Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[११]                                                                                 श्री.                                                                           १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. इंग्रजांचे येथील कुफिया बातमी मीरअलम कीरकपात्री इंग्रजाकडील वकील येथें आहे त्याशी षराकतीविषयीं बोलिले. त्यानें यास साफ जवाब दिला कीं, दोहींकडे आमची दोस्ती, तेव्हां तुह्मीं ह्मणतां हें आह्मांस कबूल नाहीं, तुह्मां उभयतांतील वाजवी गैरवाजवी पाहतां पंत प्रधान यांचें ह्मणणें वाजवी, तुमचे भरंवशावर काम करावें तर पट्टणावर तुमचे फौजेचा आणि चालीचा अनुभव आला आहे, हिम्मत किती हेंही कळतच आहे, तेव्हां आमचेंच जातीवर येऊन पडेल, त्यास तुमचा निभाव तुह्मी व तेच पाहून घ्यावा, या बोलण्याची गरज धरून आह्मी श्रीमंताचे दोस्तींत फरक आणणार नाहीं. याप्रमाणें साफ जाब दिल्यावर मीर अल्लम उगेच राहिले. कित्येक जमीदारांचें पारिपत्य करावयाचें याजकरितां चिनापट्टणाहून कांहीं पलटणें देववावीं ह्मणून बोलिले. याचें उत्तर चिनापट्टणकराचें आलें कीं, कलकत्त्याहून हुकूम आल्यास देऊं. पैका आणि मुलूख श्रीमंतानीं फार घेतला याविषयीं दोस्तीचे मागें इंग्रजाकडून बोलवावें, या प्रयत्नांत आहेत. परंतु इंग्रज अद्याप कबूल करीत नाहीं. जर इंग्रजांनीं कबूल केलें तर श्रीमंतांशीं बदलून गोष्ट सांगावी हें मनांत आहे. प्रस्तुत हें होत नाहीं. तर राहिले, जेव्हां दावा बनेल तेव्हां करूं. तूर्त गोविंदराव कृष्ण आमचे कामांत नसावे, याविषयीं स्वामी व राजश्री नानास व गोविंदराव भगवंत यास पत्रें पाठवावीं, हा उपदेश नवाबास करितात. पहावें काय ठरतें. मुलूख आपला गेला, पैका गेला, हुकमत गेली, कारभारी पेशव्यांचे हवालीं केला, याची बदनामी दुनयायींत झाली, मदारुल महाम याचे मनांत कांहीं नाहीं, मशिरुलमुलुख यांस आमचे हातीं द्या हेंही ह्मणणें नव्हतें, हजरतींनीं आपले जवळून काढावें इतकेंच, आता त्यांचे देण्यामुळें फार बेवकीरी झाली, इतके गोविंदराव कृष्ण यांनीं केलें, हजरतींनीं दौलास कैद करून ठेविलें असतें तरी बरें होतें, असो, तो गेला तर जावो, ज्याचें कर्म त्यास फळास आलें; ऐसा नाकारा कशास पाहिजे ह्मणून दिला, ऐशी इतर दौलतदाराची समजूत होईल, मुलूख गेला यांत केवळ हजरतीवर हर्फ. ऐशा चिडवणुकीच्या गोष्टी चालल्या आहेत. सारांश चाल खेाटी. र।। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.