मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु ॥ अर्बा अशरीन मयाव अलफ, सन ११३३ फसली,
अवलसाल छ १ रमजान, २५ मे १७२३,
ज्येष्ठ शुध्द २ शके १६४५.

तुकाराम बोवा देहूकर याचे पुत्र नारायण गोसावी श्रावण शु ॥ ४ स (२६ जुलै १७२३) समाप्त झाले. छ २० सफर (९ नोव्हेंबर १७२३) श्रीमंत साता-याहून निघून वाई, धोम, महाबळेशर, प्रतापगड वगैरे करून पुन्हां छ ८ र॥ वल रोजी (२५ नोव्हेंबर १७२३) साता-यास आले. अंबाजीपंत तात्या स्वारीस निघाले. छ १८ र॥ वल (५ डिसेंबर १७२३) स्वारी हिंदुस्थानांत चालती झाली, तों माळव्यांत गेले. सैद बहादरशा बादशाहाकडील सुभा चालून आला. त्याशीं लढाई देऊन त्याचा मोड करून उज्जनीस गेले. तेथें ठाणीं बसवून अंमल सर केला. तमाम राजेरजवाडे बुंदेलखंडसुध्दां खंडणी घेतली. बुंदेल्याशीं स्नेह करून कांही दिवस छावणी केली. खानदेशांत मोकास अंमलाचा वसूल करू लागले. या लढाईत शिंदे, होळकर व पवार यांणीं बहुत शौर्य केले होतें. मल्हारजी होळकर या वेळी शिलेदारी करीत होता. तो जातीचा धनगर होता. नीरा नदीकाठी होळ ह्मणून गाव आहे. तेथील चौगला आहे. दुसरा राणोजी शिंदा याचे पूर्वज साता-याजवळ कन्हेरखेड येथें राहात असत. तो शिंदा पूर्वी मोगलाईत चाकरी करीत असतां, मोठे पदवीस चढला असतां, दरिद्रावस्थेत येऊन बाळाजी विश्वनाथ यांजवळ बारगिरीवर होता. पुढें बाजीराव याजपाशी जोडे उचलावयाची चाकरी करून हुज-यांत राहिला होता. पुढें योग्यतेस चढत आला. त्याच सुमारास धारेचा पवार योग्यतेस चढला. त्याचा मूळपुरुष उदाजी पवार विश्वासराव याचा बाप रामचंद्रपंत अमात्य यांणीं योग्यतेस चढविला होता. बावडेकराकडून आंग्रे यांणी सुवर्णदुर्ग तालुका घेतला. माळव्यांत बंदोबस्त राहण्याकरितां नेहमी वीस हजार फौज असावी असे करून राणोजी शिंदे व मल्हारजी होळकर यांस पाठविलें. शिंद्याकडे उज्जन व होळकराकडे इंदूर व पवार यास माळवें प्रांती जो अंमल साधेल तो साधावा असें ठरवून पेशवे परत आले. हिंदुस्थानात राजे रजवाडे यांस सोन्याच्या काठया व चौ-या सोन्याच्या दांड्याच्या असतात त्याप्रे॥ पेशवे यासही बहुमान दिल्हा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries