Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक ४९.

१७०७ अधिक चैत्र वद्य ५.

पै॥ छ २० जमादिलाखर सन खमस समासीन.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ १९ जमादिलावल स्वामींचे कृपावलोकने करून येथास्थित असे. विशेष. पेशजी छ १७ रबिलाखरी विनंतिपत्रे पाठविली आहेत. ते पावून सविस्तर वृत्त श्रुत जालेंच असेल. हाली अग्रियाचे किल्यांत सरकारचा अंमल जाला वगैरे इकडील वर्तमान विस्तारे राजश्री नानांचे पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून ध्यानास येईल. कृपा करणार धणी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ४८.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे : इष्टिन साहेब इंग्रेज पातशाहाजाद्यास घेऊन श्रीकाशीस गेले, हे वर्तमान विलायतेत कंपनीने ऐकून इष्टिनास पत्र लिहिलें कीं, तुह्मी हिंदुस्थानचे पातशाहाजादा समागमें घेऊन येतां, त्यास तुमचा काय इरादा आहे ते लिहून पाठविणें, एकतर दक्षणी सरदारांचा आमचा सलूक जाला आहे आणि त्यांचे मर्जीशिवाय त्यांसी बसदलूकी करून पातशहाजाद्यास विना त्यांची मर्जी घेऊन आला हें ठीक नाहीं, तर देखतपत्र पातशहाजाद्यास माघारा रा। पाटीलबावापासीं बिदा करणें, ते पातशहास विनंति करून पातशाहाजाद्याची तकसीर माफ करून त्याचे स्वाधीन करितील, तुह्मी या बखेड्यांत न पडणें. म्हणून लिहिलें होतें. त्याजवरून इष्टिन इंग्रेज याने पातशाहाजाद्यास समागमें दोन पलटणें देऊन, रा। सदासिवपंत बक्षी रा। पाटीलबावाकडील याजसमागमें बिदा केलें. ते लखनऊस आले आहेत. पुढे लस्करांत जालियावर विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ४७.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे : छ ३ मिनहूस पातशहा, अफराशाबखान याचे लस्करांतून कूच करून अंबाजी इंगळे याचे व पाटीलबावांचे लस्कराचेमधें जाऊन मुकाम केला. डेरियास दाखल जाले त्यासमयीं राजश्री पाटीलबावांनी एकवीस मोहरा नजर केल्या. पाटीलबावांचे लस्करांत पातशहा दाखल जाले. हिंदुस्थानी लस्कर दरोबस्त एकीकडे आहे. पाटीलबावा, पातशहा, अंबाजी इंगळे ऐसे एकीकडे आहेत. या नक्षानें मुकाम करून आहेत. च्यारशे तोफा व दहा हजार स्वार व तीस पलटणें एकूण चाळीस हजार स्वार प्यादा, विना तलवार पादाक्रांत होऊन जैसी पाण्यांत माती पडून विरून जाती त्याप्रों यवनाचे फौजेची अवस्था जाली आहे. कोणी कोणांत मिळत नाहींत, याप्रमाणें जालें. पुढें अमलांत येईल ते विनंति लिहूं. बहुत काय लिहिणे ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ४६.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- छ २६ माहे जिल्हेजीं पातशाहा आग्रियाहून कुच करून शिल्लक किस्ती दर-गावास भरती करून, मौजे फत्तेपूरसमीप लस्कर अफराशाहाबखान यांचे होतें तेथें दाखल जाले. राजश्री पाटीलबावा भरतपुराचेनजीक होते, तेथून कुच करून पातशहाचे लस्करासमीप आठ कोसांवर येऊन मुक्काम केला. छ २९ रोजीं मिरजा अकबरशाहा यास पातशहानीं नबाब बहीरमखानास समागमें देऊन सामोरा पा। राजश्री पाटीलबावांनीं आपले लस्कराबाहेर डेरा उभा केला होता तेथें अकबरशहास बसविलें. एक हत्ती, एक घोडा, सात किरमिजी पोशाक वस्त्रें, व एक खिरमी जवाहीर व एकशें एक मोहोरा नजर व हामराही सरदार राजश्री कृष्णाजी पवार वगैरे याणीं माफक मरातब नजरा देऊन, त्याजसमागमें पातशहापाशीं येऊन, पातशहाची मुलाजमत जहाली. पायावर डोई ठेवून एकशें एक मोहोर नजर केल्या. याजसमागमील सरदार कृष्णाजी पवार आदिकरून किरकोळी होते, त्याणीं माफक मरातब अवघ्यांनीं नजरा केल्या. राजश्री पाटीलबावा यांचे पाठीवर पातशहानीं बहुत ममता-पुरस्कार हात ठेवून आज्ञा केली कीं, तुह्मी उरुबरा बसा. त्याजवर राजश्री पाटीलबावा बसले. पातशहानीं पारच्या खिलत, जगा बमय, परगीरी व शिरपेंच व मोत्यांची कंठी व हत्ती, घोडा, तरवार, ढाल, येणेंप्रों सन्मान केला. हामराही कृष्णाजी पवार वगैरे सरदार होते त्यांस खिलत पांच पांच पारच्याचे, बमय, शिरपेंच व जगे सुध्धां सुमार खिलत ५० पन्नास व दुशाले सुमारें दीडशें व गोशवार दीडशें व येणेप्रों तरवारीचे कबजे च्यार व वस्त्रें देऊन, सन्मान करून, दोन घटका पातशहासी खलबत करून, रुकसत होवून, आपले डेरियास जाऊन, पातशाचे लष्करचा व अफराशहाबखानाचे लष्करचा बंदोबस्त आपलीं पलटणें बसवून केला. शिवाय पाटीलबावाचे परवानगीशिवाय हकडून तिकडे जाऊं पावत नाहीं. पातशहाचे लष्करचे लोक अफराशहाबखानाचे लस्करांत कोणी जाऊं पावत नाहीं. याप्रों बंदोबस्त करून पैका कराराप्रों आणवण्याचा तगादा आहे. पुढें पातशहाचे विच्यारें राजश्री पाटीलबावा मसलत ठरवितील ते विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पों हे विनंति.

श्री.

लेखांक ४५.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

पु.॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- नबाब अफराशाहाबखान मारला गेला त्याचा आरोप जैनूज अहदीखान याजकडे आला. त्यावरून त्यास कैद करून, गाढवावर बसवून, तोंड काळें करून, लस्कराचे आसपास फिरवून, भीक मागवून, कैद करून, ग्वालेरीस पाठवितील. दुसरें खुशालराम वकील राजे जैनगरकर याचा लष्करांत होता तो पेशजी रावराजा प्रतापसिंग याचे दुंबाल्याची दिवाणगिरी मुखत्यारी करून होता. अलीकडे नजबखानासी मिळून मागें रावराज्यास लुटविलें होतें म्हणून त्याची व याची आकस होती. त्यास एका xx यानें मारून टाकिलें तो xxxx व राजा प्रतापसिंग याचे टुमेवर आला त्याजवरून त्याचे लस्करावर दोन हजार फौजेची चौकी राजश्री पाटीलबावांनीं पाठविली आहे. पुढें जें ठरेल तें विनंति लिहूं. तात्पर्य, पैका मेळावयाचे दिवस आहेत. श्रीमंत राजश्री पंत-प्रधान-साहेब दैववान आहेत कीं, त्यांचे प्रतापें यश सेवक लोकांस यत्न न करतां येतें. ईश्वर त्यांस सलामत बेसलामत राखो आणि दिवसेंदिवस अधिक प्रताप होवोत. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ४४.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी:-
पो गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता।छ ९ माहे मोहरम जाणोन स्वानंद-लेखनाज्ञा केली पो. विशेष. आपण छ २६ जिलकादचें आज्ञापत्र पाठविलें तें छ ३० जिल्हेजीं पावोन सनाथ जहालों. पत्रीं आज्ञा कीं, पातशहा अग्रियास दाखल जहालेच आहेत, तेथून पुढें गेले किंवा तेथेंच आहेत ते ल्याहावें, व राजश्री महादजी शिंदे यांच्या व पातशहाच्या भेटी कधीं होणार, शिंद्यास येथून वरचेवर लिहीत जात असतात, तुह्मींही होईल ते मजकूर मारनिल्हेस वरचेवर सुचवीत जावें, ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, आज्ञेप्रों विशेष वृत्त आढळल्यास पाबावास लिहितों व श्रुत करीत असतों. इकडील बारीक-मोठें वृत्त छ १९ व छ २१ माहे जिल्हेजीं पै दरपै विनंतिपत्रें पा तीं पावलीं असतील. त्यावरून श्रुत जालेंच असेल. हालीं वर्तमान तर महमद बेग हामदानी यास आणून कैद केलें आहे. त्याचा असबाब तोफा पंचावन्न व हत्ती बारा १२ वगैरे सरंजाम होता त्याप्रों कांहीं राजश्री पाबावानीं आपलें सरकारांत घेतला. कांहीं हिंमतबहादुर याजकडील तोफा महमदबेगानें पेशजीं लुटून नेल्या होत्या त्या त्यास दिधल्या. राहिला सरंजाम अफराशाहाबखान याचा घरचा आहे. त्याजपासून कांहीं पैका घेणें. त्याणीं राजश्री पाबावाशीं करारमदार केला आहे कीं आमची सरदारी आह्माकडे असावी. त्यावरून करारमदार करून त्याचे पुत्रास सरदारी करार केली आहे. त्याचें नांव हुसेनुद्दोला बाहादूर. महमद-हुसेनखान गालबज्यंग ह्मणून किताब देऊन वस्त्रें मातम पुरसीचीं व पैका आणावयास अलिगडास माणसें पा आहेत. व तो मूल तीन वर्षांचा आहे, त्यासही लस्करांत बोलाविलें आहे. व मोगली वगैरे सरदार यास हिंमतबहादर आणि नारायणदास याणीं जाबसाल लाविला आहे कीं, तुह्मी बहुता दिवसांपासून सरंजाम खातां, आतां कांहीं पैक्याची तुह्मीही कुमक करावी, म्हणून महमदबेगसुद्धां जितके सरदार मोगली वगैरे आहेत त्यांस तगादा आहे. त्यांचे लष्करचे असल्यास रा। पाटीलबावांचीं पलटणें व फौजेचा चौका आहे, तेही पासीं आहेत. हिंदुस्थानचे यवनाच्यासिवाय पातशाहात शांत जहाली ! कांहीं त्यांत जीव राहिला नाहीं ! पातशहाची मर्जी सर्व प्रकारें राजश्री पाटीलबावाकडे मुतवजे आहे. छ ४ तारखेस पातशहासी व राजश्री पाटीलबावासी खलबत जालें. पातशहानीं आज्ञा केली कीं, तुह्मी आमचे घरची मुख्त्यारी कबूल करा. याणीं उत्तर दिल्हे कीं, ताजियाचे दिवस आहेत, गेलियावर विनंति करीन. म्हणून बोलून आपले डेरियास आले. पुढें अंमलांत येईल ते विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ४३.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक शंकराजी सखदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ ९ माहे मोहरम जाणून स्वानंद-लेखन-आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनी कृपा करून छ २६ जिलकादचें पत्र पाठविलें तें पावलें. शिरसा वंदून सनाथ जालों. इकडील वृत्त पेशजी छ १९ व छ २१ जिल्हेजचीं विनंतिपत्रें पाठविलीं आहेत ते पावून सविस्तर श्रुत जालेंच असेल. हालीं वर्तमान बारीक मोठें आमचे यजमानाही विनंति लिहिली आहे त्याजवरून ध्यानारूढ होईल. येथील देणें राजश्री पुरुषोत्तमपंत नाना यांचे हातचें याचा प्रकार पूर्वी दोन च्यार वेळां विनंति लिहिली होतीच. राजश्री देवराव- तात्यास राजश्री गोविंदरावांनीं लिहिलेंच आहे. त्यास तेंच पत्र बजिन्नस आपणास दाखवितील किंवा विनंति करितील, त्याजवरून श्रुत होईल. कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.

श्री.

लेखांक ४२.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- बाबाराव नामें गृहस्थ नवाब निजाम अल्लीखान यांजकडून राजश्री पाटीलबावाकडे वकिलातीस आले आहेत. याचें कारण कीं, हैदराबादेपलीकडे सरहदेस कांहीं नवाबाचे प्रगणे आहेत ते इंग्रजांनीं पूर्वी इजारा करून घेतले होते. त्याचा पैका प्रथम दिल्हा, आतां देत नाहींत. हिसेब करितां येक करोड सत्रा लक्ष रु।। इंग्रजांकडून नवाबाचे निघतात. त्यास, इंग्रजांचा सलूक श्रीमंतासी राजश्री पाटील यांचे विद्यमानें जाहला आहे, यांचा इंग्रजाचा स्नेह आहे. ह्मणून याजकडे आपला गृहस्थ जाबसालास पाठविला आहे कीं, याचे हातून कांहीं सामदामानें इंग्रजांकडून ऐवज पदरीं पडला तर उगवून घ्यावा. म्हणून याजकडेस पाठविला आहे. त्यास, राजश्री पाटीलबावांनीं इंद्रसेनासी बोलून आपलीं पत्रें व इंद्रसेनाचीं पत्रें कलकत्त्यास पाठविलीं आहेत. तेथून अद्यापि जाबसाल आला नाहीं. म्हणून बाबाराव रा। पाटीलबावा-पासींच आहेत. त्यास यासी व नवाब निजाम अल्लीखान यासी स्नेहवृद्धि व्हावी म्हणून हत्ती एक व घोडा एक मोत्याची माल व झगा, सिरपेंच, किनखाप साहा व शालजोड्या ६ व तरदाम बंगाली थान ६ व फुलचरी बदामी थान ६ व तीन हजार रु।। नख्त दिल्हे कीं, बऱ्हाणपुरीहून शेला पागोटीं कच्च्या रंगाचीं बऱ्हाणपुरीं घेऊन जावीं. म्हणून कारकुनास आज्ञा. नवाबाकडील मुखत्यार कारभारी यास घोडा येक व किनखाप ४ व शालजोड्या ४ व तरदाम ४ व फुलचरी ४ व मोत्याची कंठी व झगा, शिरपेंच येणेंप्रों सरंजाम आपला कारकून समागमें देऊन रवाना केला. व याची बहीण आनंदीबाई महाराव निंबाळकर यांस दिल्ही होती, ते याचे भेटीस आली होती. तीस या प्रांतीं पन्नास हजार रु।। कर्ज जालें. त्यास ते याची आज्ञा घेऊन माघारा जाऊं लागली. ते समईं पन्नास हजार रुपये सावकाराचे वारून, पंचवीस हजार रुपये मार्गी खर्चास देऊन बिदा केली. ते ग्वालेरीसमीप जाऊन मृत्य पावली. तिच्या नाती दोघी मुली समागमें होत्या व सरंजाम सुखरूप देशी कल्याणराव कवडे याजपाशीं जाऊन पोहचावा ह्मणून येथून कारकून बिदा केला आहे. तो पावता करील. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ४१.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे : मोहरसिंग शीख यांस रावराजा प्रतापसिंग याजवर तनखा करून पत्रें दिधलीं आहेत कीं, पावणे तीन लक्ष रुपयांचे प्रगणे जैपूरपैकीं लावून देणें. म्हणून पत्रें लिहून देऊन करारमदार जाला कीं, पातशाही खालशाचा मुलूक आहे त्यांत धामधूम करूं नये. व राखी घेऊन ठेवले प्रो वर्तणूक करून जैपूरचे महालीं रावराजाकडील देइल तो ऐवज घेऊन स्वस्थ असावें. सरकारचा अंमल सरहिंदेकडे जाईल त्या समईं पांचा हजारा स्वारांनसीं समागमें असावें. तिकडील मुलूक सुटेल त्याप्रों दहा लक्षांची जागा आणिक लावून देऊं. म्हणून करारमदार होवून, त्यास वस्त्रें देऊन, बिदा केले. त्यास मोहोरसिंग व कुज्यासिंग हे दोघेजण लष्करास असतां, याप्रो बोलणें बोलत असतां व सरंजाम लावूं देणें व दिल्हा ऐसें असोन, यांचें निसबतीचे शीख अंतर्वेदीत मेरटेकडे जाऊन दर रुपयास दोन आणे येणेंप्रों तमाम अंतर्वेदीत तहशील केली व करितात. याप्रों वर्तमान आहे. मुलूक मोठा. कारभार मोठा. परंतु अद्यापि खातरखा बंदोबस्त नाहीं. प्रत्ययास आलियावर विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंती.

श्री.

लेखांक ४०.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- राजश्री कृष्णराव गोविंद याचे पुत्राकडे उदेपूरचा कारभार होता. तो त्याजकडून काढून राजश्री बाळाजी बल्लाळ काटेकर याजपासून पाऊण लक्ष रुपये घेऊन त्याजकडे उदेपूरचा कारभार सांगितला. त्यास हत्ती, घोडा, शिरपेंच, गांव, वस्त्रें, येणेंप्रों देऊन सन्मान करून, बिदा केलें आहे. परंतु कागदपत्राचा बंदोबस्त होणें ह्मणून राहिलें आहेत. आठा पंधरा रोजांनीं जाणार. बुंदी, कोटे, उदेपूर, ऐशा तीही संस्थानच्या मामलती व चवथाईचे अमलाचा मामला मारनिलेकडेस करार जाली. मागील हिशेबाचे कांहीं फडशे जाले. कांहीं शेष बाकी फडशा होणें आहे तो करून जाणार. व रामगडाकडे रायाजी पा। फौजसुद्धा गेले आहेत, त्यांनीं कोळेचे शहरांत ठाणें बसविलें. तेथें दोन पलटणें, चाळीस तोफा होत्या त्यापों एक पलटणवाला फुटून याजकडे जाबसाल लाविला. त्याची खातरजमा रायाजी पा। याणीं केली. त्यानें कोळेचे दोन दरवाजे उघडून दिल्हे. त्या मार्गें याजकडील फौज व पलटणें आंत शिरून, एका पलटणासी लढाई होवून, याजकडील जखमी व जाया च्यारसें माणूस जालें. पलटण पळून गेलें. चाळीस तोफा वगैरे सरंजाम सरकारांत आला. मौजे कोळे येथील ठाण्याचा बंदोबस्त करून, रामगडास घेरा घालून, रायाजी पा। आहेत. कांहीं कांहीं दिवसा रामगडही खाली होईल. आंत जमादार व पलटणवाले आहेत, त्यांत फूट आहे. त्याजकडीलही बोलणीं लागलीं आहेत. प्रत्ययास येऊन गड खाली जालियावर विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.