Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो॥ १५ जिल्काद सन लेखांक १९४. १७०३ अश्विन शु॥ १५.
इसन्ने समानीन. श्री. २ आक्टोबर १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजीपंत दाजी व गोपाळपंत दाजी स्वामींचे सेवेसीं:-
पो। खंडो नारायण सां। नमस्कार विनंति. उपरी येथील वर्तमान ता। आश्विन शु॥ १५ पावेतों आपले कृपेंकरून समस्त सुखरूप असों. कांहीं चिंता न करावी. आपणांकडील वर्तमान बहुत दिवस कळत नाहीं. तरी ऐसे न करावें. सदैव पत्रीं सांभाळ करीत असलें पाहिजे. तेणेंकरून समाधान होईल. चिरंजीवाचा सांभाळ करीत असलें पाहिजे. अज्ञान आहे. आणि आपण करीतच असतील. परंतु सूचनाआर्थ लि॥ आहे. वो। राजश्री रामभटजी बापट यांचे घरचीं सर्व सुखरूप आहेत. वाईस जातों, तेव्हां समाचार घेत असतों. सौ. राधाबाई सुखरूप आहेत. कळावें बहुत काय लिहिणें, कृपालोभाची वृद्धि करीत असलें पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २३ गुरुवार लेखांक १९३. १७०३ भाद्रपद शु।। २.
सन इसन्ने समानीन. श्री. २१ आगष्ट १७८१.
श्रीमंत राजश्री तात्यासाहेब स्वामींचे सेवेसीं:-
आज्ञांकित रामचंद्र गिरमाजी कृतानेक सां। नमस्कार विनंति विज्ञापना. येथील कुशल ता। भाद्रपद शु।। १२ द्वितीया भोमवासर मु॥ पुणें जाणोन स्वामींचे कृपाआवलोकनेकरून स्वस्ति क्षेम असों. विशेषः–श्रीमंत राजश्री रावजीपासीं आहों हें वर्तमान तर आपल्यास कळलेंच असेल. श्रीमंत आह्मांवर बहुत कृपा करितात. महाराजांस कळावें. महाराजास आमचेविसीं स्मरण असावें. सर्व प्रकारें आमचा सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. मीं ल्याहावें ऐसें नाहीं. विशेष काय लिहिणें, कृपालोभाची वृद्धी करणार आपण समर्थ आहां हे विज्ञप्ति.
राजश्री बाळाजीपंत भावोजी स्वामीस सां। नमस्कार विनंति जे, घरचें वगैरे वर्तमान ल्याहावें तर आदियाद आह्मांसच कांहीं कळत नाहीं. श्रावणमासीं तीर्थरूप राजश्री नानांकडील पत्र आलें, त्यांत कांहीं मजकूर नाहीं. त्यांनीं लिहिलें कीं, आपणच पुण्यास आमचे भेटीकरितां येतों. त्यास तीर्थरूप आल्यानंतर काय वर्तमान कळेल तें कळेल. तदनंतर मी आपणांस लेहून पाठवीन. माझें वर्तमान आपल्यास कळलेंच असेल. श्रीमंत राजश्री रावजी आह्मांवर बहुत कृपा करतात. आह्मांविसीं आपल्यास स्मरण असावें. श्रीमंत राजश्री तात्यासाहेबांस विनंति करून एक असामीची सोय करून घ्यावी. आपण तर करतील. परंतु सूचनार्थ लिहिलें आहे. सर्वप्रकारें मी लेंकरूं आहे. आपण वडील आहांत. आपल्यास कांहीं वारंवार ल्याहावें, हा पदार्थ नाहीं. सदैव पत्रीं संतोषवित असावें. विशेष काय लिहिणें, कृपावृद्धी करीत जावी हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ साबान लेखांक १९२. पो। १७०३ श्रावण व॥ ४.
सन इसन्ने समानीन. श्रीनिवासो जयति. ८ आगष्ट १७८१.
