Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

१ जेष्ठ वद्य ९ नवमीस वाड्यांत वेदशास्त्रसंपन्न रा केसोभटजीस व हरि सिध्देश्र्वर यांस वेदशास्त्रसंपन्न शास्त्रीबाबांनी बोलावून नेले. तेथे आणखी चार शिष्ट बसून दुसरे सरकारी काम विचारून चार घटका रात्रीस उठिले आणि सांगितले की, उदईक चासकरांचे काम. ऐसे म्हणून उठून घरास गेले. ते दिवशी इतका मजकूर वाड्यांत देवघराकडे जाला. भटजी व आपण घरास आलो.

१ जेष्ठ वद्य १० दशमीस वाड्यांत मागती देवघरांत शास्त्रीबाबा व भटजी व त्रिंबकपंत वर्तक व रा विठ्ठलराव अण्णा व हरि सिध्देश्र्वर व महादाजी अनंत, ऐसे बसलो तेथे बोलणे जाले त्यास शास्त्रीबाबांनी सांगितले की, वाद्या नकला खोट्या केल्या ऐसे म्हणतो, आमचे साधन ऐकून नकला केल्या आहेत. त्याजवर उत्तर विठ्ठलराव व भटजी यांणी केले की, उत्तम आहे, नकला खोट्या आपले साधनाच्या केल्या म्हणून वाद्या म्हणतो, त्यास आपर सकारकिफायत का बुडविता, न्यायनिपुण आपण आहा, तरी येक मुचलका वाद्याचा घ्यावा की नकला खोट्या जाल्या तरी आपण खरे. नकला पत्राप्रमाणे ख-या जाल्या तरी भांडण भांडतो ये समयी सरकारचे गुन्हेगार, व आमचा मुचलका घ्यावा की नकला आणल्या आहेत ह्या पत्राप्रो पत्रे आणून ख-या करून देऊ, नकला खोट्या केल्या ऐसे जाले तरी सरकारचे गुन्हेगार, वाद्या म्हणतो त्याचा ताबासाल होईल. त्याजवर शास्त्रीबाबा बोलले की, उत्तम आहे. त्यास शास्त्रीबाबा म्हणाले की, वाद्यास उदैक मुचलका देणे म्हणून सांगतो, परंतु वे || केसोभटजी वर्तमान माहीतगारीचे व मातुश्री रखमाबाई मातुश्रीचे सांगितल्यावरून सांगतात त्याप्रो आम्हाजवळ लेहून द्यावे, चार वेळ अवकाश करून ऐकून घेतल्यास स्मरण रहात नाही, लिहिले असले कागद काढून पहावे. त्यास आम्ही उत्तर दिले की, आमचा वाद नाही, तेव्हा लिहोन देणे नाही. त्यास बाबा बोलले की, लिहून देऊ नका, परंतु वर्तमान भटजी बोलतात त्याप्रो रा त्रिंबकपंतास सांगणे, ते लिहून ठेवतील. त्यास भटजीचे सांगितल्याप्रो वर्तमान रा त्रिंबकपंताजवळ सांगणे, ऐसा करार जाला. आणि मुचलका घ्यावा, नंतर जे करणे ते करावे, ऐसा ठराव होवून उठले.


१ जेष्ठ व || १२ स रा त्रिंबकपंताजवळ वर्तमा सांगितले आणि आपल्या कारकुनाकडून लिहून ठेविले. त्याची नक्कल हरि सिध्देश्र्वर यांनी घेतली आहे. त्याजवर रा विठ्ठलराव गेले. श्रीपंढरपूरचे यात्रेस जाऊ लागले, तो बाबांनी चोपदार पाठवून एक दिवस राहविले. कारण की, तुम्ही श्रीमंताचे आप्त आणि थोर गृहस्थाच्या समंदाचे भाचे, तेव्हा तुमचे समक्ष मुचलके करून फडशा करू, मग यात्रेस जावे. त्यास अण्णांनी विनंति केली की, हे काम एका दिवसांत होत नाही, यात्रेस जरूर जाणे. त्यास बाबा बोलले की, तुम्ही जाऊन लौकर यावे, तोपर्यंत मुचलक्याचे काम सिध्द करितो. एसे बोलले. का १४.