मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

याप्रमाणें राज्यांतील लहान सहान बखेडे मोडल्यावर आपले धनी शाहूराजे व बडे मराठे संस्थानिक या दोघांमधील परस्पर संबंध सुधारण्याकडे बाळाजीनें सर्व लक्ष घातलें. युक्तिप्रयुक्तीनें, किंवा युद्धानें ते शाहूच्या ताब्यांत येणारे नव्हते, इतके ते बलाढ्य होते. तेव्हां त्यांना थैल्या पाठवून “चांगला विचार करा" असा त्यांत त्यानें बुद्धि--द केला. त्यांच्या स्वभावाची उदात्त बाजू घेऊन तिचा गौरव --रून विज्ञप्ति केली होती. त्यांचे सर्वाचे जे हितसंबंध ते सर्व मराठा--- ळाचे हितसंबंध असें त्यांना दाखऊन दिलें. जूट करून राहिल्यास --च्यासारखें बलाढ्य व सत्ताधीश दुसरे कोणी नाहींत, पण जर कां --नी आपल्या बांधवापासून तुटून राहण्याचा हट्ट धरिला, तर त्यांपासून केवढा धोका आहे, हेंही त्यांना समजाऊन दिलें. बुद्धिवादापासून इच्छित हेतु सफल झाला. याचें सर्व श्रेय या पुढारी मंडळासच दिलें पाहिजे. चंद्रसेन जाधवराव व निंबाळकर यांनी मोगलाचा आश्रय धरून ते या कटापासून अलग राहिले, हें खरें, परंतु खंडेराव दाभाडे, उदाजीराव पवार, परसोजी भोसले तसेंच शाहू राजाचे सत्तेस पाठबळ देण्याचें धैर्य करणारी इतर सरदार मंडळी यांच्यावर त्या बुद्धिवादाचा चांगला परिणाम झाला. बाळाजीनें कांहीं युक्ति लढवून या सरदारमंडळींचीच नव्हे, तर पूर्वीच्या अष्टप्रधान मंडळांतील मुख्य पंतसचिव व पंतप्रतिनिधि यांचीही अशी खात्री करून सोडली कीं, सर्वांचे हेतू एकच आहेत व सर्वांनीं जूट करून राहिलें, तरच फायद्याचें आहे. शाहूरानाच्या कारकीर्दीच्या प्रारंभीं तसेंच युद्धामध्येंही खंडेराव दाभाडे यांनीं जी महत्वाची कामगिरी बजाविली, तीबद्दल ‘सेनापति' हा हुद्दा त्यांना मिळाला. त्याचप्रमाणें परसोजी भोंसले यांचाही मान होऊन त्यांना 'सेनासाहेब सुभा' अशी पदवी मिळाली. या सरदारांनी खानदेशांत व व-हाडांत जीं ठाणीं मिळविलीं होतीं ती त्यांच्याकडेच स्वतंत्रपणें ठेवण्यांत आली. व त्यांना आतां पश्चिमेस गुजराथ व पूर्वेस गोंडवण ह्या प्रांतांत स्वा-या करून यश संपादन करण्यास सररास परवानगी झाली. त्याच प्रमाणें उदाजी पवारांच्या महत्वाकांक्षारूपी पाण्याच्या ओघास माळव्यामध्यें मार्ग मिळाला. या तीन बड्या सरदारांना असेंही वचन मिळालें होतें कीं, जर ते मुख्य सरकारांशीं सलोख्यानें वागून आपली सर्व फौज एके ठिकाणीं करतील, तर त्यांनीं मिळावलेले हक्क कायदेशीर आहेत अशाबद्दलची कबुली दिल्लीचे बादशहापा-- सुद्धां मिळवितां येईल. अक्कलकोट येथील फत्तेसिंग भोंसले यां --दक्षिणेंत कर्नाटकांत प्रांत जिंकायाकरितां जें शाहूचें सैन्य तयार होतें, त्या सैन्याच्या नायकत्वाच्या जागी नेमणूक झाली. दोघे -- निधि, बापलेक यांपैकी एकानें लढाईत नांव गाजविले होतें व -- -यानें कोल्हापूरकराबरोबर जे तटे चालले होते त्यामध्यें कीर्ति .. विली होती, खटाव महाराज व कोंकणांतील सिद्दी, या चौघांचे ताब्यांत वारणा व नीरा या नद्यांमधील मुलूख देऊन त्यांचाही सन्मान केला होता. कान्होजी आंग्यांना मराठी साम्राज्याचे नौकानायकत्व देण्यांत येऊन, कोंकणांतील किल्ले पूर्वीप्रमाणेंच त्यांच्या ताब्यांत रहावेत, असें ठरलें. गोविंदराव चिटणिसांनींही युद्धांत कर्तव्य बजाविलें होतें, तेव्हां त्यांनाही लष्करी अधिकार देण्यांत आला. याप्रमाणें मोठमोठ्या सरदारांमध्यें सर्व सत्ता व अधिकार वांटले गेले व बाळाजी विश्वनाथ मात्र शाहूचा मुख्य मुलकी मसलतगारच राहिला. यांतच त्याला समाधान वाटे. नाहीं म्हणावयाला, खानदेश व बालघाट या दूरदरच्या प्रांतांत जे शाहूचे हक्क होते, त्यांवर मात्र बाळाजीचा लष्करी अंमल चाले. परंतु यापासून अधिकारप्राप्ति किंवा द्रव्यप्राप्ति कांहींच होत नसे. हा सुप्रसिद्ध स्वार्थत्याग बाळाजीच्या अंगचा विशेष गुण होय व राष्ट्राचें संरक्षण व उन्नती करण्याकरितां सर्व सरदार लोकांची एकी करण्याचा जो घाट त्यानें घातला होता, त्यांत यश येण्यास या त्याच्या अंगच्या गुणाचा फारच उपयोग झाला. या स्वदेशाभिमानानें केलेल्या प्रयत्नांचा असा परिणाम झाला कीं, शाहूची नोकरी . धरल्यापासून दहा वर्षांच्या आंतच राष्ट्रामध्यें ऐक्य उत्पन्न करण्याचें, व मराठी साम्राज्याचे तुकडे तुकडे होतात की काय, अशी भीति उत्पन्न करणारीं परस्परांमधील फुटीची कारणें नाहींशीं करण्याचें श्रेय बाळाजीनेच घेतलें. तेव्हां स्वार्थांकरितां लढणारे मोंगल सुभेदार व दिल्ली येथील बडेबडे, वजीर, पूर्वी शिवाजी व त्याचे सरदार यांना जो मान . देत, तोच मान आतां शाहू राजासही देऊं लागले, यांत कांहीं नवल नाहीं. व लवकरच दिल्ली येथील नाखूष झालेल्या लोकांचे तट आपभापलें हित साधण्याकरितां शाहूचीच मदत मागू लागले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries