Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१३]                                                                                 श्री.                                                                           १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. मीर अल्लम कोणा एका गृहस्थापाशीं बोलत होते कीं, पुणेंवाले याची सचेाटी आणि चाल मजबूत वाटतें, परंतु अलीकडे रघोत्तम याचें बजीनस, पत्र आलें, त्यांत त्यांनीं लिहिलें आहे जे श्रीमंत आणि मदारुलमहाम यांचे डोळे फिरले, आतां स्मरणही यास तुमचें नाहीं, मीर अलम कोणते याची ओळख अथवा स्मरण देखील नाहीं, ऐशी चाल दिसून आली. याप्रमाणें मशारनिल्हेचें पत्र मौजूद आहे असें ह्मणत होते. मग काय असेल नकळे. ऐकिलें तें लिहिलें आहे. कलम १

दरबारांत नवाबदेखत अगर त्याजवेगळ तेथें गांठ मीरअलमाची पडते. तेव्हां बोलतात कीं, मदारुलमहामासारखे मनुष्य नाहींत, जे बालतील त्यांत तफावत येऊंच देणार नाहींत, ही खातरजमा. बोलण्याचे अर्थ दोन. एक अर्थ असून आज ऐकावें तें लिहूं. याजवर मदारुलमहाम यास खातरजमा व्हावी. दुसरा अर्थ जें आह्माशीं बोलण्यांत आणि करारांत शपथपूर्वक आलें असले त्यांत व्यत्यय पड नये. या बोलण्यांत सुचवावें. त्यास मुलुखाविषयीं स्वामीचें अथवा राजश्री नानांचें वचन गुंतलें आहे कीं काय याची खचीत आज्ञा व्हावी. राजे रेणूराव व रघोत्तमराव उभयतां मोठा पीळ भरून आहेत कीं, आह्माशीं मुलुखाविषयीं न बोलावें अशी शपथ आहे. यांतील, कसा प्रकार असेल त्याची पक्की आज्ञा व्हावी. कलम.१

काल छ २६ तेरखेस नवाबाचें सालगिरेचे नजरेकरितां गेलों होतों. नजर केली. उपरांत फिरगाणी एक बंगला चार लाख रुपयांस नवाबानीं औरंगाबादेंत पूर्वीं घेतला तो दाखवावयास घेऊन गेले. तेथेंच बैठक झाली. त्या बंगल्यांत फिरगाणी राग वाजतात. आणि फवारे पाण्याचे सुटतात. तेंच पाणी पुन्हा खजान्यांत कळ फिरविली असतां जातें. झाडें, फुलें, जनावरें, पुतळ्या आहेत. दोन तीन घटिका तेथेंच बसले. इराणचा शहाजादा आला आहे. तो तेवेळेस आला होता. नवाबानीं ताजीम देऊन भेटले. आपलेजवळ बसविलें. तकिये मसनद कांहीं नव्हतें. गालीच्यावरच बसले होते. आपण लाव्हा घेत होते. त्याप्रमाणें शहाजादे यासही प्याल्यांत लाव्हा द्यावा ह्मणून सांगितल्यावरून त्यासही प्याला भरून देत असत. ते दिवशीं कांहीं विशेष भाषण झालें नाहीं. नवाब बरामद होण्याचे पूर्वीं मीर अल्लम व रेणूराव यांशीं दिवाणखान्यांत गांठ पडून बोलणें झालें. तें अलाहिदा लिहिलें आहे. त्यावरून ध्यानांत येईल. कलम १

तीन कलमें. र।। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.