[१०१]                                                                               श्री.                                                                  ६ आगस्ट १७९५.                   

विज्ञापना ऐसीजे. नवाबानें सांगितल्याप्रमाणें फौजेविषयीं विनंति लिहिली आहे. याचें उत्तर तेथून येणें तें असें यावें जे, तुह्मीं नवाबाचे आज्ञेप्रमाणें फौज कुमकेस पाठविण्याविषयीं लिहिलें होतें तें कळलें, त्यास फौज जमा करण्याची तजवीज झाली पाहिजे यास्तव कराराप्रमाणें सरकारचा ऐवज आला पाहिजे, तर नवाबाशीं बोलून त्याजकडून मातबरास घेऊन तुह्मीं लवकर यावें, ह्मणजे नवाबाचें बोलणें समजून घेऊन फौजेची तरतूद लवकरच करण्यांत येईल, येणेस विलंब करूं नये, लवकर यावें. याप्रमाणें उत्तर यावें. असें माझे विचारें. यांत अधिक उणें लिहावयाची सल्ला ठरेल त्याप्रमाणें आज्ञा यावी. स्वामी ह्मणतील, आपले येणेविषयीं वारंवार लिहितात याचें काय कारण? त्यास, नवाब आपले सरकाराशीं मनापासून दोस्ती इच्छितात. याचा बयान पत्रीं कोठवर लिहावा? मी समक्ष विनंति केलियावेगळें मनांत मरणार नाहीं. आपण उपेक्षा केलियास ही दौलत पेचांत येईल, ती न यावी, नवाबाचा वृद्धापकाल, स्वामीनीं चार गोष्टी सल्ल्याच्या सांगाव्या, बखेडा जाहला आहे हा माडावा, नवाबाचे जीवास घोर झाला ते सोडवावा, सरकार काम व्हावें, नवाबास सांगायास योग्य स्वामी, स्वामी करतील तें नवाब मान्यच करतील, हे पर्याय मी समक्ष विनंति करीन तेव्हां मनांत सर्व येईल. यास लिहिणें किती लिहावें ? लिहितां येत नाहीं. ह्मणोन नवी वारंवार विनंति लिहितों. जें लिहितों त्याचें पुतें मनन व्हावें. ह्मणजे सर्व ध्यानांत येईल. र॥ छ २० मोहरम. हे विज्ञापना.

छ २३ मोहरम मुक्काम भागानगर
रवाना टप्यावर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries