Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ अशरीन मया व अलफ, सन ११२९ फसली, अव्वल
साल छ १७ रजब, २६ मे १७१९,
ज्येष्ठ शुध्द २ शके १६४१


बाळाजी विश्वनाथ सासवड मुक्कामी शके १६४२ शार्वरी संवत्सर चैत्र शुध्द ६ शनवारी, छ ५ जमादिलाखर, अशरीन मया व अलफ सालीं वारले (२ एप्रिल १७२०). बाळाजी कारभाराचे श्रमानें सन १७२२ साली मयत झाला असें ग्रांट डफने बखरीत लिहिले आहे, परंतु ती चूक१३ १३+ आहे. 

या१४ सालीं दुस-या हकीकती किरकोळ झाल्या त्या :-

औरंगाबादेहून साता-यास येण्याकरितां निघाले ते छ २८ रजब रोजी मुक्काम जयसिंगपुरा, औरंगाबादेनजीक होता (५ जून १७१९). छ १८ साबान रोजी (२५ जून १७१९) सासवडास दाखल झाले व छ २७ साबानीं (४ जुलै १७१९) साता-यास भेट घेतली. छ १९ जिलकाद (२२ सप्टेंबर १७१९) रामचंद्र महादेव चासकर याणीं प्रांत कल्याणचा मुलूख हस्तगत केल्याचें पत्र आलें. छ २ जिल्हेज (५ अक्टोबर १७१९) नारायणरावजी व जानोजी ढमढेरे यांनी पाबळचें ठाणें घेतलें. छ २३ मोहरम रोजी (५ नोव्हेंबर १७१९) स्वार झाले. छ १९ जमादिलावल (१९ मार्च १७२०) रोजी लग्न झालें. छ २० जमादिलावल रोजी कोल्हापुरावर लढाई झाली. (२० मार्च १७२०). बेहे येथें स्वारी करून, परत येऊन नंतर स्वामिदर्शन घेऊन सासवडास आले. छ २० जमादिलाखर (१७ एप्रिल १७२०). रोजी बाजीराव बल्लाळ यांस पेशवेपदाची वस्त्रे झाली, मसूर मुकामी, शके १६४२ शार्वरी संवत्सर. नारायणदेव चिंचवडकर शांत जाहाले, भाद्रपद शुध्द ७ (३० आगष्ट १७२०) महालाकडून दमाजी थोरात यांस सोडण्याविषयी आग्रह१५ १५+ १५++पडल्यावरून राजाज्ञेने पुरंदरावरून सोडून दिल्हा.