सेवेसीं विज्ञापना कालीं आज्ञा घेऊन निघालों ते अस्तमानीं उतरमटुरास येऊन पावलों. आजी तेथेंच प्रातःकाळीं भोजन करून येथें लष्करांतून तीन कोसांवर येतांच राजश्री रावजीची जोडी आली. ह्याबदल परवाना आमचे नांवचा होता, तो घेतला. त्यांत लिहिलें आहे कीं सर्वत्रांस कंचीच्या मैदानांत उतरवून तुह्मी हजूरास येणें ह्मणून लि॥ आहे. विदित होय. सरकारचा लाखोटा होता तो रात्रीं पाऊस आला ह्मणोन जासूदांनीं रवळोपंताकडे दिल्हा होता. तो त्यांनीं फोडून पाहून पुन्हा गोंद लावून आह्मांकडे पाठविला. त्या लाखोट्यांत काय आहे ह्मणून पाहिलें असेल. अथवा हजरताची आणखी कांहीं चिटी होती हेंही कळेना. सर्वही हजुरास गेल्यावर कळेल. दुस-याचा लाखोटा फोडून पहाणें, हे गृहस्थपणाची सीमा आहे. आजी हजूरास गेल्यावर, सर्व अर्ज करून उदियां जोडी सेवेसीं पाठवितों. हजुरांतून काय हुकुम होईल त्याप्रमाणें लेहून पाठवितों. बहुत काय लिहिणें लोभ करावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥. छ ६ साबान सन इसन्ने. लेखांक १९१. १७०३ श्रावण शु॥ ८.
समानीन मया व अलफ. श्रीगुरु. ६ जुलई १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। जनार्दनराव शिवराम कृतानेक सां।। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल ता। श्रावण शुक्लाष्टमी मुकाम कालहास्ती येथें आपले कृपेंकरून सहमडंळी स्वस्ति क्षेम जाणून स्वानंद ल्याहावें. विशेष. आह्मी आपला निरोप घेऊन गुरुवारीं निघालों, ते भृगुवारीं प्रहर दिवसास स्वस्थळास येऊन पावलों. आपलीं पत्रें वगैरे जासूद घेऊन जासूद दोन प्रहरां पावला. कागद व जायफळें त्यांनीं पाठविलीं तीं पावलीं. पालेगारांनीं लबाडकी केली, करितां तो रस्ता सोडून रायवलचेरुचे वाटेनें गेलों. ह्मणून तरी राजरस्त्यास पालेगाराचे बापाचें काय गेलें. मादरचोदीस आले असतील. असो. आपणासह फौज शीघ्र नवाबबहादुरांचे फौजेस दाखल व्हावें. नवाबसाहेबही मुखालफीचा पिच्छा करित करित नजीक आले, तें वर्तमान आपणास तपशीलें पुढें कळेलच. आह्मीं येथें आलियानंतर मुखालिफाचें वर्तमान नेयूराहून आलें फिरंगी सरदार बंगालेहून आला. त्यासमागमें दाहा हजार बार घेऊन नेयूरास आला. नेयूरचे चार हजार बार आणि बंगालचे चार हजार प्यादा. शिवाय तेथें व्यंकटगिरी ह्मणून पालें आहे. ते पालेगार नवाबसाहेबांस आहेत. त्यांचें मकान वगैरे साफ केलें. यास्तव पालेगार मजकूर जंगलांत छपून होते. त्यांजकडील प्यादे तीन हजार मुखालि. फाकडे कुमकेस गेले. एकूण चवदा हजार बार व पांचशें फिरंगी व सातआठ हजार प्यादे इतके जमियेतेनिसीं निघोन मैदानांत येऊन उतरले आहेत. त्याचा कस्त नीट निघोन दर्यायकिनारायानेंच जाऊन जरनल कुटास मिळावें ह्मणावयाची तजवीज केली आहे. आणि आसपास मुलकांत दौड पाठवून बैल बकरीं वगैरे जनावरें हाकून घेऊन गेले. कुटाचेंही मानस आहे. जे नेयुराकडे फौज आली तीस मेळवून घ्यावें, ह्मणून एक एक कदम इकडेच सरकत येतो. पुढें पहावें. ईश्वरदयेनें मुखालिफाचें तंबीचें वृत्त ऐकिल्यास लिहिजेल. मुख्य बंगाल्याकडील व मच्छलीबंदराकडील मुलुख ताराज होऊन, जेव्हां चहूंकडील रसद बंद होईल, तेव्हां सहजच पादाक्रांत होऊन येतील. जंवर मकरी लोकांस दोन ... ......नीट आहेत, तवपावेतों कुमकेची व रसदेची उमेद खुषकीची आहेच. यांस पश्चम धरून बंगाल्यापलीकडे खुष्कींत समुद्रतीरीं एक दाणा न मिळावा ऐसें केल्यास थोड्याच दिवसांत शत्रु निर्नाम होईल. नाहीं तरी दिवसगती लागेल. यास्तव उभय मुलुक दोन बाजू शत्रूस ते बाजू तोडावयाची तजवीज कशी ते करावी. आणि आपणाकडील वृत्त तपशिलें वरचेवरि लिहित जावें. आपले कागदपत्र शीघ्रच रवाना होतील. आमचींही पत्रें तयार जाहलीं असत. भुजंगराव यांचा होन पाठविला असे. पावलियाचें उत्तर पाठवावें. नवाब साहेबांस आह्मीं अर्जी लिहिली ते वस्त्रें गुजराल, ते समयीं प्रविष्ट करावी. आह्मांकडे पत्रें यावयाविसीं पाहिजे तरी नवाबास पुसून आंचीवरी पाठवीत जावीं. लोभ असावा. आपण सर्वज्ञ तेथें विस्तारें लिहिणें नलगे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १९०.
१७०३ आषाढ व॥ १. श्री. ६ जुलई १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या जोसी यांप्रतिः-
स्नेहाभिलाषी सदाशिव दीक्षित ठकार वाजपेययाजी आशिर्वाद विनंति उपरी. येथील कुशल ता। आषाढ वद्य १ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपणांस जाऊन सवा वर्ष जाहलें. गेलियानंतर एक पत्र पाठविलें, तें पोष मासीं पावोन, साकल्य वर्तमान कळोन, बहुत आनंद जहाला. असेंच आपलेकडील साकल्य कुशलवृत्त लेखन करून संतोषावाप्ती करावी. त्या पत्राचें प्रतिउत्तर आह्मीं पूर्वीं पाठविलें, तें प्रविष्ट जहालेंच असेल. अलीकडे आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळलें नाहीं, त्यावरून चित्त सापेक्षित असे. तरी आपलें स्वकुशलवृत्त साकल्य लेखन करीत जावें. जाऊन बहुत दिवस जहाले आहेत. श्रीमंतांची आज्ञा होईल त्याप्रों। नबाब यांची आज्ञा घेऊन यावयाचें करावें. शरीर तुमचें बळाढ्य नवे. तिकडील पाणी मानणार नाहीं. यास्तव शरीर बहुत रक्षित जावें. स्वामिशेवेचे यश संपादून यावें. आपले स्वस्तिक्षेम कुशळ लेखन करावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असों द्यावा. हे आशीर्वाद.
हे॥ नारायण दीक्षित व यज्ञेश्वर दीक्षित यांचे आसीर्वाद. आपलें कुशलवृत्त अलिकडे कळत नाहीं, यावरून चित्त उद्विग्न आहे. तर कुशल साकल्य लेखन करावें, तेणेंकरून संतोष होईल. मुख्य, शरीराविषयीं त्या प्रांतांत उदक वाईट यास्तव, रक्षणास्तव सावध असावें. भेट होईल तो सुदिन असे. लोभ करावा. हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ९ जमादिलाखर लेखांक १८९. १७०३ ज्येष्ठ शु. ११.
सन इहिदे समानीन. अलीफ. २ जून १७८१.
राव अजम कृष्णरावजी सा। सलामत रावसाहेब मुषफक मेहेरबान करमफर्मीय मोखलिसान आजी दिल एखलास नूरमहमदखान नोबणी सलाम बादज सलाम. मोहवल मकसूद आ की, येथील खैरसला छ १० जमादिलोवल जाणून साहेबीं आपली खैरखुषी लिहून शादमानी करीत आलें पाहिजे. दीगर, गणपतीराय येथून रुकसत होऊन वाईस गेले, साहेबापासीं पोंहचतील. अजम भुजंगराव यांसही रवाना करोन पाठविलें आहे. आह्मी भुजंगरायावास्ते रुबरु जें काय सांगणें तें पहिलेंच सांगितलें असे, सबब जे हे आपले आहेत. गौर दर बख्त करीत जाणें. साहेब सरदार असा सुबरायाचे मजकूर भुजंगरायाचे जबानीं बयानकर मालूम होईल. हे आपले मर्जीचे खेरीज होणार नाहींत. वर्तणुकेवरी मालूम होईल. बाकी हकीकत यांचे जबानीं सांगतां कळों येईल. हे कीशा मेहेरबानी करोन पोंहचले पाहिजे. दराज काय लिहणें ? बाकी पंताचे जुबानीं सांगून पाठविले मजकूर भुजंगरायाचे जबानींही मालूम होईल. यांचें वळण पाहोन मरम करीत जाणें, प्यार मोहबत असूं दीजे हे किताबती. बाळाजीपंत व गोपाळपंत यांस सलाम.
आज्ञाधारक कोनेरीराव साष्टांग नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २८ जमादिलावल सन लेखांक १८८. १७०३ वैशाख व॥ १३.
सन इहिदे समानीन. श्रीगणराज. २१ मे १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य रघुनाथराव नीलकंठ साष्टांग नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल तागाईत छ २६ जमादिलोवल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. अलीकडे आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. साकल्यवृत्त लिहून संतोषवीत असावें. यानंतर आह्मी स्वारीहून काल द्वादशी रविवारीं घरास आलों. आपण हैदरखानाकडे जाणार. त्यास, तीर्थरूप मातुश्रीबाईंची व आपली भेट होऊन बहूत दिवस जाले. यास्तव आपण येऊन मातुश्रीस भेटोन जावें. अगत्य अगत्य यावें. माझी आपली भेट जाली होती, परंतु उभाउभी जाली. मग तुमचा शोध केला तों तुह्मी निघून साता-यास गेलां. मग गांठ न पडली. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २२ जमादिलावल सन लेखांक १८७. १७०३ वैशाख वद्य ९.
इहिदे समानीन. मुकाम पडसाळी श्रीगणराज. १६ मे १७८१.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। केसो आपाजी कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। छ २१ जमादिलावल जाणून स्वकिय लिहित असलें पाहिजे. विशेषः-मौजे कारजोळ यासी वेढा राजश्री परशरामपंत भाऊ यांजकडील फौज येऊन वेढा घातला आहे. त्यास, तो गांव देशपांडे यांचा, त्यांत गृहस्त रा॥ सखारामपंत देशपांडे ह्मणून आहेत, त्यांचा आमचा स्नेह आहे. याजकरितां राजश्री आनंदरावजीस पत्र पाठविलें आहे. तरी या कामांत आपण पडोन त्याचें ठाणें त्याजकडे राखावें. त्यांचा भाउबंदीचा कजीया आहे, तो आमचे विद्यमानें करावा. ऐसें जाल्यास, श्रीमंत राजश्री नाना रास्ते कोरजोळावर मागें आले होते, त्यांत आह्मी पडोन तोडजोड केली होती, त्याप्रो। हाही बीद बसवून देऊं. तेव्हां तोडमोड कैसी जाली ह्मणाल, तरी तो मजकूर राजश्री आनंदरावजींस विदित आहे. हा सर्व प्रकार ध्यानांत आणून आपले खातरजमेचें पत्र आलें, तरी आह्मी या कामांत पडूं; नाहीं तरी पडणार नाहीं. वरकड मजकूर र।। बापूजी गोविंद सांगतां कळेल. वरकड आता आपण थोर कामांत पडिले आहेत. पूर्ण ममता असावी. भेटीचा हेत होता, परंतु भेट होईल तो सुदिन असे. कागदींपत्रीं तरी दर्शनाचा लाभ देत असावें. चार मुकाम करून कारजोळाकडे येत असल्यास तो गृहस्थ वेढ्यांत आहे त्याजकडे युक्तिप्रयुक्तीनें चिटी पाठवून, त्याचाही पका जाबसाल मनास आणून, पत्र आपलें आलें, ह्मणजे यांत आह्मी पडूं, व आपलेंही इकडे येणें होईल. भेटही होईल. आणखीं कितीक जाबसालही बोलावयाचे आहेत. सारांश, आपले पत्राचें उत्तर आलें ह्मणजे यांत आह्मी पडतों, नाहीं तर नांव घेत नाहीं. आपली भेट होती तरी उत्तम होतें. कितीक बोलणें होतें. भेट होईल तो सुदिन, लोभ करावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलावल लेखांक १८६. १७०३ वैशाख व॥ ५.
सन इहिदे समानीन. श्री. १२ मे १७८१.
राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं :--
सां। नमस्कार विनंति. स्वामींनीं पत्र पाठविलें तें पावलें. आथणीस आपलें येणें जालें, हें वर्तमान राजश्री अंबानीं आह्मांस काल लिहिलें होतें. आज स्वामींचें पत्र आलें, त्यावरून कळलें. आपली मार्गप्रतीक्षा करीतच होतों. श्रीमंत यजमान स्वामींचीं पत्रें वरचेवर येतात कीं, बागलकोटास जाऊन लौकर पोहंचावें, मागाहून राजश्री गणपतरावजीचें येणें जालीयावर बागलकोटाहून परतूं नये, जावें; ऐसीं पत्रें येतात. मी गांवास जाऊन गांवीहून निघालों ते श्रीपंढरीस राजश्री कृष्णाजीपंत फौजसुद्धां आले होते, त्यांस येऊन मिळालों. आजपर्यंत बागलकोटास गेलों असतों. परंतु आपली मार्गप्रतीक्षा करून सलगरेयासीं आठ चार मुकाम करून, श्री रामतीर्थास येऊन, श्रीमंत सौभाग्यवती मातुश्री बाईंची भेट घेऊन, काल श्री तीरास आलों. आपलें पत्र आलें, त्याचा मजकूर कळला. त्यास, उदियाचा दिवस आमची मुकाम येथें आहे. सोमवारीं दिवस चांगला आहे. नवें निशाण करविलें आहे व मजला डेरियासी जाण्याचा मुहूर्त आहे. सुदिवस पाहून डेरियास जावें. लष्करासमीपच रहातों. फार अंतरानें रहातों. त्यास, सोमवारीं दिवस चांगला आहे. निशाण नवें करविलें आहे. त्याची पूजा करून, हत्तीवर निशाण घेऊन, दोन कोस सूरपालचे समीप मुकाम करावा, ऐसें आहे. त्यास, आपण कूच करून लौकर यावें. आदिला एक मुकाम आपलियाकरितां करितों. आपण आह्मीं एकत्र जालियावर श्रीकृष्णा पार होऊन, दर मजल बागलकोटास जाऊं. तेथें गेलियावर राजश्री गणपतरावजींची वाट पाहूं. ते बागलकोटाचे मुकामास आलियावर मगवलीस कूच करून जाऊं. याउपर दिवसगत न लावावी. दरबारीं श्रीमंत राजश्री नानांची मर्जी आपलियासी विदित आहे. मजला श्रीमंत यजमानस्वामींचीं पत्रें वरचेवर येतात. याउपर आपण आमचा गुंता कांहीं न करावा. दिवस कशास लावावे ? लोभ करावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ६ जमादिलावल लेखांक १८५. १७०३ वैशाख शु॥ ८.
सन इहिदे समानीन. श्री. १ एप्रिल १७८१.
सेवेसीं गणेश केशव सां। नमस्कार विनंति ता।. वैशाख शु।। ८ मंगळवार दोन प्रहर पावेतों मुकाम वेळें, यथास्थित असे. विशेष. सैन्यांत गेलों होतों. सरकारची व यजमानस्वामींची आज्ञा घेऊन माघारें आलों. येथून वाईस गेलों. घरास जाऊन मुहुर्ताचा विचार करून सुमुहुर्तेंकरून श्रीमंत राजश्री दादासाहेबांचा निरोप घेऊन आपणापासीं येतों. मजविषयीं इतःपर सरकारांत पत्र पाठवूं नये. साहित्यसरंजाम करून घ्यावयास चार दिवस लागतील. संभाळून घ्यावें. निरंतर पत्रीं संतोषवीत असिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें? कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.