मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २५८

( असल बमोजीब नकल.)
१७०२ श्रावण

पंडत अजम बाळाजीपंत फडणवीस सलमलाहुताला.

सो मेहेरबान करमफर्माय मुखलिसां बादज षौक मुलाकत मशरर्त आयात हत्तीहाद माअसरबाद येथील खुष्की जाणून आपली शादमानी हमेशा कलमी करीत यावें. दिगर, आह्मीं घांट उतरून मखालिफाकडील कित्तेक गड किल्लेस ठाणा घातले. मजकूरास पट्टी लेहून पाठविलें असे, त्यावरून मालूम होईल. चेनापटणाकडेही दौड पाठविलें असतां, मकान मजकुराचे आसपास नीम कोसचे फासलेनें फिरंगीयांचे बाग आहे. त्या भागांतील फिरंगी सरदार वगैरेस मारामारी केल्याचा मजकूर परभारें आपणास जहूरांत येईल. इकडील फौज चेनापटणचे चौगीर्दी मारामारी करीत फिरत आहेत. बिलफैल, फिरंगीयांनी इकडे भारी शेह लागल्याकरितां मछलीबंदर वगैरे तमाम जागेची जमियेत बोलाऊं पाटविलें आहेत. त्यापैकीं कांहीं जमियत येऊन जमा जाली आहे. आणखी जामियत येऊन जमा होणार आहे. त्यांणीं जमा होऊन मैदानास निघतील तरी लढाई करावी, ह्मणोन मुकरर केलें असे. बिलफैल, या मुलखांत बारीषेचा शदत फार आहे. तरी आम्हीं आपले दोस्तीवर नजर देऊन, बारीष वगैरे एकही न पाहतां, सख्ती कबूल करून, कुल्लहा पैशाची तबीचे कामावर नमूद जालों असों. जे जे तंबी होत जाईल ते हुजुरांत येईल. नबाब निजाम अल्लीखां व भोसले तांहाल खामोष याचा सबब काय न कळे. तरी कलमीं करून पाठवावें. कृष्णराव नारायण तेथे पोहोंचले असतील. आपणाकडून येथें राहावयाबद्दल रावमानिलेसच रवाना करून पाठविणेचें करावें. हमेषा आपली शादमानी कलमी करीत यावें. जिआदा लिहिणें काय असे ? हे किताबत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries