Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

एकापरदशन् = एकाअअदशन् = एकादशन्

असें वैदिक व संस्कृत रूप निघतें. अधिक Additional या अर्थी अपर शब्द आहे. पूर्ववैदिकांतून वैदिकांत येतांना एकापरदशन् चा एकादशन् अपभ्रंश झाला असें जरी कबूल केलें तत्रापि वैदिक व संस्कृत एकादशन् पासून महाराष्ट्री एआरह शब्द कसा निघावा ? मध्यें च र कोठून आला ? तेव्हां एआरह हा एकादक या वैदिक व संस्कृत शब्दाचा अपभ्रंश नाहीं. हा एआरह महाराष्ट्री शब्द पूर्ववैदिक एकापरदशन् शब्दाचा अपभ्रंश मानला तर च र ची उपपत्ति लागते.

एकापरदशन् = एआअरदशन् = एआअरअह = एआरह म्हणजे महाराष्ट्री ही संस्कृताचा साक्षात् अपभ्रंश नसून, वैदिक व संस्कृत भाषांच्या बरोबर पूर्ववैदिक भाषेपासून निघालेल्या अपभ्रंशाचा अपभ्रंश आहे, असें म्हटल्याशिवाय गत्यंतर नाहीं. वैदिक व संस्कृत भाषा प्रचलित असतांना, पूर्ववैदिकापासून निघालेला एक किंवा अनेक अपभ्रंश किंवा प्राकृत भाषा चालू होत्या व त्या प्राकृत भाषांचा अपभ्रंश महाराष्ट्री आहे. आणि हें उघड आहे. देशांत शिष्ट भाषा व अपभ्रष्ट प्राकृत भाषा एकाच कालीं असतात, हें आपण प्रत्यक्ष पाहातों. पुण्याची शिष्ट मराठी भाषा चालू असतांना, इतर प्रांतिक मराठी भाषा व जातिपरत्वें कुणबाऊ, परभी वगैरे अपभ्रष्ट मराठी भाषा हि चालू असतात. तद्वत् च पूर्ववैदिक, वैदिक, व संस्कृत शिष्ट भाषा चालू असतां, इतर प्रांतिक व जातिक प्राकृत भाषा ऊर्फ अपभ्रंश चालू असले च पाहिजेत.

महाराष्ट्री एआरह पासून अपभ्रंशांतील एग्गारह शब्द निष्पन्न होत नाहीं. आ चा ग्गा कसा व्हावा ? तेव्हां अपभ्रशांत जो एग्गारह शब्द सांपडतो तो इतरथा व्युत्पादिला पाहिजे.

एकापरदशन् = एगाअरअह = एग्गारह

अशी परंपरा दिसते. महाराष्ट्रींत संस्कृत क चा अ होतो. परंतु अपभ्रंश ज्या प्राकृतांपासून निघाला त्यांत संस्कृत क चा ग्ग होत होता. अर्थात हेमचंद्रानें दिलेला अपभ्रंश, महाराष्ट्रीचा अपभ्रंश नव्हे; दुसर्‍याच कोणत्या तरी प्राकृताचा अपभ्रंश आहे.

अपभ्रंशांतील ऍग्गारह शब्दापासून मराठी अकरा शब्द निघूं शकतो.

ऍग्गारह = ऍकारा = अकरा
येथें ग चा क होत आहे. तात्पर्य मराठी अकरा हा शब्द पूर्ववैदिक एकापरदशन् शब्दापासून प्राकृतद्वारा निघालेला आहे, एकादश या संस्कृतशब्दद्वारा निघालेला नाहीं.

येथपर्यंत संस्कृतांतून महाराष्ट्रीद्वारा व अपभ्रंशद्वारा एकपासून दहापर्यंत मराठींत आंखांचीं नांवें नियमाप्रमाणें निष्पन्न होतात. ह्यांच्या निष्पत्तीसंबंधानें कांहीं एक अडचण नाहीं. पण संस्कृत एकादशपासून मराठी अकरा कसा निघतो, हा प्रश्न आहे. एकादश या संस्कृत शब्दाचें नियमांप्रमाणें एआअह असें रूप व्हावें. परंतु तें तसें होत नाहीं. एआरह असें होतें. अपभ्रंशांत एग्गारह असें रूप आढळतें. आणि वर्तमान मराठींत अकरा असें रूप आढळतें. अर्थात् महाराष्ट्री एआरह संस्कृत एकादशपासून निघालेला नाही. मध्यें र कोठून आला ? अपभ्रंश एग्गारह महाराष्ट्री एआरह पासून आला नाहीं. कारण महाराष्ट्री एआरहचें अपभ्रंशांत एआग, आरा, एरा अशीं रूपें व्हावीं. तसा कांहीं एक प्रकार न होतां एग्गारह असें अपभ्रंशांत रूप आढळतें. तेव्हां, अपभ्रंश एग्गारह महाराष्ट्री एआरह व संस्कृत एकादश यांपासून निघालेलें नाहीं. मराठी अकरा अपभ्रंश एग्गारहपासून निघूं शकेल. एग्गारह = एकारा = अकारा = अकरा. पण अपभ्रंश एग्गारह तरी कोठून आला ? मध्यें र कोठून आला ? खुद्द संस्कृत एकादश शब्द कसा निष्पन्न झाला ? एक = दशन् = एकदशन् व्हावें; पण वस्तुतः एकादशन् होतें. क चा का काय म्हणून झाला ? पाणिनि एवढेंच सांगेल कीं, एक व दशन् यांचा समास होतांना क तील अ चा आ होतो. कशाचें काय होतें एवढेंच पाणिनि सांगेल. पण कां होतें हें पाणिनि सांगत नाहीं. एक + अ + दशन् = एकादशन्, अशी वास्तविक स्थिति आहे. येथें जास्त अ कां आला व कोठून आला ? माझ्या मतें एकादश हें रूप पूर्ववैदिक म्हणजे वेदाच्या हि पूर्वीच्या भाषेंतून अपभ्रंश होऊन आलेलें आहे. अधिक या अर्थी पूर्ववैदिक भाषेंत कांहीं तरी शब्द असावा. एक + ( अधिक या अर्थी पूर्ववैदिक शब्द) + दशन् = एकादश. अशा परंपरेनें पूर्ववैदिक शब्दाचा अपभ्रंश वैदिक भाषेंत एकादश झालेला आहे. वैदिक व संस्कृत भाषांचे जसे पाली, महाराष्ट्री हे अपभ्रंश आहेत, तशी वैदिक भाषा ही पूर्ववैदिक भाषेचा अपभ्रंश आहे. एकाधिकदशन् असा लांब समास उच्चारण्याला कंटाळून, एकादशन् असा संक्षिप्त उच्चार वैदिक लोक करूं लागले. तात्पर्य, एकादशन् हा वैदिक शब्द एकाधिकदशन् या किंवा याच्यासारख्या लांब पूर्ववैदिक शब्दाचें संक्षिप्त रूप आहे, यांत संशय नाहीं. हा पूर्ववैदिक शब्द बहुशः एकापरदशन् असा असावा. संस्कृताचें महाराष्ट्रींत विपरिणमन होतांना जे नियम लागू होतात, ते किंवा त्यांच्या सारखेच नियम पूर्ववैदिकाचें वैदिक भाषेंत विपरिणमन ऊर्फ अपभ्रंश होतांना लागू होत होते असें गृहीत धरून

१६. विकार-विचार प्रदर्शक ४० साधने व इतिहास

असो. वीस शुद्ध व वीस शबल मिळून चाळीस साधने विकारविचारप्रदर्शनाची वर्णिली. ह्या चाळीस साधनांच्या साहाय्याने कोणत्याही देशाचा व तेथील भूत व वर्तमान लोकांचा इतिहास जाणावयाचा असतो. आपल्या महाराष्ट्राचा व ह्या भूमीतील भूत व वर्तमान लोकांचा इतिहास याच साधनांच्या साहाय्याने लिहिला जावयाचा आहे. अलीकडील पन्नास वर्षांत या चाळीस साधनातून फक्त अक्षरसाधने जी कागदपत्रे व ग्रंथ त्याकडे आपले विशेष लक्ष्य वेधून गेले. अल्पद्रव्यात अल्पश्रमाने याच साधनांची सहजोपलब्धी प्रथम होणे शक्य होते. तेव्हा झाले ते ठीकच झाले. परंतु या एका अक्षरसाधनाच्या उपलब्धीने सर्वच कार्यभाग आटपत नाही. अक्षर हे विचाराचे एक साधन आहे. अक्षराव्यतिरिक्त, आणीक एकोणचाळीस साधने राहिली त्यांची वाट काय ? अक्षराने सर्वच विचार प्रगट होतात असे नाही. अक्षराला साध्य नाहीत असे शुद्ध व शबल विचार, गान, चित्र, मूर्ती, स्थापत्य साधतात. तेव्हा ह्याही साधनांचा यथायोग्य समाचार आपण घेतला पाहिजे. अक्षरसाधनसंशोधनाहून हे संशोधन द्रव्यदृष्ट्या सापेक्षतः किंचित् जड आहे. तत्रापि जड असो वा हलके असो, या संशोधनाविना महाराष्ट्रेतिहासाचे चित्र फारच फार कोते राहील हे काही नाकबूल करता येत नाही. शिवाय अक्षरसाधन सर्व काळी सारखेच उपलब्ध असते असे नाही, पाच चारशे वर्षे सोडली म्हणजे कागदपत्रांचे सहाय्य बंद होते. फक्त ग्रंथ राहतात. त्यांना पुष्टी मूर्ती, चित्रे, स्थापत्य यांची द्यावी लागते. कित्येक कालाचा इतिहास तर अल्पस्वल्प अवशेषांवरून तर्काने अनुमानावयाचा असतो. अशा अडचणी आहेत. त्या टाळण्यास उपरिनिर्दिष्ट चाळीसही साधनांचे सहाय्य आवश्यक असल्यामुळे त्यांच्यासंबंधाने वरील सोळा कलमात किंचित् प्रपंच करणे अगत्याचे भासले.

घराला विद्युद्वाहक तार योग्य रीतीने लाविली म्हणजे विजेचे भय फारसे राहत नाही हे शास्त्रीय ज्ञान झाल्यावर, इंद्र व त्याचे वज्र ही दोन्ही भ्रांतिजन्य व काल्पनिक ठरतात व मनुष्याच्या मनातून दोघांची हकालपट्टी होते. तसेच शुद्ध हवापाणी असले म्हणजे मरीदेवीची गुमान भासत नाही. देवाची आणि देवीची जरूर कोठपर्यंत, तर संकटनिवारणाचे उपाय सुचले नाहीत तोपर्यंत. संकट निवारणाचे जसजसे जास्त उपाय मनुष्याला सुचतात तसतसा तेवढ्यापुरता देवाला कमीकमी त्रास द्यावयाचा, किंवा तो तो देव काढून टाकून पदभ्रष्ट करावयाचा परिपाठ मनुष्याचा आहे. अशा रीतीने अनेक देव खोटे ठरल्यावर एकच एक देव मनुष्य प्रौढीने कल्पितो व आपणास शहाण्यांचा शिरोमणी समजतो. पण हा एकमेव अद्वितीय देवहि हजारो प्रसंगी उपयोगी पडत नाही. शेवटी त्या अद्वितीयालाही भिरकाटून देऊन मनुष्य एक अद्वैतवेदान्ती तरी बनतो व ईश्वराला मायेच्या म्हणजे भ्रांतीच्या सदरात काढतो किंवा भौतिकशास्त्रज्ञ बनून कल्पित ईश्वराच्या ताब्यातून संकटे निवारण्याचे काम आस्ते आस्ते बळकावीत जातो. तात्पर्य, कार्याचे खरे कारण जेथे जेथे सापडले नाही तेथे तेथे भूत किंवा देव हे कारण अज्ञ मनुष्य कल्पीत आलेला आहे व खरे कारण रखडले म्हणजे भूतकारणाला किंवा देवकारणाला रजा देण्याची त्याची वहिवाट आहे. तात्पर्य, देव ही कल्पना कृत्रिम आहे, स्वयंभू नाही.

१५ देवकल्पनेचे मूळ भ्रम

मनुष्यमात्राच्या ह्या दीर्घकालीन म्हणजे लाखो वर्षांच्या शैशवावस्थेचा मंद इतिहास विचारविकारप्रदर्शनाच्या वरील शुद्ध व शबल चाळीस साधनांच्या स्थितीवरून अल्पस्वल्प अनुमानता येतो ह्या इतिहासावरून असे दिसते की ईश्वर, आत्मा, परमात्मा, काल, दिक्, कारण इत्यादी शुद्ध किंवा शबल कल्पना स्वयंभू नसून मनुष्याने शुद्ध भ्रांत अनुमानाने बनविलेल्या आहेत. अनुभवाच्या अन्वयव्यतिरेकाने शुद्धाचे काही कण मनुष्याला गावले आहेत, बाकी सर्व साम्राज्य येथून तेथून शबलाचे आहे. शबलातून शुद्वाकडे गती होत आहे. त्यातल्यात्यात समाधान. चमत्कार असा की उत्क्रांतीकडे म्हणजे इतिहासाकडे अवर्णनीय दुर्लक्ष्य असलेले दिसते. नीतिकल्पना, ईश्वरकल्पना, कार्यकारणभावकल्पना, दिक्कल्पना, कालकल्पना ह्या सर्व कल्पना लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने बनत आलेल्या आहेत हे बहुतेक कोणताच तत्त्वज्ञ लक्षात घेत नाही. जो उठतो तो स्वयंभूत्वाकडे म्हणजे ईश्वरदत्तत्वाकडे ऊर्फ उपजतस्वभावाकडे धाव घेतो. जणू काय आज ह्या घटकेला माणूस आकाशातून अचानक भूमितलावर पडला ! जणू काय त्याच्या पाठीमागे लाखो वर्षांचा इतिहास नाहीच ! लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने बनलेल्या एका कल्पनेची त्रोटक परंपरा देतो त्यावरून वरील कल्पना व त्यांचे स्वयंभूव ही दोन्ही किती भ्रांत्युद्भूत आहेत ते स्पष्ट होईल. अज्ञात प्रदेशातून ध्वनी ऐकू आला, माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना, सबब भूताची कल्पना केली. निरनिराळ्या अज्ञातोद्गम ध्वनींना, हावभावांना, आकाशचित्रांना, रोगांना, दुःखांना, सुखांना, जन्माला व मरणाला एक एक भूत कल्पिले. सुष्ट भुते व दुष्ट भुते निर्माण झाली. त्यांची उपासना सुरू झाली. नंतर रोगांची, सुखांची व दुःखाची खरी कारणे व तन्निवारक उपाय जसजसे कळू लागले, तसतशी सुष्ट भुतांची म्हणजे देवांची व दुष्ट भुतांची म्हणजे सैतानाची टर उडून जरूरी भासतनाशी झाली. विद्युत्पाताने मनुष्य मेला म्हणजे इंद्राने आपल्या वज्राने तो मारिला अशी भ्रांत समज असे व पटकीने माणूस मेला म्हणजे मरीदेवीने त्याला मारिले अशी भ्रांत कल्पना असे.

१४. लोकभ्रम शैशवावस्थादर्शक

ह्या सर्व देखाव्याचा अर्थ काय ? गेल्या तीन हजार वर्षांतील महाराष्ट्रांतल्या लोकांच्या शबल, काल्पनिक, व अस्ताव्यस्त साधनांचे, कलांचे व मतांचे हे मूर्त प्रदर्शन आहे. ह्याचा अर्थ तीन त-हांनी करता येतो. केवल श्रद्धालू जे आहेत त्यांना स्वर्गनरक ऊर्फ परलोक यातील देवादींच्या कृती या देखाव्यात दिसतात व त्या ख-याहून ख-या ते मानतात. केवळ कलेचे व शिल्पाचे जे चुंचू आहेत ते मूर्तीचे डौल, इमारतीचा घाट, चित्रांचा उठाव, रंगाची भरदारी व कल्पनेची भरारी वर्णन करण्यात दंग होतात आणि असले शिल्प आता लोपले म्हणून शोक करतात. इतिहासाचे जे अभ्यासी आहेत त्यांना ह्या देखाव्यात वरील दोघांच्याहून निराळा अर्थ दिसतो. सोंडेचा गणपती, पंखाचे देवदूत, चोचीचा गरूड, शेषशायी नारायण, चतुर्मुख ब्रह्मदेव, दशमुख रावण, घोडमुखे किन्नर, उर्ध्वशिख नारद, डोक्याच्यावर असलेला स्वर्ग व पायाच्या खाली असलेले पाताळ, हे सर्व भ्रांत कल्पनेचे खेळ आहेत, हे सर्वथैव खोटे आहेत, आणि शुद्ध शास्त्रज्ञान जसजसे वाढत जाईल तसतसा ह्याचा लोप कालान्तराने झालाच पाहिजे हे इतिहासज्ञ जाणतो आणि लोपत जाणा-या भ्रांत शिल्पाबद्दल हळहळत बसत नाही. उलटे, लोप अत्यंत मंदतम गतीने होत आहे ह्याचे त्याला दुःख होते. स्थूल मूर्तीवरचा, चित्रावरचा व वृक्षपशुपक्ष्यादींच्या प्रतिमांवरचा तरी भ्रांत विश्वास अद्याप लुप्त कोठे झालेला आहे ? आणि यद्यपि कोठे कोठे क्वचित् क्वचित् झाला, तत्रापि स्वर्ग, नरक, देव, देवदूत, जिहोव्वा, God, अल्ला, ह्या अमूर्त भ्रांत कल्पना अद्याप सर्वत्र विराजमान आहेतच. फक्त अद्वैत वेदान्ती म्हणून ज्यांना म्हणतात त्यांच्यातून व भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ज्यांना म्हणतात त्यांच्यातून काहीच्या ठाई ह्या कल्पना नष्ट झालेल्या आहेत. परंतु ह्या थोड्या काहींची संख्या पृथ्वीवरील एकंदर लोकसंख्येचा कितवा लक्षांश आहे ? अद्याप जग, बाल्यावस्थेत कसले, शैशवावस्थेतच आहे.

मध्यवर्ती देवालय प्रायः शिवाचे किंवा विष्णूचे व कधी कधी दोहोंची दोन देवळे असतात. कित्येक देवळे चालुक्यकालीन, कित्येक राष्ट्रकूटकालीन, कित्येक यादवकालीन व क्वचित् एखादे मुसलमानकालीन असते. यादवकालीन व मुसलमानकालीन देवळे साध्या हेमाडपंती घाटाची प्रसिद्ध आहेत. चालुक्यकालीन देवळे फार कलाकुसरीची व कारागिरीची असतात. प्रथम गरूड किंवा नंदी लागतो. नंतर सभामंडप सुरू होतो अणि गाभा-याच्या प्रारंभाला जयविजयांची परवानगी मागावी लागते. ती मागताना गणराजांची व त्यांचे बंधू स्कंदराज यांची प्रार्थना केल्यावर उंबरठ्याखालील कीर्तिमुखाला पायाखाली चिरडून आत प्रवेश जो करावा तो गर्भागाराची अपूर्व शोभा डोळ्यांत भरते. इथे प्रेक्षकांचे चिमुकले मन भांबावून जाते. पहावे तरी काय काय ? आधी कोणते पहावे आणि मागून कोणते पहावे ? प्रथम गर्भागार पहावा की सभामंडप पहावा की प्राकारचित्रे पहावी याचा निश्चय होत नाही. कोठे इंद्रसभा व दशावतार यांची रंगीत चित्रे काढिलेली आहेत, कोठे देवयोनी व गणदेवता यांच्या अर्धमूर्ती कोरल्या आहेत, कोठे यक्षकिन्नरराक्षस यांच्या प्रतिमा घडलेल्या आहेत, कोठे तत्कालीन राजांच्या सभा चितारल्या आहेत. हे सर्व नीट व साद्यंत व सार्थ पहावयाला महिना पुरणार नाही. नुसती उपकरणीच घेतली तर तो अटनीवरचा शंख, सर्पाकृति पळी, कमलाकृती अभिषेकपात्र, मच्छाकृती धुपाटणे वगैरे वस्तूंतही इतिहास भरलेला सापडतो. देवळांतून प्राकारांगणात येऊन खुद्द देवालयाचा पायापासून शिखरापर्यंतचा घाट पहावा तर तोही किती आश्चर्यकारक ! त्या मेहरपा, त्या जाळ्या, त्या मूर्ती, ते कोण, तो आकाशदिवा, सर्वच कांही विचित्र ! अंगणात नागशिला पडली आहे ती नागलोकांची स्मृती करून देते. पश्चिम देहलीने प्राकाराच्या बाहेर पडले म्हणजे अगदी नदीच्या पाण्यापर्यंत उतरलेला अर्धचंद्राकृती घाट लागतो. तेथे जलदेवतेचे देवालय आहे, संन्याशांच्या समाधी आहेत, चबुत्रे आहेत, सोडूनच शंभर हातांवर एक मशीद आहे, दुस-या बाजूस मातीचा एक ढिगारा दिसतो तो कदाचित् बौद्ध स्तूप असेल, पांच-चार मैलांवर डोंगरांची रांग दिसते तीत पांडवलेणी आहेत, दरम्यानच्या अंतरात ख्रिस्त्यांनी अलीकडे तीन-चारशे वर्षांत नवीनच उभारलेले एक क्याथोलिक चर्च आहे, आणि त्याच्याच जोडीला समाजिस्टांचे दहावीस वर्षांतले एक लहानसे साधे प्रार्थनामंदिर आहे.

भगवा झेंडाही इंद्रध्वजच आहे. ध्वजदंड या शब्दाचा मराठी अपभ्रंश ध्वजदंडः = झअअंडा= झेंडा. आणि भगवान् जो इंद्र त्याचा अपभ्रंश भगवा. भगवदध्वजदंडः = भगवा झेंडा. पाचवी काठी पेशव्यांच्या जरीपटक्याची आहे. जरीपटका म्हणजे पुनः इंद्रध्वजच. इंद्राच्या ध्वजाला जर्झरं म्हणून संस्कृत नाव असे. पटक म्हणजे कापडाचा तुकडा. जर्झरीकपटकः= जरीपटका. जरीपटका म्हणजे इंद्राचे निशाण. पेशव्यांनी ते नवीन शोधून काढलेले नाही. वैदिक कालापासूनचे ते जुनेच आहे. मध्ये मुसलमानी धाडीत देवळातून लपून राहिले होते ते छत्रपतीनी व पेशव्यांनी सैन्यात पुनः प्रचलित केले इतकेच. ह्या ऐतिहासिक काठ्यांच्या शेजारी अत्यंत जीर्ण झालेले व पावसापाण्याने झडलेले दहा पाच दगड तुमच्या सूक्ष्म नजरेखाली येतील. दगड पुरुषपुरुष किंवा अर्धा पुरुष उंच व हात पाऊण हात रुंद आहेत व त्यावर तीन चार मजली अर्धमूर्ती कोरलेल्या आहेत. कोरकाम ओबडधोबडच आहे, परंतु म्हसोबा, विरोबांच्याहून जास्त कुसरीचे आहे. एका मजल्यात शिवलिंग व स्त्रीपुरुष उपासक कोरलेले आहेत. दुस-या मजल्यात भालेवाले घोडेस्वार कोरलेले आहेत. तिस-या मजल्यात मोठमोठ्या ढुंगणाच्या नितंबिनी व कुंभस्तनी महाराष्ट्रवधूटिका कोरलेल्या आहेत. ह्या अर्धमूर्ती दगडांना कांदळ किंवा कांदळाचे दगड म्हणतात. महाराष्ट्रात असे एक गाव नाही की जेथील देवळाबाहेर, शेजारी किंवा आत हे कांदळ सापडणार नाहीत. हे कांदळ केव्हाचे ? ज्या काली पर्वतात व गुहांत व द-यात लेणी कोरण्याचे वारे महाराष्ट्रात शिरले तेव्हाचे. कांदळ हा शब्द कांदर या शब्दाचा अपभ्रंश. ' कंदरस्य इदं कांदरं.' कंदर म्हणजे पर्वतातील कोरीव लेणे. हा कंदर शब्द वाल्मीकि- रामायणात येतो. कंदरपूजा ऊर्फ लिंगपूजा महाराष्ट्रात फार जुनी आहे. बौद्धांपासून लिंगपूजकाचे संरक्षण करणारे भालेवाले कंदरांवर कोरलेले आहेत, बहुशः बौद्धांचा पराजय व लिंगपूजकांचा जय सुचवलेला असावा. ज्या अर्थी प्रत्येक खेड्यात कंदर सापडतात त्या अर्थी एका काली बौद्धांची व शैवांची मोठी दंगल महाराष्ट्रात होऊन गेली असावी असा तर्क होतो. कांदळांपैकी काही दगड अती जुने व काही अनुकरणाने केलेले बरेच म्हणजे फक्त पाच-सातशे वर्षांपलीकडील अर्वाचीन असे दोन प्रकारचे असतात. ह्या कांदळाशेजारी किंचित् अंतरावर वीर असतात. असुर, राक्षस, शक, यवन व मुसलमान यांच्यापासून शौर्याने गावाचे संरक्षण करण्यात देह ज्यांनी खर्चिला त्यांचे पुतळे देवळाच्या आवारात बहुमानाने मांडून ठेवण्याची चाल महाराष्ट्रात असे. मूर्ती ग्राम्य कारागिरीच्या असतात व काहीच्या खाली लेखही कोरलेला असतो.

मुफस्सल मधील जुना विदीर्ण झालेला एखादा देऊळवाडा घ्या आणि ज्या भागात तो कालाने किंवा देऊळफोड्यांच्या हाताने छिन्नभिन्न झाला असेल ते भाग कल्पनेने एकत्र जुळवा. प्रथम जुनाट पिंपळ व वड यांचे पार लागतील. हे वृक्ष ब्राह्मण आहेत व ह्यांच्यावर ब्रह्मराक्षस रहातात. भ्रांतदृष्ट्या ब्रह्मराक्षस म्हणजे एक व्यंतरयोनी समजतात. ऐतिहासिक दृष्ट्या ब्रह्मराक्षस म्हणजे ब्राह्मण व राक्षस यांच्यापासून झालेली एक पुरातन संकर जात समजली तर फारसे चुकणार नाही. ज्या काली देशात राक्षसांची वस्ती होती त्या कालचा हा संकर असेल. ह्या वृक्षांच्या पुढे एखादा म्हसोबा किंवा विरोबा किंवा पोटोबा लागेल. एक साधा ओबडधोबड दगड व त्याला शेंदूर फासलेला चांगली नक्षीदार मूर्त करता आली नसती असे नाही. परंतु हे म्हसोबा वगैरे देव फार साधे व ओबडधोबडच असतात. त्यांच्या ओबडधोबडपणात इतिहास आहे. पुरातनकाली हे देव ज्या लोकात अस्तित्वात आले त्यांना ह्याहून जास्त कौशल्याची मूर्तिकला माहीत नव्हती, आणि माहीत असली तत्रापि स्वयंभू ओबडधोबड मूर्तीपुढे कृत्रिम सुंदर मूर्तीची किंमत त्यांना वाटत नव्हती. थोडे पुढे गेलात म्हणजे एका बाजूला वेताळसभा लागेल. हा वैशिष्ट्याने महारलोकांचा म्हणजे नागलोकातील एका कनिष्ठ जातीचा देव आहे. दुस-या बाजूला दगडाच्या एका देवळीत एक दगडी दिवा जळताना आढळेल. ही दगडी देवळी पितरांची आहे आणि दिवा रात्रंदिवस त्यांना उजेड दाखविण्याकरिता पाजळत आहे. दहा पाच हातांवर गावातील दोन चार सतींची देवळे लागतील. त्यावर दांपत्य कोरलेले असते. नंतर मारुतीच्या देवळापाशी याल. वैदिककालीन मरुत् म्हणजेच पौराणिकालीन मारुती, मरुत्, मारुतः, मारुतिः अशी तिसरी पिढी आहे. मारुती हा पांथस्थांचा संरक्षक. ह्यांच्यापुढे देवडी व त्यावरील गोपूर भेटेल. गोपुरात पूर्वी देऊळवाड्याच्या गाई बांधीत असत. सध्या तेथे वाजंत्र्यांचा ताफा रहातो. गोपुर पूर्वाभिमुख असून त्यातून प्राकारान्तः प्रदेशात जाण्याचा रस्ता आहे. प्राकार दोन अडीच पुरुष उंच असून त्यांच्या विटा हातहात लांब आहेत. प्राकार दुमजली आहे. खालच्या मजल्यात चौफेर वोव-या केल्या आहेत व वरच्या उघड्या मजल्यावरून शत्रूवर तिरंदाजी किंवा गोळीबार करण्याकरिता तटात छिद्रे ठेविली आहेत. देऊळ एकप्रकारचा किल्लाचे आहे. प्राकार दोन हजार वर्षांपूर्वीच्या शकयवनांच्या धाडी परतविण्याकरिता तटांच्या धर्तीवर बांधलेला आहे. आत गेलात म्हणजे मध्ये एक दोन मुख्य देवळे व भोवताली उपदेवालये दिसतील आणि त्यांच्यापुढे दहा पाच उभ्या काठ्या आढळतील. एक काठी इंद्रध्वज आहे, दुसरी गरुडध्वज आहे, तिसरी सिंहध्वज आहे आणि चवथी रामदासी भगवा झेंडा आहे. सा-या ध्वजा ऐतिहासिक आहेत. इंद्रापासून समर्थांपर्यंत सा-यांचे ते ध्वज आहेत.

अज्ञातोद्भव शबल साधने केवळ भ्रांतिकृत असतात; परंतु ती भ्रांतिकृत असतात असे मनुष्य समजत मात्र नाही. वास्तव साधनांच्या व कलांच्या इतकीच किंवा त्याहूनही जास्त खरी ती आहेत असा मनुष्याचा समज असतो. गूढ आवाज वगैरे मूळ पाया. त्यावर ती कोठून आली एतद्विषयी तर्क. माहीत असणा-या कोणत्याही पदार्थापासून आला नाही त्या अर्थी व कोण्यातरी प्राण्यापासून आला पाहिजे या अर्थी, उपमानप्रमाणाने प्राथमिक मनुष्याने असे ठरविले की कोण्यातरी अदृश्य प्राण्याचा हा आवाज असावा. आवाज झाडावरून, रानातून, सरोवरावरून, मेघांतून, आकाशातून वगैरे जिकडून येईल तिकडे तो अदृश्य प्राणी रहात असावा. असे नाना तर्क करून मनुष्याने भुते, यक्ष, देव, दानव, अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच इत्यादी गूढ प्राणी प्रथम निर्माण केले; नंतर त्यांच्या रहाण्याच्या जागा, स्थले, प्रदेश व लोक निर्माण केले, आणि शेवटी त्यांची त्यांच्या गुणानुरूप उपमानप्रमाणाने रूपे निर्माण केली. इतकेच करून मनुष्य थांबला नाही, तर हे अदृश्य प्राणी रागावले म्हणजे पूजा, प्रार्थना, नैवेद्य व बळीं देऊन त्यांची मर्जी संपादण्याचे मार्ग त्याने ठरविले, ह्या मार्गानाच देवधर्म म्हणतात. सुष्ट देव, दुष्ट देव, खाष्ट देव, वरिष्ठ देव, कनिष्ठ देव, प्रेष्ठ देव, श्रेष्ठ देव आणि एकमेव एक देव असे नाना प्रकारचे देव व देवदूत व भुते व सैताने व या सर्वांच्या स्त्रिया व पोरे असे एक नवीन जगच्या जग मनुष्याने निर्माण केले आणि ते जग खरे व मेल्यावर त्या ख-या जगात आपण अक्षय्य रहाण्याला जाणार, इतकेच नव्हे तर आपले हे दोन दिवसांचे साधे जग खोटे आणि खोटे नसले तर क्षणिक इत्यादी तर्कपरंपरा बांधीत बांधीत तो त्या ख-या परलोकावर बेसुमार आसक्त झाला. इतका आसक्त की, रोजची व्यवहारातली जी कर्मे, आयुर्धे, उपकरणी, चित्रे, मूर्ती, इमारती, थडगी, लग्ने, जातकरणे, पताका, ध्वज, संस्कार इत्यादी सर्वांवर त्या ख-या जगातील वस्तूंचा त्याने छाप मारला. त्या ख-या जगाची व तेथील देवादानवांची चित्रे, स्तोत्रे, वेद, बायबले, कुराणे, त्रिपीटके, काव्ये, नाटके, तांडवे देखील मनुष्याने केली. असा मोठा गोंधळ मनुष्याने माजवून ठेविला. खरेच खरे होते त्याला त्याने खोटे ठरविले आणि निव्वळ काल्पनिक जे होते त्याला खरे ठरविले. मनुष्याने ही जी कल्पनासृष्टी बनविली तिचे उत्कट ऐतिहासिक रूप पहावयाचे असल्यास उत्तम मार्ग म्हटला म्हणजे कोणत्याही लोकांच्या देवळाकडे चला. म्हणजे मनुष्याच्या भ्रांत साधनांचा केवळ ऐतिहासिक संग्रह एका ठिकाणी केलेला तुम्हाला आयताच आढळेल. शहरातले अलीकडील शेदीडशे वर्षांतील देऊळ घेऊ नका.