा करून देशी घरीं आले मिति माघ वा। १ शके १७४५.
          १ पुढील थोरले चौकांत नवीन विहीर पाडावयास प्रारंभ केला मिति फालगून शु।। ११ शके १७४५. विहीर पाडल्यामुळें चौकाचा आव गेला.
             पाणी बारा हातावर लागलें.

१ गोविंदराव यांस पोटदुखीचा माहायात्रेस गेल्यापासून उपद्रव जाला. तेव्हांपासून औषधी उपाय बहुत केले परंतु गुणास आलें नाहीं सबब श्रावण वा। ११ शके १७४५ चे मित्तीस लक्ष्मणगीर सोट्याचे म्हसोबापाशी राहात होता त्यास आणून प्रकृतीची भावना सांगितली त्याणें तीन दिवसांत प्रकृती चांगली करून देतों या प्रों करार केला त्यावरून गोसावी मजकूर याणें उतारा करून मंत्रसामर्थ्ये करून पाण्यांत आंगारा दिल्हा त्याणे ढाळ मनस्वी जाहाले त्यामुळें प्रकृत ग्लान फार जाहाली स्मृती हि राहिली नाहीं. तदनंतर गोसावीमा। यास पुन्हा आणोन बहुत प्रकारें सामदानभेदेंकरून सांगून पुन्हा प्रकृत पूर्ववत् होती तशी तरी करून देणें याप्रमाणें सांगून भाद्रपद शु।। ५ शके मारीं पुन्हां उपचार ढाळ न होतां करणें म्हणोन बहुत प्रकारें सांगितलें असतां विडा करून मंत्र घालून दिल्हा त्याणें ढाळ जे झाले तें लिहितां पुर्वत नाहीं. या कृत्यास पांच पंचवीस रु।। खर्च हि केला. तेव्हांपासून शरीरीं नाना प्रकारच्या व्याधी नवीन उत्पन्न जाल्या ते दिवसापासून मांत्रीक उपाय हि बहुत केले व औषधी उपाय हि नानाप्रकारचे करीत आहों परंतु गुणस अद्यापपर्यंत आलें नाहीं भ्रांत पडली आहे.

१ गोविंदराव तात्या यांचे शरीरीं अकस्मात् श्रीरामेश्वर देवाचे दर्शनास गेले तेथें घेरी येऊन झोक जाऊन पडले आणि जिव्हास्तंभ वायू जाहाला मिति वैशाख शु।। ८ गुरुवार शके १७४६. तेव्हांपासून औषधी उपाय हि बहुत केले व देवऋषी हि बहुत पाहिले परंतु अद्यापवत् प्रकृती आहे तशी च आहे.

१ गोविंदरावतात्या यांची स्त्री सौ रमाबाई याणीं देवास नवस केले जे पुत्र आल्यावर देवदर्शनास घेऊन येऊ म्हणोन नवस केला होता; सबब नवस फेडावयास चिरंजीव निळकंठराव सौ सूनबाई व सौ रमाबाई यांस देवदर्शनास पाठविली मिति माघ शु। ७ बुधवार शके १७४६.-
              १ श्री योगेश्वरी जोगाईंचे आंबें
              १ श्रीतुळजापूर देवी
              १ श्रीपंढरपूर
              १ श्रीरवळनाथदेवास
              १ श्रीमाहालक्ष्मी कोल्हापूर
              १ श्रीखंडोबा जेजुरीचा
           -----
             ६

सदरहू साहा देवांस नवस केला होता त्याप्रो यात्रा करून घरीं सुखरूप येऊन पोहोचलीं मिति चैत्र शु।। १० मंगळवार शके १७४७.

१ नीलकंठराव याजवर बंडाचा आरोप आला होता मिति माघ वा। १० शके १७६० त्याची चौकशी बेलसाहेब बाहादूर याणी करून कांही शाबूद नाहीं म्हणोन सोडून दिल्हें मिति अधिकज्येष्ठ वद्य १४ सोमवार शके १७६१.

१ साठीशांती ज्येष्ठ वा। ६ शके १७६२ या रोजी केली रोज शनिवार.

१ गोविंदराव तात्या यांची प्रकृत बहुत बिघडली म्हणोन श्रीकृष्णातीरीं क्षेत्र माहुली येथे जाऊन चार दिवस राहून नंतर मार्गशीर्ष वा। ३० शके १७६७ विश्वावसु नामसंवत्सरे त्या रोजास समाधिस्थ जाले, चतुर्थाश्रम घेऊन जाले.

१ श्रीमंत बाजीरावसाहेब याचें व इंग्रज बहादूर यांचें वाकडे पडलें याचें कारण गंगाधरशास्त्री पटवर्धन गायकवाड यांजकडून वकिलीचीं बोलणीं बोलावयास इंग्रज बाहदर यांचे बाहदारीनें आले होते तेव्हां स्वारी क्षेत्र पंढरपूर येथें सरकारची गेली त्याबरोबर शास्त्री हि गेले ते तेथें प्रदक्षणेचे वाटेवर मारले गेले आषाढमास शके १७++.

त्याचा आरोप त्रिंबकजी डेंगळे याजकडे आला सबब डेंगळे यांस इंग्रज बहादुर यांचे हवालीं करून दिल्हा. पुढें त्रिंबकजी इंग्रजांचे कैदेतून पळोन गेला नंतर श्रीमंताची स्वारी फुलंगाव व आपटी जातानां रथांतून पडून हात दुखवला नंतर स्वारी पुण्यास आली मिति फालगुन शु।। १ शके १७३८. नंतर वैशाख वा। ८ गुरुवारीं शके १७३९ चे सालीं इंग्रजबहादुर याकडील अल्पेष्टीण साहेब याणीं शहराभोवती गिर्द बसऊन श्रीमंतास तंबी पोहचवून सरकारातून सदाशिव माणकेश्वर याचे विद्यमानें पहिले करारा प्रो किले तीन दरम्यान घेतले. नंतर अषाढ शु।। २ इंदुवारीं सरकारातून इंग्रजास मुलूख व किल्ले व ठाणीं व नर्मदाउत्तरतीर दरोबस्त सनदा मोर दीक्षित याचे विद्यमानें देऊन पहिले किल्ले व दरम्यान तीन दिल्हे होते ते माघारे घेऊन संदा दिल्ह्या. नंतर श्रीमंताची स्वारी पंढरपूरचे यात्रेस गेली आषाढमासीं तेथून परभारे माहुलीचे मुक्कामीं येऊन तेथें मलकण साहेब यांची भेट जोहाली. तेव्हांपासून फौज नवी ठेवावयास प्रारंभ करून फौजेचा जमाव करून भाद्रपद वा। १ स्वारी पुण्यास आली. नंतर आम्ही श्रीमंताचा निरोप घेऊन रेवणसिद्ध देवास गेलों मिति अश्वीन शु।। १५. नंतर मागें अकस्मात् अश्वीन वा। ११ बुधवारीं गारपीर बेटाची जागा खालीं करून देण्याबा। लढा पडला सबब बापू गोखले यांचे विचारें श्रीमंतांची स्वारी पर्वतीस जाऊन सर्व सरदार यांस निरोप देऊन इंग्रजाचे तोंडावर रवाना केलें; लढाई मोठी जाहाली मोर दीक्षित वगैरे मंडळी सरकारकामास आली बेट व गारपीरची छावणी जाळली इंग्रजाचा तसनस फार जाला हें वर्तमान आम्हीं मिरजेचे मुक्कामीं ऐकिलें त्यावरून तेथून निघोन पुण्यास यावयास हिर्वे मुक्कामीं आलों तेथें ऐकिलें कीं कार्तिक शु।।। ८ शके १७३९ चे सालीं सरकारची व इंग्रजाची लढाई मातबर तिसरे प्रहरापासून सूर्योदयपर्यंत होत होती तेव्हां श्रीमंत दोन प्रहर रात्रीस निघोनि गेले. मागें अल्पिष्टीन साहेब यांणीं पुण्यांत इंग्रजी झेंडे लाऊन अमल शहरांत बसविल सर्व रयतेस दिलदिलासा देऊन राज्य करूं लागले. हे वर्तमान पुण्यास माणसें पाठऊन आणविलें आणि आम्हीं मुलेंमाणसें भोरास पाठऊन दिली होतीं तेथें जाऊन सर्वांस भेटून पुढें मुलेंमाणसेंसुद्धां वांई मुक्कामास गेलों. श्रीमंत मजलदरमजल गेले मागें इंग्रजाची फौज लागली होती. स्वारीबरोबर हरीपंत नाना याणीं मेहनत फार केली व आम्ही हि श्रीमंतास भेटण्याकरितां वांई मुक्कामीहून गेलो. वाटेनें गांठ पडली पांच चार दिवस स्वारींत होतो. नंतर वाटेनें निभावणी न होय सबब माघारे चिरंजीव नानासुद्धा आलों, नंतर वांई मुक्कामीं अल्पेष्टीण साहेब यांची स्वारी आली तेव्हां भोर जाली. नंतर कांहीं दिवशीं पुण्यास घरीं आलों मिति आषाढ वा। १० शके १७४०. त्याजवर कांहीं दिवशीं अल्पिष्टीन साहेब याजकडे चिरंजीव हरीपंतनाना यास पाठविलें बरोबर बळवंतराव पोंक्षे देऊन रवाना केले. नंतर गोपाळराव रामचंद्र पटवर्धन याचे बाहेदारीने साहेबाची भेट घेतली. नंतर गोपाळराव यांचे विद्यमानें सरंजाम सोडून देण्याविशीं बहुत सांगितलें त्यावरून साहेब याणीं कबूल केलें कीं तुमचा बंदोबस्त करून देऊं म्हणोन खातरजमेनें सांगितले. नंतर साहेबानीं नानास बहुमानवस्त्रें व शिरपेच दिल्हा व बळवंतराव पोंक्षे यास बहुमानवस्त्रें दिल्हीं; नंतर पुण्यास निघोन आले. त्याजवर पुणें मक्कामीं साहेबाची भेट घेऊन पूर्वीचे संकेता प्रा। काम व्हावें तें जालें नाहीं. बडेसाहेब यांची स्वारी निघोन ममईस गेली नंतर मागें चापलीन साहेब याणीं उभयतास पेनशीन हजार हजार रु।। सालदरसाल द्यावे या प्रमाणें चकत्या करून दिल्या.

१ बाळा जामदार याणें पेशजीं शपथ दिल्ही कीं तुम्हांस अंतर देणार नाहीं या प्रों शफत दिल्ही असतां नानाकडे जाऊन राहिला मिति अश्वीन शु।। १२ शके १७३८ तेव्हांपासून जामदारीचें काम त्रिंबका शिंदा यास सांगितले.
१ वडिलोपार्जित वतने व इनाम गांव व घरें गावोगावीं आहेत तीं उभयतांची निमे निम

१ कसबे पैठण येथे
      १ कुलकर्णे नीम
      १ घर बंदिस्त
      २ खुल्या जागा
    ----
     ४

१ मौजे पंथेवाडी येथें
       १ श्रीदेवीचें देवालय
       १ विहिर
       १ कुळकर्ण दरोबस्त
    -----
      ३

१ मौजे जुवाठी ता। सौदळ
      १ मौजेंमा।र हा गांव इनाम पाच भावांस खोतीसुद्धा
      १ वाडा घर राहावयाचें
     ---
     २

१ कसबें राजापूर येथें वखार दुकानें
१ बाग उन्हाळें
१ बाग गिरे येथें
१ मौजे कोतवडें ता। रत्नागिरी येथें खाजण

१ मौजे घोटी पा। भोंसे येथे
      १ वाडी
      १ पागा
      १ मिराशी जमीन घेऊन विहिर नवीन पाडून बाग केला.
     ----
      ३

१ मौजे पाटेठाण ता। सांडस येथें
     १ शिवालय जीर्णोद्धार केला तें
     १ घर वाडा व पागा
    --
    २

१ मोजे गोवर्धन येथें वाडा

१ सिंगबें येथें
       १ पागा
       १ पाटीलकी भाऊबंदसुद्धां समाईक
      ---
       २

१ शहर जुन्नर येथें जागा अजिदाबाद पेठ येथे आहे
१ सौनापूर येथें पागा ।
१ कसबे तळेगांव येथे जागा

१ श्रीरामेश्वरदेवाचे दक्षणेस खुली जागा होती तेथें नवी इमारत लाकडी सभामंडपसुद्धां बांधोन त्या जाग्याचे नांव विष्णुमंदिर ठेऊन तेथे श्रीविष्णूची स्थापना लक्ष्मीसहित केली.
       १ श्रीविष्णूची स्थापना मिति ज्येष्ठ शु।। ७ शके १७४४
       १ श्रीलक्ष्मीची स्थापना मिति माघ शु।। ६ शके १७४९. या जाग्यांत नहराचें पाणी बागेतून नेऊन पाण्याचा हौद देवाचे पिच्छाडीस बांधिला
          व हौदालगत सोपा चार खणाचा बांधिला.

१ जन्माष्टमीचे उत्साहास नवीन प्रारंभ इ।। शके १७२५ पासून केला.
१ माहायात्रेस जाण्याचे पूर्वी उभयता बंधू व हरी काशी भोपळे व गणेश जनार्दन ऐसे बसून बहुत गोडीच्या गोष्टी बोलत होते त्यावर नानाचे बोलणे पडलें जे हीं बोलणीं वरकांतींची आहेत सर्वखदोलतीचा कागद लिहून देणें परम कठीण आहे म्हणोन बोलले त्यावरून ते च बैठकीस सर्वस्वदौलत तुमची म्हणोन कागद लिहून दिल्हा त्या कागदावर साक्षी हरीपंत व गणेश जनार्दन व सदाशिव खंडेराव व गोविंदराव करंदीकर या चौघानीं घातल्या. तो कागद नानानीं पाहून कांहींएक दिवशीं परत दिल्हा तो फाडून टाकिला त्यावरून नाना विभक्त होणार ही खातरजमा वाटत होती.

१ गोविंदराव तात्या व हरीपंत नाना उभयता बंधू एकत्र असतां तात्या माहायात्रेस गेल्यामागें नानाचे मनांत हरएक किंतु येऊन विभक्त व्हावें ऐसे जाहालें त्यावर नानास लोकानीं अनुमोदन बहुत दिल्हें यास कारण आम्हीं काशीहून बळवंत नारायण पोंक्षे यास कागद पाठविला त्यास तो पोंक्षे याणीं नानांस दाखविला तेव्हांपासून विभक्त व्हावें हा हेतू मनांत बहुत होता परंतु त्याजवर चिरंजीव सौ काशीबाईचे लग्नांत उपाध्ये याचे दक्षणेवरून उभयता बंधूंचा कज्या मोठा जाला तेव्हां विभक्त व्हावें असें बोलणें नानाचें पडलें तेव्हा बहुत प्रकारें सांगितलें कीं विभक्त न व्हावें. तीर्थरूप मातोश्री याची आज्ञा जे नाना लहान आहे त्यास अंतर देऊ नये ऐसे सांगोन त्यांणीं सहगमन केलें तें स्मरोन घरगुती मंडळीकडून बहुत प्रकारें सांगोन पाहिले परंतु न आईकेत तेव्हां त्यांणी दोन कलमांचा मुद्दा सांगितला कीं तात्याचे दोन मुलींची लग्ने जालीं व माहायात्रा हि जाली त्यास माझे मुलीचें लग्न करावयाचें आहे व माहायात्रा करावयाची आहे त्याचा ऐवज समाईक पो घ्यावा म्हणोन बोलणें पडलें त्यावरून मातोश्रीचे आज्ञेवरून सदरहू दोन कलमें लिहिलीं आहेत तीं समाईक ऐवज पो करूं म्हणोन सांगितलें तत्राप न ऐकत सबब दोनप्रहर रात्री कागद लिहून दिल्हा कीं तुमचे मुलीचें लग्न व माहायात्रा समाईक ऐवज पो करावा ऐसें लिहून दिल्हें तो दस्ताऐवज हातास येई तोपर्यंत विभक्तपणाची बोलणीं बोलत होते. दस्ताऐवज हातीं आल्यावर चार महिने एकत्र विचारें चालले नंतर पुन्हा विभक्त व्हावें म्हणोन बोलणें पडलें त्यावरून विभक्त न व्हावे सबब रा।। गणपतराव पानसे व गणपतराव बापू मेहेंदळे व बळवंतराव पोंक्षे या त्रिवर्गाकडून बहुत प्रकार सांगविले परंतु त्याचा दुराग्रह विभक्त होण्याविशीं फार कोणाचें हि न ऐकत सबब आषाढ शु।। १ शके १७३७ चे सालापासून विभक्त वाटणी यथाविभागें रा। गणपतराव बापू मेहेंदळे व गणपतराव पानशे व बळवंतराव पोंक्षे या त्रिवर्गाचे विद्यमानें याद ठरोन वाटणी दिल्ही. पहिला कागद लिहून तो माघारे घेऊन दिल्हा सबब मोहगम समाईक पो चिरंजीव यमूबाईचे लग्नाबा। पांच हजार काढून बाकी वाटणी यथाविभागें करून दिल्ही. जराबजरा लोहलोखंडसुद्धां देऊन परस्परें फारखती जाल्या मिति अश्वीन शु।। १ शके १७३७. पूर्वी पंचाइतींत विसाजी गणेश प्रतिपक्षानें बोलत होता सबब त्यास पंचाइतींतून उठऊन दिल्हें त्या दिवसापासून नानाचा कारभार करूं लागले व नांदतावाडापैकी पुढील चौक नवे इमारतीचा व पागा वगैरे जागा व दुकानें निमें नानाकडे व बागे पो निमे पश्चमेकडील पाणी लगत जमीन चांगली त्या जमिनींत कीर्दीची झाडे नारळीचीं आहेत तीं समाईक ठेवावी म्हणोन पंचानी नानांस बहुत प्रकारें सांगितलें परंतु त्यांचे हि नाना न ऐकत सबब झाडेंसुद्धां निमे वाटणी नानास दिल्ही.

१ सौभाग्यवती मनूबाई याचे लग्न जेष्ठ शु।। १५ शके १७४०; कृष्णराव नारायण जोशी सातारकर यांचे पुत्रास दिल्ही. विभक्त जाल्यानंतर वाई मुक्कामीं इंग्रजाचे दंग्यामुळे गेलों तेथे लग्नास चिरंजीव नाना हि आले होते.
१ चिरंजीव नीळकंठराव यांची मुंज चैत्र शु।। १० शके १७४२ समारंभ मोठा जाला.
१ नीळकंठराव यांचे लग्न फाल्गुन शु।। ३ शके १७४३ बाबाजी रास्ते यांची कन्या केली; नाव सौवती पार्वतीबाई ठेविलें; समारंभ चांगला जाला.

१ गोविंदराव तात्या याणीं लौकिक व महत्कृत्यें केलीं-
         १ हरी काशी भोपळे यास केवड्याचे विहिरीकडील जागा घर बांधावयास दिल्ही इमारतसुद्धां २ सोपे व खुली जागा
         १ गणेश जनार्दन यास श्रीरामेश्वर देवाचे उत्तरेकडील जागा इमारतसुद्धां
         १ श्रीरामेश्वर देवालयांतील धर्मशाळा पहिली होती तिचे लगत खण नवे बांधून पूर्ती केली.
         १ मौजे जुवाठी हा गांव इनाम तेथें पूर्वीपासून वतनदार खोत नव्हता. मध्ये बाबाजी प्रभू देसाई खोती मौजेमा।रची वतनी माझी
            म्हणोन वाद सांगत होता तेव्हां चिरंजीव नारो शिवराम याणीं वादास प्रारंभ करविला. नंतर ते मृत्यु पावले त्या दिवसापासून
           पुढें वादास प्रारंभ करून पंचाईतीस रा। बाळाजी नीलकंठ दाते यास नेमून देऊन सरसुभापंचाईतमतें वतनदार खोत देसाई नव्हे
           खोती सरकारची ठरोन सारांष होऊन निवाडपत्र करून घेतलें नंतर बेवारशी खोती सरकारची जाली सबब सरकारांत नजर देऊन
           खोती इनाम आपले न(।)वें करून घेतली व इनामपत्रें खोतीची सरकारचीं करून घेतलीं शके १७++.
        १ बळवंत नारायण पोंक्षे यास घर बांधावयास बक्षीस दिल्हे रु।। ५००० पांच हजार
        १ श्रीमाहायात्रेस श्रीमंत बाजीरावसाहेब यांचा निरोप घेऊन पौष वा। १० शके १७३४ चे सालीं नारायणराव मिरजकर यांचे यात्रेचे संगाबरोबर निघोन सहकुटुंब
          व मातोश्री माकूबाई यांस बरोबर घेऊन चालते जालों मागें चिरंजीव कुसाबाईचे लग्न व्हावयाचें सबब घरीं चिरंजीव नाना यांसी ठेऊन गेलों मागें चिरंजीव
          नाना मंडळीसुद्धां घरीं राहिले आम्हीं नागपूरचे वाटेनें झाडीकडून यात्रेबरोबर जातानां नागपूरचे पुढें मुक्काम बोरीबोहें येथून पोटदुखीस प्रारंभ जाला मिति
          चैत्र शु।। १ शके १७३५ वे दुखणीं हि बहुत जाहालीं. तिरस्थळीं यात्रा केली व श्रीमंत अमृतरावसाहेब यांचा लोभ पूर्वी बहुत संपादन केला होता त्यामुळें त्याणीं
          बहुमान देऊन खर्चास हि थोडें बहुत दिल्हें तिरस्थळीं यात्रा करून देशीं यात्रेबरोबर निघोन नागपुरापर्यंत आलों नागपुरीं येऊन श्रीमंत सेनासाहेबसुभा रघुजी भोसले
          यांणीं गोविंद शिवराम तात्या यांचा घरोबा जाणून बहुमान जातां व येतांना देऊन व खर्चास हि थोडेबहुत दिल्हें नंतर तेथून निघोन पंढरपूरचे मुक्कामीं आलों
          तेथें श्रीमंत बाजीरावसाहेब यांची भेट घेऊन पुढें पुण्यास घरीं येऊन पोहचलों मिति आषाढ वा। १३ शके १७३६. तीर्थरूप मातोश्रीचे वचनाप्रमाणे ईश्वरें
          सिद्धीस नेलें.

१ यशवंतराव होळकर हिंदुस्थानांतून फौजसुद्धां पुण्यानजीक येतां च श्रीमंताची लढाई होऊन श्रीमंत निघोन कोकणांत गेले. सुवर्णदुर्ग येथें जाऊन श्रीमंत जहाजांत बसून वसईस जाऊं लागले तेव्हां सर्वांस फौजसुद्धा निरोप दिल्हा तेव्हां आम्ही निरोप घेऊन देशीं वाईस येऊन नंतर पुण्यांत श्रीमंत अमृतराव साहेब यांची पूर्वी कृपा संपादन केली होती त्यावरून येऊन भेटलों नंतर येथील रंग ठीक दिसेना सबब विसापुरी मुलेंमाणसे होती तीं आणून मुलेंमाणसेंसुद्धां लोहोगडास गेलो. मागें होळकरांकडील हरीपंत भावे वाड्यांत येऊन राहिले होते त्यामुळें वाड्याची वगैरे खराबी बहुत जाली पुढें श्रीमंत बाजीरावसाहेब इंग्रज बहादूर यांस घेऊन पुण्या आले मिति ज्येष्ठ शके १७२५ तों होळकर व अमृतराव साहेब पूर्वी च निघून गेले श्रीमंतास आम्ही घाटाखालीं भेटून बरोबर पुण्यास आलों. भेटीसमई सारंगी घोडी श्रीमंतास नजर केली. मुलेंमाणसें लोहगडीं होती ती वाईस आणून ठेविली. नंतर पुढें दंगा निवारण जाल्यावर पुण्यास आणिली नंतर पुढें धान्याचा दुष्काळ बहुत पडला त्यामुळें ऐवज बहुत खर्च जाला.

१ गोविंदराव तात्या यांस पुत्र व कन्या
        १ कुसाबाई
        १ काशीबाई
        १ मनुबाई
        १ नीलकंठराव यांचा जन्म वैशाख शुद्ध १४ शके १७३७

१ श्रीमंत बाजीरावसाहेब याबरोबर स्वा-या बहुत करून मेहनत हि फार केली परंतु त्यांचे विचारास न येतां सदाशिव माणकेश्वर कारभार करीत होते त्याणीं निमे सरंजाम राहिला तो स्वारासुद्धां जप्त केला मिति शके १७३३ त्यामुळें बहुत खराबीस आलों इनामा खेरीज सरकारी इलाखा कांहीं राहिला नाहीं.

१ श्रीमंत अमृतरावसाहेब याणीं पेशजी केवडयाचे विहिरीकडील जागा घेऊन दुस-यास दिल्या त्यांची नावें
        १ विठ्ठलपंत लघाटे
        १ बापू चिटणीस
      ----
       २

१ बाळोजी कुंजर याणी गंजीची जागा पुलाजवळील होती ती जबरदस्तीनें घेतली.
१ हरीपंतनाना याचें दुसरें लग्न स्वसंतोषें शके १७३४ बाळाजीपंत पटवर्धन याची कन्या केली नाव सौ गंगाबाई ठेविलें.

१ हरीपंत नाना यांस पुत्र व कन्या
         १ प्रथम स्त्रीस यमुनाबाई
         १ दुसरे स्त्रींस चिरंजीव माधवराव बापू यांचा जन्म आषाढ वा। १० शके १७४१ विभक्त जाल्या नंतर
       -----
        २

१ सौ कुसाबाई लग्न माघ शु।। १५ शके १७३४ नारोपंत दातार पेणकर याचे पुत्रास दिल्ही; तात्या श्री महायात्रेस गेल्यानंतर मागें चिरंजीव नानानीं लग्न केलें समारंभ बहुत चांगला जाला.

१ सो काशीबाई यांचे लग्न माघ वा २ शके १७३६ कुशाबा सोमण तळेकर याचे पुत्रास दिल्ही. तात्या महायात्रेहून आल्यानंतर सोमणाकडील मांडवपर्तणाचे दिवशी उपाध्ये याचे दक्षणेवरून चिरंजीव नानाचा कज्या मोठा जाला तेव्हांपासून विभक्तपणाचें बोलण्यास प्रारंभ जाला. व्याही यांचे घरीं नाना भोजनास गेले नाहीं.