मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २६२

श्री.
१७०२ आश्विन शुद्ध १३

यादी सदासिव दीक्षित वाजपेय याजी वा शाहूनगर यांस सरकारांतून प्रतिवर्षी दहा हजार रुपये पावत असत, ते सहा वर्षे पैसा पावला नाहीं. कदाचित् आजपर्यंत राहिले ते वजा करून पुढें सालमजकुरापासून कांहीं निर्वाहार्थ ऐवज योजून नेमून घ्यावा.
सिराळ्यापैकीं गाव देविला आहे तो ताकीद करून देविला जाईल. ऐवज देणें राहिला आहे. त्यास, दीक्षिताकडून कारकून आल्यावर किती ऐवज देणें तो समजोन, कांहीं ऐवजाची सोय पाहून, वरात देविली जाईल. येणेप्रों करार करावे.
छ १२ सवाल, इहिदे समानीन, अश्वीन.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries