मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२४

श्री.
१७०१ भाद्रपद वद्य ८

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे शेवेसीः-

सां नमस्कार विनंती. चिरंजीव राजश्री नारोबा नानास शिंदे घेऊन आले नाहींत. दरबारचा प्रसंग पडेल तसें करावें. कजायामुळें घेऊन न आले म्हणोन लिा त्यास सर्व प्रकारें आपण आहेत. उभयतां कारभारी यांचे आश्वासन आपणांपाशीं जालें आहे. त्यापक्षीं आतां दिवसगत लागणार नाहीं. जसें कळेल तसें करून आपले जवळ आणावे व फार दिवस जाले आहेत. योगीराजाचे लक्षाचा मार लिा. त्यास यजमान साहेबांचें लक्ष श्रीमंतांपासीं. कोण्ही कालीं दुसरें व्हावयाचें नाहीं. हे खातरजमा आह्मीं ल्याहावी असें नाहीं. अनभव आहेतच. आमची निष्ठा जे आपल्यापाशीं आहे तेच. याचा संशये कोण्ही कालीं न मानावा. आपले चित्तांत नाहीं. परंतु सूचना लिहिली आहे. त्यास, येविशीं कांहींएक चित्तांत न आणावें, याची खातरजमा असों द्यावी. येविसींचें सविस्तर राजश्री बाळ ठाकूर सांगतील त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणे? कृपालोभ कीजे. हे विज्ञप्ति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries