Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक २४२.

१६९६ श्रावण शुद्ध १३.

पो। छ० २७ ज॥खर श्रावण

शेवेसी कृष्णाजी सिवदेव सां।। नमस्कार विज्ञापना. ता।। श्रावण शुद्ध १३ मुकाम अवंतिकापुरीं येथें स्वामीचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपली रबीची वरात रतलामेवरी खंडेराव त्रिंबक याजवरी होती. चैत्रअखेरचा वायदा होता. त्यास वैशाखमासीं ऐवजाची निकड म॥रनिलेस केली तेव्हां सरकारांतून च्यार दिवस ऐवज न देणें ह्मणोन कादारास ताकीद केली. त्याजउपरीं इंदुरास श्रीमंत आले तेव्हां आह्मी या समागमें गेलों. तेथे राजश्री आबाजी माहादेव याचे व पाटीलबावाचें रहश करून दिल्हें आमचे ऐवजाची निकड लाविली तेव्हां ताकीदपत्र कादरास दिलें. तो तेंच लस्करास आले मागती त्यांनी दोन महिन्याचा वायदा करून घेतला कीं रसदेचा ऐवज तूर्त सरकारांत द्यावा लागतो. यास्तव दोन महिन्यांनीं ऐवज पडे ऐसे सरकारांतून करार करून त्यांणी घेतला तो दोन महिने जाहाले रसदेचा हि ऐवज त्यास मिळेना. आणि लोकांचें हि त्यास देणें फार. माहालचा ऐवज वसूल घेतला तो मागील कर्जदारास दिल्हा. पुढें आणखी कर्जदारांनी त्यास फारच अडविलें. रसदेचा ऐवज मिळेना. तो आमचे ऐवजास ठिकाणच नाहीं. दुसरेयास मामलत सांगावीं ऐसें जाहाले. आह्मीं आपलें ऐवजाविसीं सरकारांत निकड लाविली तेव्हा त्यांणी सांगितले कीं तुह्मांस ऐवजाचे अगत्य असलें तरी सालमजकूरचा रसद देऊन जमा मामलत करणें ह्मणजे त्याची बाकी रांगड्याकडे असेल ती तुमचे हातास येईल. नाहींतरी येणार नाहीं. खंडेराव यास निकड लावावी तरी त्याची अवस्ता फारच कठीण. त्रिंबक मल्हार याजवरी चिठी देणें ह्मणोन निकड लाविली परंतु त्याचें चित्त शुध नाहीं. त्यांणी त्यास बाहेर घातलें. चीठी कांही कबूल करणार नाहीं. याचे स्वाधीन त्यांणीं शें दोनशें घोडे मात्र केले. ऐवज झाडून देशास घेऊन आले. त्यामुळें त्यास कर्ज भारी जाहालें. दुसरेयाणीं मामलत केली तरी बाकी आपले हातास येणार नाहीं. ऐसें जाणोन मामलत आपलेकडे करून घेतली. नर्मदेपर्यंत लष्करासमागमें गेलों होतो. कळावें. आषाढमासीं नर्मदेचे मुकामींहून मामलत आपलेकडे करून घेऊन येथें आलों. चवथ व नजराणा मिळोन पंचावन हजार रुो॥ तूर्त द्यावे लागले यांची तरतूद हा कालपर्यंत करितो. रु॥ उजनींत मिळत नाहींत. सावकाराचीं झाडून दिवाळी निघालीं फारकरून ऐवजाची तोड पडली. एका दो दिवसांत रतलामेस जाऊन आपले बाकीची रुजुवात करितों. रांगडे पंधरा वीस हजारांपर्यंत बाकी कबूल आहेत त्यास रुजुवातमुळें जाजती निघेल. त्याप्रें॥ वसूल करून लौकरी च पाठवितों. कार्तिक मार्गश्वर मासीं वसूल चालीस लागेल. पेशजी आठावीस हजार राजश्री विष्णुपंत बाबाकडे भरले. हाली आज्ञा कराल तेथें जमा करितों आह्मी येथील बाकीची रुजुवात करितों त्याची निशा पत्रीं घेऊन दुसरियाचे सुमारे भेटीस येतो. पुढें आणखी ऐवज सिंदे याजकडे येणें त्यास आपली त्याची समक्ष होईल तेव्हा त्याची तोड निघेल. याजकरितां लवकरच येतों. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

रोजमरा छ. १६ सफरचा सर्वाबद्दल दिल्हा आहे. आघाव मात्र दिल्हे आहे. तेहि लिहिलें आहेत. कलम १.

बऱ्हाणपूरच्या मुकामींऊन एक पत्र व उजनीच्या मुकामी पावल्यावर दोन पत्रें अजूरदार याजब॥ पाठविलीं आहेत. पावली असतील. कलम १.

येजमानाकडे पाठविले बाकी ऐकूण तीस हजार च्यार से वसूल जाले नाहींत त्याची वरात पाटीलबावाची घेतली ती च दाखविली. आह्मी उत्तर केलें कीं आह्मांस बरातेसी समंध काय आहे येथें खर्चास लागेल ते तुह्मांपासून घेत जावें याप्रें॥ आज्ञा आहे त्याचा जाबसाल केला कीं येथे दुसरा ऐवज कोठून द्यावा सारांष आह्मी तगादा करावयास आळस करीत नाहीं. परंतु प्राप्त होणें कठीण आहे. एक पत्र हि आपण कुशाबास ल्याहावं कीं हर तजवीज करून च्यार पांच हजार रु॥ बाबूराव याजकडे देणें मग जे वसूल होतील ते घेऊं परंतु पत्र पाठवावें. कलम १.

येथें तीन घोड्या सरकारच्याव दोन तटे राहिलीं आहेत व येक घोडी आमची येकूण साहा त्याजला माणसें तीन मात्र मोतादार ठेविले आहेत. अधिक नाहीं व दोन गाडीचे बैलाविसीं कुशाबास सांगितलें आहे. हे देऊन दुसरे तरणे घेतो. बैल आणून देतों. ह्मणोन मान्य केलें आहे. बाळाजीपंताकडून दोन माणसें चौकी पाहरियास घ्यावयाची सोय नाहीं. त्याजला विचारिलें त्यांणी उत्तर केलें कीं तुच्या वाडियासमोर क॥दार राहतात त्याचीं माणसें तुमच्या दरवाजियासमोर आहेत त्यास आह्मीं सांगितलें आहे तुह्मी चौकी पाहरियाची काळजी न करावी. रुबरु हि क॥दार याची करून दिल्हीं आहे. क॥दार याच्या दरवाजियास व आपल्या दरवाजियास मधी गली मात्र आहे. अष्टौ प्रहर माणसें क॥दार याचीं आपले दरवाजियापुढें असतात. क॥दार यास हि आह्मीं सांगितलें आहे चिंता नाही. कलम १. 

चिरंजीव राजश्री मुकुंद आपा याजवर हजार रुपयाची उंट गवत बाहेरून गाव खेडियाहून आणवावें लागेल यास्तव ठेविले आहेत. से॥ दापीबाई याजकडे येक खिसमतगार नवा ठेवून दिल्हा आहे. मातुश्री कामीकडे सटवा आहेच. त्र्यंबका कोठीचे कामावर व जामदारखाना याचे खोलींत आहे. खोली मजबूद आहे. संदूख मेळवितो. त्यांत लिहिल्याप्रों।। ठेवित जाऊं. पिराजी स॥दार व लक्ष्मण व समाधान व तुळाजी खास बारदार येकूण चौघे आहेत. रात्रीं चौघांनीं च्यार प्रहर जागत जावें. देवधर्मास जाणें तरी येथील घरचा बंदोबस्त राखून बरोबर जातात. चिंता नाहीं. जामदारखानियाचे खालीं जवळ नेहमी समाधान पूर्व्या अष्टौ प्रहर बसवीत असतो. त्याजला दुसरें काम नाहीं. कलम १.

चिठी बऱ्हाणपुरीं दिल्ही होती त्यास म॥निले आपले भेटीस आले याजमुळें आमची व त्याची भेट जाली नाहीं. हरिश्चंद्रपंत तेथे होते त्याजला ऐवजाविसीं विचारलें त्याच्यानें कार्य जाले नहीं. दोन माणसें तेथून ही आणली होती उजनीस पावल्यावर त्याजला निरोप दिल्हा. बसू जासूद व गोविंदा ह्मणोन प्यादा येकूण दोन असामी होत्या. कळावें. कलम १. 

गवताची व लांकडाची बेगमी पुर्ती बाळाजीपंत याजकडून होतां दिसत नाहीं. जे होईल ती करून बाकी खरीदी करावी लागेल. कलम १.

येणेंप्रमाणें कलमवार लिहिलें आहे त्याजवरून विदित होईल. स्वारी इकडे येणार त्यापूर्वीच सूचना अगोधर आली ह्मणजे दाणादुणा खरीदी करणें तरी ठीक पडेल. नाही तरी माहागाई होईल ऐसें आहे. यास्तव अगोधर सूचना असावी. तिकडून कोण्ही नासिकास जाईल तरी बाबाजी गणेश याजला नासिकच्या बंदोबस्ताविसीं लेहून पाठवावें. तेथें दाणादुणा कांही आहे. हरभारा तो व बधारियाच्या बागांतील भात वगैरे होईल ते प्रोख्त करवावें. आतां ठेऊन उपयोग काय आहे. सेवेवीं श्रुत होय हे विज्ञापना. आपलेकडील वर्तमान वरचेवर लेहून पाठवीत जावें. हे विज्ञापना.

येथे कोट व हालीं सिका चालतो. येथून तट्टें पांच व उंटें दोन सामानसुद्धां पाठविलीं आहेत. पावतील. आपाजी सावाजी याची पालखी पो।। आहे. त्याच्या भोयांस आलेले हिसेब खर्चास आणखी हि जेथवर प्रेत्न होऊन गवत व लांकडें येतील तीं घेतच आहों. बाकी गवत व लांकडे विकत घेणें लागतील त्यास कुशाबांनीं येथे उज्जन प्रगणियापैकीं दोन गांव कमाविसदारापासून केले आहेत येथून पांच सात कोस तेथें गवताची व लांकडाची सोय पाहून खरीदी घेतों. गवताचा भाव त्या खेड्यांत रुपयाचे हजारा बारासे मिळतें. पेंढी नासिकच्या आपल्या कुरणच्या पेंढीप्रो।। आहे. येथें शहरांत गवत रुपयाचे पांच से अधिक मिळत नाहीं तेव्हां खेड्याहून आणवावें हें उत्तम दोन उंट येथें आहेत व दोन तट्टें आहेत घेऊन येत जातील. पेंढी लहान फार आहे. कडबा रुपयाचा तीन से च्यार से मिळतो. परंतु च्यार से कडबा मिळून आपल्याकडील ऐसी शंभर पेंढी होईल याप्रमाणें लहान पेंढी आहे कुशाबाच्या गांवापैकींच कांही रुपये २५ पंचवीस दिल्हे आहेत व तटें उंटे याजला खर्चास मार्गी हणवंताजवळ रु।।२५ पंचवीस दिल्हे आहेत त्याचा हिसेब तेथें समजून घ्यावा. लक्ष्मणराव पाग्या याजब॥ पाठविली आहेत. लक्ष्मणराव याची व हणवंताची रुबरू करून दिल्ही आहे. मार्गीं सांभाळून घेऊन जाईन. तेथें पोंचऊन पत्र पो। याप्रों।। करार केला आहे. जामदारखानियामागें राहावयास मिसल नेमून घेतली आहे. चौकी पाहरा करवून नेऊन पांचवितों ह्मणोन मान्य केलें आहे. कलम १.

येथून पागेचा सरंजाम वगैरे पाठविला आहे त्याची याद अलाहिदा असे. कलम १.

कुशाबाकडून कांही येवज हस्तगत करणें येविसींचा तगादा मारनिलेस लाविला आहे. त्याणें उत्तर केलें कीं अठावीस हजार रुपये वसूल जाले ते सोय पडली तरी तेथे घेऊं. सोईचा असल्यास नाहीं तर गवतच घेऊं. कलम १.

येथून मोत्तादार वगैरे पाठविले आहेत त्यास आदा येणेंप्रों।। 
-------------------                           रोजमरा              आघाव 
हणवंता खो।                                      ३                        ५
येसू                                                  ३                        ० 
गुणाजी                                             ३                        ३ 
भवानी                                              ३                        ०
सारवान                                            ३                        ० 
आणिक नवा                                     ०                        २
ठेविला दरमहा
रु॥ ४ छ० मजकुरापासून
तेरीख पडले काम करावे तूर्त

                                                --------                  --------
                                                   १५                        १० 

श्रीह्माळसाकांत.

लेखांक २४१.


छ० १५ रोबल

१६९६ वैशाख शुद्ध ४.

विज्ञापना येथील वर्तमान ता।। छ २ रावल मु॥ अवंतिकापुर येथास्थित असे. विशेष. येथील मजकुराचीं कलमें येणेंप्रमाणें.

चिमाजी नारायेण याच्या वाड्यांत रहावयास जागा दिल्ही आहे. कुशाबा हि पहिल्यापासून याच वाड्यात रहात होते त्या प्रें॥ दुसरी जागा निकालस येथें मिळणार नाहीं. क्षिप्रेचे उदक समीप व देव हि समीप यास्तव सर्वांच्या विच्यारें येथें रहावें असे ठरलें त्याजवरून येथें राहिलों. घोड्याची सोय वाड्यांतच जाली आहे. पालखीस व उंटास मात्र जागा येथें नाहीं. त्याजला दुसरे ठिकाणीं जागा करून दिल्ही आहे. जाग्याची बेगमी जाली आहे. चिंता नाहीं. कलम १.

राजश्री बजाजीपंत नि॥ पाटीलबावा याजकडून हजार रुपये येणें त्याजप्रों।। बऱ्हाणपुरचे मुकामीं तिनसे रुपये घेतले व येथें तीनसे येकूण सा शे रुपये घेतले. बाकी च्यार से राहिले. ते हि येका दो रोजांनीं देतों म्हणोन म॥रनिलेंनीं मान्य केलें आहे. यासिवाय खर्चास लागल्यास मी देईन. तुम्हीं कोण्हेविसीं चिंता न करावी म्हणोन आमची खातरजमा केली आहे. पीरखान हि वरचेवर समाचार घेत असतो त्याणें हि सांगितलें आहे कीं दोन च्यार हजार रुपये तुम्हास लागल्यास राजश्री बाळाराव यांणीं येथें गोपाळपंत कारकून याजवर चीठीं दोन हजार रुपयाची दिल्ही त्यास म॥रनिलेस चीठी दिल्ही त्यांणी आह्मासी उत्तर केलें कींदोन हजार रुपये देविले परंतु नेमून दिल्हा नाही तथापि तुची खर्चाची अडचण तरी से दोन (से) रुपये देतों तेव्हां आह्मी त्याजला खर्चाची वोढ फार सांगितली मग पांच से रुपयाची चीठी सावकारावर घेतली आहे परंतु येथील चालीच्या सिक्यास व भूपाळ व कुरराचे चालीस ऐवज त्याणें देवीला. त्यास दर सेकडा पांच सा रुपये बटा पडतो तयाजमुळें गोपाळपंत याजकडे दोन तीन वेळा गेलों यावरोन ऐवज दुसरा नाहीं ह्मणतात त्यास मी देईन. तुह्मी दुसरियाजवळ न मागावे. जे समईं तुह्मांस पाहिजेत ते समईं सांगावे याप्रों।। सांगितले आहे सारांष उभयताचें लक्ष आपले ठिकाणीं लागलें आहे मार्गीं येतांना हि वारंवार परामर्ष करीतच आले वोझेंपाझें व घोडीं पागेपैकी जे समईं मागितलीं ते समईं देऊन सांभाळून आणिलें. येथें हि कोठें देवधर्मास जाणें तरी घोडी रथ पाहिजे तरी सांगत जावें. पाठवून देऊं. याप्रों।। त्यांचे निरोप हि येत असतात. आह्मांस कोठें जाणें परंतु त्याजकडून अनमान कांहीं नाहीं. गवताचे व लांकडें जळाऊ याचें विचारिलें आहे. थोडीबहुत बेगमी करितों ह्मणोन बजाजीपंत यांणीं मान्य केलें आहे त्याजपैकीं दोन गाडे लांकडें जळाऊ आज पाठविलीं मागती येक वेळ त्याजकडे जाऊन काही बट्टा कमी जाला तरी उत्तम नाहीं तरी निदान पक्ष येवज बट्टादेऊन घेतों बाकी दीड हजार रुपयेविसीं बाळारावजीस त्यांणी लि॥ आहे. त्याचें उत्तर येईल तेव्हा देणार ऐसा भाव बोलण्यांत दिसतो. त्यास येक पत्र बाळारावजीचे गोपाळपंत याजला घेऊन जरूर पाठवावें कीं उजनींत ऐवज बट्टा न पडतां चालत असल्याप्रों।। ऐवज देणें दिक्कत न करणें याप्रों।। घेऊन पाठवावें ह्मणजे ऐवज त्यापासून घेतो. हाली चीठी दिल्ही आहे तो तर ऐवज घेतो. कलम १.


श्रीह्माळसाकांत.

लेखांक २४०.


१६९६ आषाढ वद्य १४.

राजश्री बाळाजी विश्वनाथ प्रे॥ मोह गोसावी यांसि.
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेरबहादर दंडवत. सु॥ खमस सबैन मया व अलफ. बदल देणें बाबूराव कासी रोजमुरा व अर्जबाबचे येवजी प्रों।। मजकूर येथील सालमजकूरचे रसदेचे येवजी रु।। १००० येक हजार देऊन पावलियाची कबज घेणें. मजुरा असे. श्रावण अखेर निमे भ॥ अखेर निमे देऊन कबज घ्यावें. जाणिजे. छ. २७ जमादिलावल.


240

मोर्तब सुद.
बार.

श्री.

लेखांक २३९.


नकल.

१६९६ आषाढ वद्य ५.

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य रे॥ बाळाजी कृष्ण गोसावी यांसि:-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु॥ खमस सबैन मया व अलफ. राजबाग राजश्री चिंतो विठ्ठल यांस ईनाम आहे. त्यास बागेच्या बेगमीस व बैल चरावयास मौजे कोथरुड येथील कुरण पेशजीपासून बागाकडे आहे. तें हालीं तुम्हीं जफ्त केलें आहे. ऐश्यास बागाचे बैल सालाबाद चरतात, तेथें चरूं देणें. व बागेचे बैलाचे बेगमीस तीस पसतीस हजार गवत निघतें तें काढीत असतात याप्रों।। कुरण आहे तें बागाकडे पेशजीप्रों करार केलें असे तरी राजाबागाकडे चालवणें. जाणिजे. छ १८ जमादिलावल. आज्ञा प्रमाण. सिक्का. मोर्तब.
बार.

श्री.

लेखांक २३८.


१६९५।१६९६.

हिसेब रंगो सखाजी सिलेदार सु॥ अर्बा सबैन त॥ खमस सबैन सालिना तैनात बोली बारमाही नक्की रु।।.

238 1

 238 2

श्रीमार्तंडभैरव.

लेखांक २३७.


१६९५ पौष वद्य १३.

राजश्रीराव विराजित राजमान्य राजश्री भावान नाईक राक्षे स्वामीचे सेवेसीं.
पो।। भगवंतराव शंकर सां।। नमस्कार विनंति उपरी राजश्री बाबूराव रामचंद्र यांसि रु॥ ५२०० पांच हजार दोनशें तुम्हांकडून देविले आहेत हे वैशाखअखेर देणें मिती शके १६९५ विजईनाम संवत्छरे पौष वद्य १३ मु. तुंगाभद्रातीर जेष्ठ शुद्ध प्रतीपदेपासून रु॥ पुढें राहिले तर दरसद्द रु॥ .॥. प्रें॥ व्याज देऊं हें खत लिहिलें सही.

हस्ता अक्षर कृष्णाजी सखादेव दि॥ म॥र.

श्री. 

लेखांक २३६.


१७०१ कार्तिक शुद्ध ८.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. र॥ व्यंकटराव पिलाजी यांजकडे पत्रें पाठवावयाचीं असल्यास अगोधर पाठवावी, ह्मणोन वगैरे मजकूर लि॥ ते कळले. त्यास हरजीवनराव व हणमंतराव या उभयतां कारकुनांस पत्रें लेहून पाठविली आहेत. जिदा बंदर येथील हकमांसहि खलिता पाठविला आहे. त्यास, ज्याहाज जाऊं लागलें ह्मणजे हीं पत्रें रवाना करणें. आजपर्यंत कारकून बंदर जिदा येथेंच होते. त्यास ज्याहाज सोईचें पाहून जर तें बंदर- मजकुरी असल्यास तेथें त्यांस पावतें करावें. नाहीं तरी, पुढें विलायतेस गेल्यास तेथें त्यांस जाऊन पोहचत अशा सोईच्या जहाजांवर रवाना करणें. जिदा बंदर येथील हकमांस खलिता आहे तो त्यांस पावता करावयाविसीं जहाजवाल्यास सांगोन रवाना करणें. तुमचे तीर्थरूपांस आरोग्य जाहलें असल्यास तुह्मीं हजूर येणें. जाणिजे. छ ७ जिलकाद. जनरल गाडर्ड येथून मुंबईस गेले आहेत, त्यास खलिता पाठविला आहे. हा पोहोंचतां करून उत्तर घेऊन पाठवणें. छ मजकूर. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ १९ जिलकाद
सन समानीन.

श्री. 

लेखांक २३५.


१७०१ आश्विन वद्य १०.

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. बेहराम पारसी याचीं मुलेंमाणसें यांचे खर्चाची नेमणूक दरमां रुपये ५ पांच करार करून पेशजी सनद सादर जाहली आहे. त्यास, तुह्मांकडून येक रोजमरा मात्र पावला, बाकी पावलें नाहीं. सबब, हुजूर ई॥ छ १ जिलकाद सन तिसा ता।। सवाल अखेर सन मजकूर पावेतों हिसेब रुपये ५५. पैकीं आदा हुजूर रुपये ३० तीन व तुह्मांकडून रुपये ५ ऐकूण पस्तीस रुपये आदा होऊन, बाकी रुपये २० बीस तुह्मांकडून देविले असेत तर पेशजी सनद दिल्ही आहे ती पाहून सनदेंत ज्या महिन्यापासून रोजमरा देत जाणें ह्मणोन लिहिलें असेल तें हस्तकबिल धरून, हिशेब होईल त्यांत पस्तीस रुपये वजा देऊन, बाकी वीस रुपये देविले आहेत. यांत जे निघतील ते देणें. पुढें सदरहूप्रमाणें पांच रुपये दरमहा देत जाणें. जाणिजे. छ २३ सवाल. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ ३ जिलकाद सन समानीन.
बार.