मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

शाहूनें प्रस्थापित केलेल्या संयुक्त राज्यव्यवस्थेच्या या पद्धतींत जे दोष होते ते होईल तितके काढून टाकण्याचा प्रयत्न बाळाजीनें वर सांगितलेल्या निरनिराळ्या उपायांनीं केला. बाळाजीची व्यवस्था पूर्वीप्रमाणेंच पुढेंही तशीच चालू राहिली व सर्व राज्यव्यवस्थेवर देखरेख व दाब ठेवण्यास मुख्य सरकार समर्थ झालें. या व्यवस्थेमध्यें फाटाफूट व -हास उत्पन्नं करणारीं बीजें होतीं, नव्हतीं असें नाहीं. पण जवळ जवळ एक शतकभर या बीजांची वाढ खुंटविली होती. माउंट स्टयूअर्ट एल्फिन्स्टन् आणि त्याचे मंदतनीस यांनीसुद्धां असें कबूल केलें आहे कीं या राज्यपद्धतींत जरी काल्पनिकदृष्टया फार दोष होते तरी वास्तविकपणें राज्यांत शांतता व भरभराट या पद्धतीनेंच झाली व मराठासाम्राज्याचा आसपासच्या राजेलोकांवर जो वचक बसला होता व त्यास त्यांचेकडून नो मानमरातब मिळे तोही या पद्धतीचाच परिणाम. हे जे प्रति--धक उपाय योजिले होते, त्यास हुजूरची परवानगी लागे व त्याशि-- त्यांचा अम्मल होत नसे, व म्हणून एकंदर बादशाही मुलखांत स्वर-- चौथाई व सरदेशमुखी हे हक्क मराठामंडळास आहेत अशी बादशा-- कबुली घेणें हाच बाळाजीचा मुख्य हेतु वे तो सफल करण्याकडे शेवटचें सर्व आयुष्य खर्च झालें. या बादशहाच्या कबुलीनें मर-- सत्तेस कायदेशीरपणा आला. ही कबुली मिळाली नसती तर कायदेशीर सत्ता व नुसतें सामर्थ्य यामध्यें भेद करणें शक्य झालें नसतें. बाळाजी विश्वनाथाच्या व्यवस्थापटु बुद्धीचें महत्कार्य तें हेंच व यामध्यें यश येण्यास जरी इतर पुष्कळ लोकांची मदत झाली तरी, हें कार्य मुख्यत्वेंकरून बाळाजीनें सिद्धीस नेलें, म्हणून मराठा साम्राज्याचा मुख्य संस्थापक शिवानी, याच्यानंतर गणना करितांना दुसन्या नंबरचा मान मिळविण्याचा हक्क बाळाजीसच चांगला प्राप्त होतो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries