[१०४]                                                                               श्री.                                                                  ९ आगस्ट १७९५.                                 

विनंति विज्ञापना. मुसारेमू व घासिमिया, आजमखान व इसामिया वगैरे सरदार नबाबाकडील आंदोल येथें जमीयत येऊन, तेथील बंदोबस्त करून, संगारडी पेठेकडे जावयास निघून, आंदालाअलीकडे दोन कोसांवर वंजरा नदीचे पैलतीरीं मुक्काम करून आहेत. वंजरेस पाणी फार, पायाव नाहीं. नावा, टोकरे, वगैरे उतरण्याचा सरंजाम पोहोंचला ह्मणजे नदी उतरून संगारडीस येऊं, याप्रमाणें मुसारेमू वगैरे यांच्या अर्ज्या आल्यावरून येथून नावा वगैरे सरंजाम त्यांजकडे रवाना जाला. जमीयेत नदी उतरून संगारडीस येणार. राजाजी बोहरियांचे बांगावर स्वार, पायदळ, जमीयत तीन हजारपर्यंत जमा करून उतरले होते. नित्य नबाबाकडे दरबारास येणें जाणें, डे-यासही जाऊन राहणें हा क्रम चालिला होता. सांप्रत राजाजी आपले हवेलींत येऊन राहिले. भारामल बाहेर डेरे देऊन आहेत. बोहरियांचे बागाहून कूच करून शेट गोवर्धनदासाचे बागानजीक जाऊन राहिले. जमीयत हजार बारासें स्वार व दोन हजार पायदळ याप्रमाणें तूर्त जमा आहे. र॥ छ २३ मोहरम. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries