Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ १४६ ]

श्री. शके १६६२ भाद्रपद शुद्ध ९.

अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री माहादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसि :---

सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार. सु॥ ईहिदे अर्बैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. जयनगरीहून स्वार होऊन नाशिकास आलों. हत्ती समागमें आहे. दरमजलीमुळें तलाक आहे, यास्तव सोप करविलें असेल. आपलें आगमन सातारियाहून पुण्यास जाहालियाची आज्ञा जाहालिया दर्शनास येऊं, ह्मणून लि॥ तें कळलें. नाशिकास आलेस हत्तीस सोप केले, उत्तम केलें. आह्मी पुण्यास आलों. अतःपर तुह्मी स्वार होऊन येणें. जाणिजे. छ० ८ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ?

लेखन
सीमा.

पौ छ. १३ जमादिलाखर.

[ १४५ ]

श्री. शके १६६२ आषाढ वद्य ९.

वो रजिश्री महादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसिः-

 अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। मल्हारजी होळकर कृतानेक दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणवून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. आपण पत्रें पाठविली तें पावोन भावगर्भ ध्यानास आला. दिल्लीकडील मजकूर लिहिला कीं, निजामांनी बहुतसा उपद्वाप मांडून अजिमुलाखानास माळव्याची सुभेदारी सांगून, वस्त्रें देऊन, रवाना केले आहेत. बरोबरी फौज पंधरा हजार कुली बिसाद आहे. डेरियासी दाखल जालें. पुढें चालणार. असे कितेका प्रकारें सविस्तरें अर्थ लिहिला तो कळूं आला. ऐश्यास पूर्वी जे जे आले त्यांनीं पराक्रम केला तो तुह्मास दखलच आहे ! ज्यांनी इतका उपद्वाप केला, त्यांनी पराक्रम केला तोही तुह्मांस पूर्ण श्रुत आहे आणि देखिलेंही आहे ! प्रस्तुत अजिमुल्लाखान येणार ! त्यास माळव्याप्रांतीं छावणी असती तरी या दिवसांत ते नांव इकडे यावयाचे न घेते ! तथापि 'आह्मी देशास आलों ह्मणून काय जालें ? याउपरि सेनासहवर्तमान त्या प्रांतास सत्वरीच येऊन. अविंधास बरे वजेनें नतीजा पाविला जाईल. आणि कोणी लबाडी करतील तेही आपल्या गुणेंच फजित पावतील ! चिंता काय आहे ? श्रीमंत राजश्री नानास्वामीस पेशवईची वस्त्रें अषाढ शुध द्वादशीस जालीं. श्रीमंत राजश्री आपास्वामी व ते ऐसे उभयतां सातारियांतच आहेत. तेथून सत्वरच पुणियासी येतील. कळलें पाहिजे. रा। छ. २२ रबिलाखर. बहुस काय लिहिणें ? हे * विनंति.

मोर्तब
सूद.

सो। गंगाधर यशवंत व रामाजी यादव सा। नमस्कार विनंति उपर लि॥ परिसिजे. लोभ असो दीजे. हे विनंति.

श्री ह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी होळ
कर.

[ १४४ ]

श्री. शके १६६२ वैशाख वद्य ११.

अखंडितलक्ष्मिअलंकृतराजमान्य राजश्री माहादेवभट्ट गोसावी यासिः--

सेवक जनार्दन बाजीराऊ नमस्कार सु॥, अर्बैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें छ० २३ सफरीं प्रविष्ट जाहालें. पत्रापूर्वीच तीर्थस्वरूप राजश्री रायांनी कैलासवास केला, हें वर्तमान तुह्मांस लिहून पाठविलें आहे, त्यावरून कळलेंच असेल. सांप्रत तुमचें पत्र आलें, त्यांत कितेक राजकारणाचा मजकूर लिहिला होता. ऐसियास, तीर्थस्वरूप कैलासवास राउयांचा प्रताप तैसाच होता. जो मनसबा सिधीस न जावयाचा तोही त्याचे पुण्येंकरून सिधीस जात होता. असो ! श्रीइच्छेनें प्रस्तुत प्रसंग ऐसा होऊन आला ! परंतु कैलासवासी यांणीं समागमें काय नेलें ? सर्व प्रसंग यथास्थित आहे. दिल्लीकडील राजकारण राजश्री बाबूराव यांचे विद्यमानें जाहालें आहे, तें राजश्री लवाइजी यांणीं रक्षिल्यास चातुर्मासानंतर उभयपक्षींच्या उपयोगाचें आहे. राजश्री राजराजेंद्र यांचा व राजश्री राव कैलासवासी यांचा स्नेह व एकात्मता होती, तेणेंकरून बहुतांस दबाव होता. प्रस्तुत, राव कैलासवासी जाहाले याजमुळें राजराजेंद्र दुश्चित्त होऊन पूर्वील अनुसंधान सोडितील तरी कार्याचें नाहीं. काय निमित्य कीं, नकारनामकाच्या चित्तीं सारी पातशाही आक्रमांत आणावी. त्यास, आधी हर्षामर्ष वाढवितां, राजराजेंद्र यासी वाढवितील. यास्तव पहि  *
रसीदगि छ० १ १ रविलावल

                                                                                   लेखांक २२१

                                                                                                       श्री                                                         १६५३ मार्गशीर्ष शुध्द ९                                                                                                   

                                                                                                  श्रीसदानंद

                                                                                  221

 

5  सो। मोकदमानी देहाय सा। हवेली यासि हरी मोरेश्वर अजहत देशमुख व भगवत सामराज व गिरमाजी झुगो देशपाडे पा। वाई सु। इसन्ने सलासीन मया व अलफ तपोनिधी भवानगीर गोसावी महत वास्तव्य मठ श्री स्वामी का। निंब येथील मठचे भडारा व दिवाबत्तीस पुरातन गावगना टका एक व गला कुडो एक देविला आहे तरी ता।साल गु॥ चालत आले असेल त्याप्रा। देणे हाली कितेक गाव उजूर करिताती ह्मणून मठचे गोसावीयानि जाहीर केले त्यावरून ताकीद एकदर लि॥ असे तरी सालाबादप्रा। मठचे गोसावी येतील त्यास गावटका व गाव कुडो देत जाणे याखो। जे जावी साळी कोष्टी धणगर असतील तेथे काबळा व पासोडी सालाबादप्रा देणे अचला व कोपीनेचे बेगमीस पुरातन देत आला आहा त्याप्रा। देणे धर्मकृत्य आहे श्री देवस्थान अनादसिध आहे तेथील जे चालत आहे त्याप्रो। देत जा उजूर न करणे छ माहे जमादिलाखर मोर्तब 

                                              

                                                                                    137

[ १४३ ]

नकल
श्री. शके १६६१ कार्तिक वद्य ५.

शके १६६१ सिधार्थीनाम संवत्सरे कार्तिक वा। ५ ते दिवशीं वेदमूर्ति राजश्री माहादेवभट्ट वलद गोविंदभट्ट हिंगणे साकीन का। नाशीक यांसिः--

मल्हारजी पा। वलद खंडोजी पा। होळकर मोकदम निमे व रतन पा। वलद भाउजी पा। व सटवानी पा। वलद + + येस पा। वलद + + मोकदम निमे, मौजे आडगांउ प्रा। गुलशनाबाद सरकार संगमनेर सुभे खोजिस्ते बुनियाद सन ११४९ इनामपत्र लेहोन दिल्हें, ऐसी जेः- तुह्मी गोदातीरीं अग्नहोत्री, थोर ब्राह्मण, सर्वांस पूज्य जाणोन इनाम जमीन बिघे ३० तीस, बागाईत बिघे १०, व जिराइत बिघे- २०, लायक बागांत जमीन इनाम व घर वतन करून लेंकाराचेलेंकरीं दिधला असे. तुह्मीं सुखें मौजे मा।री घर बांधणे, व जमीन कीर्द करून खात जाणें. व त्याचा महसूल होईल तो खाऊन गोदातीरीं शुभ चिंतन करीत जाणें. याचा वसूलास कोन्ही मुजाहिम होनार नाहीं. सानिनहल कोन्ही झट लावील तर, आपण समस्त गांवसंमंधे देऊन तुह्मांस कवड़ीचे झट लागणार नाहीं.

श्री. शके १६६१ कार्तिक शुद्ध १२.

० श्री ॅ
राजा शाहू नरपति ह
र्षनिधान बाजीराव
बल्लाळ मुख्य
प्रधान.  *

 मा। अनाम देशमुख व देशपांडे व मुकदम को। सासवड यांसिः-

बाजीराऊ बल्लाळ प्रधान सु॥ अबैन मया व अलफ. दत्ता नाहावी मौजे बेलसर का। मजकूर हा बुडाले घरचा आहे. यासी अवघे गोतं मिळोन गोतांत घ्यावयास आज्ञा केली आहे. तरी समस्त नाहावियांस ताकीद करून दत्ताजी नाहावियास पंक्तिपावन करणें. जाणिजे. छ० १० साबान. आज्ञाप्रमाण.

लेखन
सीमा.

[ १४१ ]

श्री.

पौ छ. २४ रजब.
शके १६६१ आश्विन शु॥ १३.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी
होळकर.

राजश्री बापूजी माहादेव व राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसिः----

छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अर्थ विदित जाला. नवाब मनसुरअलीखान यांजला वजिरीची वस्त्रें व सादतखान यांजला बकशीगिरीचीं वस्त्रें जालीं; आणखी कितेक दुराणियाकडील वगैरे वर्तमान लिहिलें तें अक्षरशाहा ध्यानास आलें, पूर्वी मुजरद कासीदजोडिया पाठविल्या त्याचें उत्तर न आलें. सांप्रत पत्र पावून वृत्तांत कळूं आला. ऐसेंच वरचेवर तेथील अमिराचे व पठाणाकडील सविस्तरें लिहून पाठवित जाणें. अळस न करणें. इकडील वर्तमान तरी:- ईश्वरसिंग याची बुद्धि क्षणभंगुर, निखालसता नाहीं, आह्मांस तो कार्य करून घेणें. त्यासी तूर्त +++ गीचा मुकाम आहे. तेरा कोस +++ येथून तेहि फौजाची तयारी करितात. बाहेर निघालिया खावंदाचे प्रतापेंकरून त्याचे मनोरथ भग्न करून आपलें कार्य करून घेतलें जाईल. चिंता नाहीं. तुह्मीं तेथल्या खबरीस पाठवायाचा आळस न करणें. श्रीमंत राजश्री पंतप्रधानस्वामी माळवे प्रांते जाऊन धारेपासी मुकाम जाले. त्यासी, राजश्री यशवंतराव पंवार येऊन धार, सोनगड़ दोनी स्थळें श्रीमंत स्वामींकड़े देऊन कृपा संपादन करून घेतली. धार, सोनगड येथील बंदोबस्त करून श्रीमंत देशास गेले; ऐसें वर्तमान आलें आहे. राजश्री जयाजी सिंदे व र॥ रामचंद्रबावा उजिनीस छावणीस राहिले, ऐसें वर्तमान आहे. तत्वतां पत्र आलिया लिहून पाठवून. दिल्लींतील सार्वभोमांचें व सामादिकांचे वर्तमान मनसबा ल्याहावयासी अंतर केलें न पाहिजे. आह्मीहि येथें उपराळियांसी आहों. ++ उत्तर पाठवीत जाणें. छ. १० रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

( मोर्तब सुद.)

[ १४० ]

श्री. शके १६६१ आषाढ शुद्ध १३.

राजमान्य राजश्री गोविंद खंडेराव चिटणीस यांसी आज्ञा केली ऐसी जे, तुमचे वडील पूर्वी स्वामीचे उपयोगी पडले. व खंडेराव बल्लाळ यांनी दिल्लीपतीचे लश्करांतून स्वामी येतां मार्गी येऊन कितेक प्रकारें चाकरी केली; ती ध्यानांत आणून परम विश्वासुख जाणून लहानथोर कामें सांगावीं, अशी योजना केली असतां, मी कुटुंबवत्सल; माझे पदरीं पोरवडा; आजीपरयंत श्रम स्वामीच्या चरणांजवळ केले. पुढें आस्था, पायाचा वियोग न होतां धंदा लेकरांचे लेकरीं चालवावा; दुसरा लोभ नाहीं; असें शफतपूर्वक बोलल्यावरून, त्यांनी राज्याकरितां दु:खें भोगिलीं तीं स्वामींनीं आयकून घेतली. परंतु कामकाज सांगावें हें मनांतच राहिलें. खंडेराव कैलासवासी जाले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र जिवाजी खंडेराव सरकार उपयोगी पडतील तर, त्यांजला लिहिण्याचा कसाला होईना. सा। सर्व तुमचे माथां ओझें स्वामीच्या राज्यासह पडलें असतां जातीने सेवा करून प्रपंचहि पाहिला. स्वामी तुह्मांवर कृपाळू होऊन कारभाराची वस्त्रें देत असोन घेतली नाहीं. आज्ञेप्रों। कार्यभाग उलगडले. तिलप्राय फुरसत न पडे; हें पाहून राजश्री मोरो शिवदेव, तुमचे गुमास्ते लिहिणार, यांजला तुमचे विनंतीवरून लिहिण्याविसीं परवानगी सांगितली; आणि तुह्मांपासोन दौलतीची कामें घेतली. त्यांत तुह्मी स्वामीपासोन मागोन घ्याल ह्मणून मार्ग पाहिला; परंतु कांहींच न मागितले. त्यावरून परम विश्वासुख निःकपट सेवा तुमची जाणून हें पत्र तुह्मास लेहून दिल्हें असे. तर तुमचे परंपरेनी चालविण्यास स्वामींचा वंश अंतर करणार नाही. व तुह्मी सेवा करीत आल्याप्रों। पुढें करीत जाणें. जाणिजे. छ. ११ रबिलाखर सु॥ अर्बैन मया व अलफ. तुमची सेवा बहुत. स्वामी तुह्मांवर संतोष होऊन हे लिहून दिलें. तर स्वामीचे वंशीचा असेल तो सेवा घेईल; तुमचे वंशास अंतर देनार नाहीं. बहुत काय लिहिनें ?

                                                                                   लेखांक २२०

                                                                                                       श्री                                                         १६५३ मार्गशीर्ष शुध्द ९                                                                                                   

                                                                                                  श्रीसदानंद

                                                                                  220

 

5 सौ। मोकदमानी देहाय सा। मुर्‍हे यासि हरी मोरेस्वर अजहत देशमूख व भगवत सामराज व गिरमाजी झुगो देसपाडे पा। वाई सु॥ इसने सलासीन मया अलफ तपोनिधी भवानगीर गोसावी महत वास्तव्य मठ श्री स्वामी का। नीब येथील मठचे भडारा दिवावती सरफरात नगा व टका व कीव कुडो देविला आहे त्या सा। ता। सालगु॥ चालत आले आहे त्याप्रा। चालवीत जाणे उजूर न करणे छ ७ माहे जमादिलाखर मो।

मोर्तब 
सुद

[ १३९ ]

श्री. शके १६६१ आषाढ शुद्ध ११.

राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यासि आज्ञा केली ऐसी जे :-

स्वामीच्या राज्यांतील स्थळें, किले, व जंजिरे, व ठाणियाच्या कारखानिशा, व सरदारांकडील चिटणीसी, व जमेनिसीचे धंदे, राजश्री जिवाजी खंडेराव चिटनिवीस याचे आजे बाळाजी आवजी यासि कैलासवासी थोरले महाराजांनीं वंशपरंपरेने करार करून देऊन चालविले. त्याप्रमाणे चालतच आहेत. ऐसियास, फिरंगाण वगैरे तालुके तुह्मी सोडविले, व पुढें सोडवाल. तेथील किले में जंजिरे व ठाणियाच्या कारखानिशीचे व सरदारांकडील चिटणिसी व जमेनिसीचे धंदेयाचे कामावरी मारनिले आपले निसबतीचे कारकून पाठवितील, त्यांचे हातून कामकाज घेऊन, चालवीत जाणें. बाळाजी आवजी व खंडो बल्लाळ यांणी स्वामिसेवा निष्ठेनी करून, बहुत श्रमसाहास केले आहेत. यास्तव, यांचे परंपरेने चालवणें अगत्य हें जाणतेच आहा ; तदनुरूप चालवीतही आहातच. जाणिजे. छ० ११ रविलाखर सु॥ अर्बैन मयातैन व अलफ.  * खास दस्तुर याचे हातून सेवा घेने. बहुत लिहिणे तर, सुनद असा.