Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[८]                                                                                 श्री.                                                                           १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. मीर अल्लम व रेणूराव आणि रघेात्तमराव त्रिवर्ग मिळून नवाबास समजाविलें कीं, पागावाले व एहतेषामजंग हे फितुरांत गोविंदराव कृष्ण यांशीं मिलाफी झाले, याजमुळें एवढी नक खरड्यावर हजरतीस बसली, याचा दाखला खचित पुण्यांत आह्मांस समजला आहे. ह्मणून न।लिष केली. गोविंदराव कृष्ण यांचा फितूर सर्वा ठिकाणीं हें मनात भरविलें. त्याजवरून अजमखान व घासी मिया याजवर नवाब खफा आहेत. शिव्यागाळीही करितात. गीरनसाहेब घासीसियाकडील यांचे येणें जाणें आमचे येथें पूर्वींपासून बहुत त्याप्रमाणें ते येत असत. याविषयीं नवाबास सांगितलें कीं, नित्य खलबतें करितात. अजमखान व घासीमिया रात्रीं घोंगड्या पांघरून जातात. असें लटकें समजावून मीरन साहेब यांस दरबारांत मना करविला. उभयतांवर राग करविला. त्यानीं नवाबास सांगितलें कीं, जो जें सांगेल ते हजरत ऐकतात, यास इलाज नाहीं, षमषुल उमरा होते तेव्हांपासून हजरतीचे परवानगीनें त्याशीं घरोब्याचा शिलशिला, आह्मांस राजकारणाशीं दरकार नाहीं, त्यांचा घरोबा राखतो ह्मणून आणखी कांहीं शक्कल असल्यास आमचे अंगीं लावावें, पत्त्यामुद्यानिशीं रुजू झाल्यास पाहिजें तें करावें, परवां तहनामा देण्याकरितां हजरतीनीं पाठविलें ह्मणून गेलों, नाहींतर कांहीं खोळंबा होता कीं काय ? तुफान घेऊन कोणी बोलूं लागला तेंच मनावर घेणें असें होऊं लागलें तर भरंवसा काय मानावा ? हजरतीनी पागा घोडी सर्व ठेवावीं, षमषुल उमराचे कबरेपाशीं जाऊन बसू. याप्रमाणें बोलल्यावर नवाब उगेच राहिले. दिलगीर आहेत. सारांश त्रिवर्ग मिळून चाल विचित्र घातली. सर्वास जरब देऊन मिळवून घ्यावें, या गतीवर चालून सर्वांच्या नालिषी सुरू केल्या. आतां आटोपावयास, जातात, तो आटपत नाहीं. एकवेळ नालिष केली, त्याची शिफारस करूं लागल्यास ठीक बनत नाहीं. अशी गत झाली आहे. परिणाम ठीक दिसत नाहीं. काय होईल पहावें. र।। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.