Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
पण त्याच्या परस्परसंबंधात अभेद्य असे भेद नव्हते. म्हणून वर्ण किंवा जाती बदलणे किंवा वर्णावर्णातील लग्नांना वा संकरप्रजोत्पादनाला प्रत्यवाय नव्हता.
अशी ही वर्णसंस्था आपापल्या कर्मामध्ये कर्मसाधनेमध्ये व कर्मफलाच्या उपभोगामध्ये रत होऊन समाजाला संपन्न करीत राहिली. संततपणे तेच ते हत्यार व तेच ते काम अंगमेहनतीने करीत राहिल्याने कर्मफलाची निष्पत्ती वाढत गेली. निसर्गदत्त अन्नपाण्याचे सौकर्य अथवा वैपुल्य व कामाचे परंपरागत कौशल्य, त्यातून निर्माण होणारी संपत्ती यामध्ये काही काळाने वर्ण व जातिकर्मामध्ये बांधिलकी येणे अपरिहार्य होते. ते होता होता संकराची क्रिया बंद पाडण्याची प्रवृत्ती वाढली. चारही वर्षांच्या सर्वसकट विवाहपद्धतीवर बंधने आली. शेवटी संपत्तिसाधन व त्यासाठी अनुभवजन्य समाजनियमन यांमुळे वर्ण व जाती लखोटेबंद झाल्या. या आर्थिक व सामाजिक प्रक्रियेचा नियम मार्क्सच्या 'भांडवल' या ग्रंथात सांगितला आहे.
ही प्रक्रिया हिंदुस्तानच काय तर इजिप्त वगैरे परदेशातही पुरातन काली झाली होती. उत्पादन व त्यांच्या साधनांची प्रगती झाल्यावर श्रमाची त्रैवार्णिक विभागणी जाऊन त्या जागी चातुर्वर्ण्य निर्माण झाले.
त्रैवर्णिकामधून चातुर्वर्ण्यात पोचण्याची क्रिया ही एक आर्य समाजातील क्रान्तीच होती. तिचे संपूर्ण वर्णन इथे करणे शक्य नसले तरी तिचा मुख्य गाभा जो राजवाड्यांनी दिला त्याचा सारांश देणे आवश्यक आहे.
या समाजसंस्थेचे वर्गनिष्ठ किंवा वर्णनिष्ठ कर्मविभागणीचे अत्यंत प्रभावी दर्शन राजवाडे यांनी पुरुषरक्तावर जे भाष्य केले आहे त्यात मिळते. राज्य व वर्ण-बर्ग-संस्थेचे इतके पुरातन इतिहासलेखन जगाच्या कुठल्याही वाङ्मयात सापडणार नाही.
त्रैवर्णिक आर्य समाजाचा चातुर्वर्णिक समाज शूदागमनाने किंवा समन्वयाने झाला. या चातुर्वर्णिक क्रान्तिकारक घटनेमुळे आर्य समाजाची जी भरभराट झाली, पुनर्रचना झाली त्याची फोड स्वतंत्रपणे राधामाधवमध्येच संपूर्णपणे वाचणे योग्य होय. राजवाडे लिहितात : "त्रैवार्णिकांच्या समाजामधे एव्हापर्यंत शूद्राला आपले स्वतःचे असे हक्काचे स्थान नसे. ते हक्कांचे स्थान चातुर्वर्ण्य संस्थेच्या निर्मितीने शूद्रास कायमचे मिळाले. आजपर्यंत शूद्राला त्रिवर्णबाह्य अस्पृश्य व ओंगळ समजत. इथून पुढे तो चातुर्वर्ण्यान्तर्गत, स्पृश्य व सोंगळ समजला जाऊ लागला. चातुर्वर्ण्यात घेतल्यामुळे चातुर्वर्ण्याचे सामान्य धर्म पाळण्याची त्याच्यावर जबाबदारीही आली......तात्पर्य, चातुर्वर्ण्यात आल्याने शुद्राची रानटी स्थितीतून ग्राम्य स्थितीत बढती झाली."
महिकावती (माहीम)ची बखर
तंव त्या महावना माझारी ।। राजा देववीर राहिला अवधारी ॥
त माध्यानरात्रिचे अवसरी ।। आलि राक्षेसिणी आईका ।। २५३ ॥
महाविक्राळ सोंग ।। बाबरझोंटि उघडे आंग ।।
शब्द महाप्रचंड । केला तिणे ।। २५४ ॥
शरिर दिसे दुर्धर ।। घोर शब्दें गर्जलि निशाचर ।।
तें देखोन थोरथोर ।। वीर भयाभित पैं जाले ।। २५५ ।।
राजा देखोन तितें नयनी ।। क्रोधें खवळला महा अग्नी ।।
धनुष्य टणत्कारिलें संजोगोनी ॥ गुण चढविला ॥ २५६ ॥
गुणि लाविला बाण ।। करितां जाला संधान ।।
तंव ते बोलिली वचन ।। निशाचरी ॥ २५७ ॥
राया तुं कवण होसी । कवण देशिं नांदसी ।।
सत्य सांगे मजसी ।। नृपवरा ।। २५८ ।।
येरु बोलिला वचन ।। मी शेषवंशि निर्वाण ।।
तुं मज पुसावया कैचे ज्ञान ।। राक्षेसि म्हणोनी ।। २५९ ॥
येरि बोलिली उत्तर ।। मी सिंधाळनगरिची सुंदर ।।
जांघेळकुळि उत्पति साचार ।। मनोहर नाम माझें ॥ २६० ॥
मग ते राक्षेसी ।। मानववेश नटलि परियेसी ।।
जालि लावण्यरुप षोडशी ।। सकुमार अनुपम्ये ॥ २६१ ॥
तेजें जैसी विद्युल्लता ।। कोटि-दीनकर-प्रभा फांकता ॥
राजा जाला देखतां ॥ अति अपुर्व वर्तलें ।। २६२ ॥
ते महासुंदर राजसी ।। लावण्यरुपाचि रासी ।।
उपमा न ये देतां तयेसीं ।। माईक अनुपम्य ।। २६३ ॥
तिते देखोनि नृपवर ।। कामे विव्हळ देवदत्त वीर ।।
बोलता जाला प्रत्योत्तर ।। तिये प्रती ।। २६४ ॥
तुवां मोहिलें मजसी । आतां आईके विनतीसीं ॥
सर्वश्व देईन तुजसी ।। जरि वरिसी मज लागी ।। २६५ ॥
ईतुकें वचन ऐकुन ।। बोलति जालि मनोहरा आपण ॥
जरि राणियां भितरि वडिलपण ।। नुलंघसि वचन माझे पैं ॥ २६६ ॥
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
याचे कारण एकच की इंग्रज अमेरिकन-जर्मन ग्रंथकारांच्या ओंजळीनेच ज्ञानरस प्यायची सवय, संस्कृत कोशकार मौनियर विलियम्स मोठे, पण आमचे आपटे मात्र कश्चितात गण्य!
चतुष्पाद प्राण्यापासून द्विपाद मनुष्यप्राणी उत्पन्न झाल्यानंतर त्याची स्थित्यंतरे कशी काय झाली व त्याबद्दल प्राचीन आर्यांच्या शस्त्रात काय लिहिले आहे याचा मुळी आमच्या अनेक विद्वानांनी विचारच केला नाही. त्यामुळे आपली अद्यापही किती राजकीय, आर्थिक व वैचारिक हानी होऊन भाऊबंदकी माजत आहे ?
स्वतः राजवाडे यांनासुद्धा मराठी इतिहासाची, सरदार-इनामदारांच्या घरची, सड़की मळकी दप्तरे धुंडाळता धुंडाळता इतके आयुष्य खर्च करावे लागले की हिंदवी समाज विकासाचा व शास्त्राचा विचार करण्यासाठी फुरसत मिळत नसे. पण असामान्य व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे 'जीनिअस ' टाईपची, म्हणूनच या सर्वातून ते रस्ता शोधून काढू शकले. पण ते करता करता अपुरेपणीच त्यांचा जीवनप्रवाह संपला.
या संबंधांचा विचार करण्यापूर्वी राजवाडे हिंदवी म्हणा किंवा आंर्य किंवा हिंदू ( हिंदू हे नाव कुठल्याही शास्त्रग्रंथात नाही व त्याची व्याख्याही नाही ) यांच्या समाज व राज्यरचनेचा विचार करण्यात गुंतले होते.
लैंगिक अथवा विवाहसंस्थेच्या ज्वलंत विषयाला हात घालण्यापूर्वी त्यांनी दोन तीन अत्यंत मूलगामी प्रश्न हाती घेतले होते.
एक म्हणजे वर्ण आणि जाति-संस्था आर्यांनी कुठे, कधी, कां व कशा निर्माण केल्या हा अत्यंत महत्त्वाचा व जिवंत विषय आहे. अस्पृश्य जातींच्या लोकांची आजची अत्यंत अपकृष्ट स्थिती पाहून त्यांची पूर्वेतिहासरचना करता येत नाही. उदाहरणार्थ, पूर्वी अनेक आर्यसमूहामध्ये वर्णांची आळीपाळीने बदली होत असे. काही काळ ब्राह्मण्यात प्रविष्ट झालेले शूद्र होत तर शूद्वर्गीय ब्राह्मण होत. हा चक्री नियम काही काळाने बदलावा लागला. ज्या मनुष्यजातीला अग्नी कसा उत्पन्न करावा हे माहीत नव्हते, तो सापडताच त्यांची आर्थिक जीवनाची व साधनाची परिस्थिती बदलली. खूप मनुष्यबळ हे एक साधन, त्यासाठी खूप व बेबंद यमनक्रिया करून मनुष्यसंख्याबल उत्पन्न करून स्वसंरक्षण व वर्धन करणे हेच प्राथमिक लैंगिक संबंधाचे हेतू होते. नंतर रक्तबीजशुद्धीचे ( इन्सेस्टचे ) ज्ञान सामायिक प्रजोत्पादनाच्या परिणामांच्या अवलोकनाने झाले. तेव्हा मातापुत्र,भाऊबहीण वगैरे शरीरसंबंधांवर नियंत्रण घालून ते निषिद्ध करण्यात आले; पण त्यांचे अवशेष वेदातल्यो यम-यमी संवादात व वर्णभेदरहित यमनक्रियावाचक क्षत्तापालागली संवादात, वेदोक्त यज्ञक्रियाबद्ध धर्मरक्षणाच्या नावाखाली आपल्या हाती पडले आहेत. त्याचा समाजशास्त्रासाठी प्रथमच राजवाडे यांनी उपयोग केला. नंतर आर्यसमाजाची संपत्ती, साधने व निसर्गसाधने वाढत गेली, पशुपालन वाढत गेले, तसे वेदकर्माचे साफल्य म्हणजे प्रजापशवः उत्पन्न करणे. यज्ञाचा म्हणजे समाजाच्या उत्पादन-वितरणकार्याची, दानाचा, दैवी याचनेचा तो मुख्य विषय झाला. पुढे उत्पादनाची साधने वाढत वाढत अनेक वस्तूंच्या उत्पन्नाची हत्यारे व त्यांचे कौशल्य वाढविणे आवश्यक झाले तसतसे अनेक जाति-धंदेवाचक समाज-गट पडत गेले.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
परंतु ज्याला आपल्या भाषांचा, चालीरीतींचा, सामाजिक व ऐतिहासिक हालचालींचा, राज्यांचा, समाजपरिवर्तनाचा, भाषापरिवर्तनाचा, विचारपरिवर्तनाचा व वर्गबंधरचनेचा इतिहास लिहायचा असेल त्याला प्रथम मार्क्स-एंगल्स व त्याच्यासह राजवाडे-संशोधनाचा खजिना घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. हे काम आमच्या विद्वानांनी व मार्क्सएंगल्सच्या शास्त्रानुयायांनी करावे म्हणूनच हा विवाहसंस्थेवरचा ग्रंथ पुस्तक-रूपाने मुद्रित करण्यात आला आहे.
आपल्या देशाचा, समाजाचा, समजुतींचा, विचारविकारांचा, राज्ययंत्रविकासाचा इतिहास समजण्यास माझ्या मते प्रथम राजवाडे, नंतर कोसांबी व जायस्वाल यांचा आधार घेऊनच सुरुवात केली पाहिजे. अर्थात् या सर्वांचा मुकुटमणी राजवाडे यांना मार्क्सएंगल्सच्या सिद्धान्तांच्या ' लेसर 'वत् तेजाच्या कोंदणात बसवूनच पुरुषसूक्तजन्य अशा या भुवनमंडळाचे नीट दर्शन घेतले पाहिजे.
या माझ्या विधानाने मी कुणाही इतिहासकाराची किंवा संशोधकाची कामगिरी कमी लेखू इच्छीत नाही. पण असा प्रश्न कां विचारू नये की इतक्या सर्व विद्वानांसमोर वेदादी ग्रंथ हजर असता, पाणिनी व पतंजली उभे असता, त्यांना राजवाड्यांचा विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या मूलगामी सिद्धान्ताचा शोध कां लागू नये किंवा अर्थ कां सांगता येऊ नये ?
जाति-संस्थेचा इतका अचाट ऊहापोह व जाती मोडण्याची अफाट व न्यायभूत चळवळ करणा-या विद्वानांच्या मनात घोळणारा जाति-संस्थेचा मूलगामी सिद्धान्त फक्त मार्क्स-एंगल्सनी सिद्ध केला आहे; पण त्याला परिपोषक व त्यांचे सिद्धान्त माहीत नसती तत्सम इतिहासाची मांडणी फक्त राजवाडे यांनीच केली आहे हे स्पष्ट आहे. याचे कारण इतकेच की आमची बरीच इतिहासकार मंडळी जर्मन, इंग्रज, अमेरिकन शोधकांच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय घेऊन इतिहास-शोधनात परभृताप्रमाणे प्रविष्ट झाली असे म्हटले तर कुणी राग मानू नये.
नाही तर वेद वाचणा-या किंवा प्रत्यक्ष मनुस्मृतीने सुद्धा मान्य केलेल्या अनेक विवाहपद्धतीचा विचार करून आर्य समाजातील अनेक विवाहपद्धतींचे म्हणजे स्त्रीपुरुष लैंगिक संबधाचे विवरण कोणी का केले नाही ? चतुष्पाद स्थितीतून द्विपाद स्थितीत अवतीर्ण झालेल्या या मनुष्य प्राण्याचे विकासशास्त्र डार्विनच्या पुस्तकाने कधीच करून टाकले होते. लेटुर्नोचे रानटी समाजातील लैंगिक संबंधांचे तसेच बॅशोफेनचे ग्रंथ आमच्या संस्कृतज्ञ सर्व विद्वानांसमोर आज अनेक वर्षे होते. त्यांनी त्याचा वापर करून राजवाड्यांनी जो हिंदू विवाहसंस्थेचा इतिहास १९२०-२३ साली लिहायला घेतला तो या इतरांनी कां नाही घेतला ? एवढेच नव्हे तर राजवाड्यांनी तो प्रश्न उचलताच त्यांच्या प्रकाशकाला मारण्याची धमकी देण्यात आली. प्रत्यक्ष जिच्या आधारे मालमत्तेचे अनेक तंटे इंग्रजी कोर्टात वकील मंडळी लढवीत त्यांनी मनूच्या अनेक विवाहप्रकारांसंबंधी किंवा सगोत्रावरची बंदी, सपिंडाचा विचार इत्यादीकडे कां लक्ष दिले नाही ?
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
जाता जाता असाही येथे उल्लेख करावासा वाटतो की काही महाशय संस्कृत भाषा सर्वांना शिकवून आपल्या देशातील काही प्रकारच्या, विशेषतः भाषा-भेदोद्भव, भेदभावांना काढून टाकून राष्ट्रीय ऐक्य साधू इच्छितात. त्यासाठी रेडियोवर काही संस्कृतसम "आवाजी " अथवा वाचन करतात. या महाभागांच्या एवढेही लक्षात येत नाही की भाषा ही व्यवहारातून निघत रेडियोमधून नाही. संस्कृत क्रियापदाला लिंग नाही आणि आपल्या हल्लीच्या अनेक भाषांत तीं तीनतीन आहेत. तसेच संस्कृताच्या द्विवचनाला आपण कधीच निकालात काढले आहे. ज्ञानेश्वरीत जुन्या मराठीचे एक द्विवचनाचे उदाहरण जुना अवशेष म्हणून सापडल्यावर राजवाड्यांना केवढे भाष्य लिहावे लागले. एवढेच नव्हे तर द्विवचन, त्रिवचन-म्हणजे अनेकवचनच-का व चार वचनाला काय म्हणतात असा प्रश्न शाळेत मास्तरांना विचारल्यामुळे मास्तरांचा जो थोबाडीत फटका बसला तसले "शंकासमाधान" पाहून राजवाडे या प्रश्नाच्या मागे लागले. त्यातूनच "संस्कृत भाषेचा उलगडा" हा अत्यंत मौलिक शास्त्रीय ग्रंथ उत्पन्न झाला. पण त्याचा मागमूसही न घेता आमचे राज्यकर्ते व गांवढळ विद्वान डॉ. भांडारकरी व्याकरणाची शालोपयोगी पुस्तके शिकवून व रेडियोवर अज्ञेय असे संस्कृतसम निरनिराळे आवाज काढून हिंदुस्थानची एकी घडवू पहात आहेत.
भारतीय समाजाची किंवा त्यापूर्वीच्याही समाजाची घडण कुठून कशी निघाली याचा अभ्यास संबंध मानवजातीच्या एकात्मतेच्या ध्येयाला अत्यंत जरूरीचा आहे. त्याबाबत आम्हा मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट शास्त्राचे मूलभूत सिद्धान्तही आहेत. त्यांची व्याख्या मी इथे। करू इच्छीत नाही. ती व्याख्या राजवाड्यांच्या वाचनात आली नाही. ते हेगेल व कॉम्टपर्यंत पोचले; पण हेगेलच्या निर्गुण परमतत्त्व-वादावरच राजवाडे थांबले. त्याच्यापुढे जाऊन फायरबॉख व नंतर मार्क्स-एंगल्स यांच्यापर्यंत जाण्याला त्यांना संधी मिळाली नाही म्हणा किंवा हेगेलियन परब्रह्माचे डायलेक्टिक्स व त्यातून निघणारें विरोधविकासशास्त्र पुरेसे समजून त्यांना पुढे सरकणे जमले नाही. म्हणून ते अद्वैत वेदान्तावर थांबले हे खरे. त्यांच्या 'विकार-विचार साधनांची उत्क्रांति ' या लेखामध्ये त्यांचे मन द्विधा झाले होते व अद्वैत वेदान्ताच्या जोडीला त्यांनी भौतिक शास्त्रालाही जागा देऊन टेवली. ईश्वरकल्पनेच्या भ्रांतामधून सत्याकडे येण्यासाठी अद्वैत वेदांताच्या जोडीला अद्वैत प्रकृती अथवा गीतेमध्ये ज्याला ‘परा प्रकृती' म्हटले आहे तेथपर्यंत राजवाडे आले व तिथेच थांबले. मनुष्यसमाजाच्या प्राकृतिक व ऐतिहासिक द्वंद्वाची गती त्यांना सापडली नाही.
या एकमेवाद्वितीयं परमाणुमय पण अत्यंत शक्तिमान अशा पराप्रकृतीपासून राजवाड्यांनी ब्रह्मांडरचनेचा व तज्जन्य समाजरचनेचा, भाषारचनेचा, वर्ण व जातिरचनेचा एवढा इतिहास-प्रपंच उभा केला आहे की त्याची अद्याप नीट पहाणीसुद्धा कोणी केलेली नाही. हिंदूंच्या परंपरागत व प्रचलित समजुती व भावना यांना कशाला हात लावा असा संधिसाधु विचार करून किंवा राजवाडे हाच इतका कोण मोठा शहाणा की ज्याने पाणिनीला काही ठिकाणी समाज-इतिहास अवगत नसल्याने भाषाशास्त्रोद्भव अशी अष्टाघ्यायी अशास्त्रीय पद्धती अवलंबाव्या लागल्या असे म्हणण्याचे धाडस करावे असे विचारणारे काही विद्वानही आपल्यात निघाले.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
मुसलमान रियासतीबद्दल वाटेल त्या कल्पना पसरवून आपण आपल्या लोकांच्या राष्ट्रीयत्वाच्या व एकीच्या वाढील; संकुचित कुंपणे घालीत आहोत व हिंदुस्थानातील सर्व जनतेच्या एकात्मतेला अडथळे निर्माण करीत आहोत. एका दैवी संदेशाचा आधार घेऊन वाळवंटमय प्रदेशातून हा मुसलमानी लोंढा जगभर कसा पसरला; जे अलेक्झांडर, अशोक किंवा नेपोलियन यांना जमले नाही ते या केवळ टोळीबद्ध समाजाला कसे जमले, याचे धड शास्त्रही सांगणे ज्यांना जमत नाही ते इतिहास काय लिहिणार किंवा शिकवणार व तो कसा ? तशी टोळधाड म्हणाल तर त्यापूर्वी ग्रीक व रोमन, अलेक्झांडर व सीझर यांनीही घालण्याचा प्रयत्न केला होता आणि अटिलाच्या श्वेत व ताम्र हुणांच्या स्वायांचा उल्लेख. ही आपल्या इतिहासात आहे. नंतर मराठ्यांच्या टोळधाडी उत्तर हिंदुस्थानात शिरून त्यांनी काय केले त्याचे संस्थानी अवशेष व दप्तरे अजूनही आहेत. महादजी शिंद्यांची अमोल दप्तरे ग्वाल्हेर दरबारात धूळ खात आहेत. पण या सगळ्यांची इतिहाससंगती कशी लावायची ?
हे प्रश्न आपल्या देशातील इतिहासकारापुढे आहेत. पण त्यांची संगति लावण्याचे शास्त्र काय हाच मुख्य प्रश्न सुटलेला नाही आणि नुसत्या राष्ट्रवादाची व एकीची पोकळ गर्जना करून तो सुटणार नाही.
महाराष्ट्रामध्ये तर राष्ट्रवाद, प्रादेशिक वाद व जातिवाद, शुगर-सत्तावाद, मंत्रिगणांचे परस्पर वाद व प्रतिसंवाद, तसेच त्या सर्वांवर पांघरूण घालून एकीची व राष्ट्रवादाची सोनेरी शाल चढवून वर्गविग्रहावर पांघरूण घालण्याचे धुरंधर प्रयत्न चालू आहेत; पण या सर्वांचे मूळ तत्त्व व त्याचा विकास कुठून व कुठच्या साधनिकेवरून काढायचा याची सर्वच विचारवंतांना व राज्यकर्त्यांना, तसेच सामान्य कष्टकरी जनतेला काळजी पडली आहे यात शंका नाही.
त्यासाठी मनुष्यप्राणी प्राथमिक रानटी अवस्थेपासून इथपर्यंत कसा पोचला याचा एखादा सर्वंकष सिद्धान्त सापडतो का असा प्रश्न आहे. त्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक साधने व इलाजही शोधण्यात अनेक विद्वान व सामान्य लोक गुंतलेले आहेत.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
हे काम शक्य आहे का याचे उत्तर देणे कठीण आहे. सरकार आणि धनाढय कारखानदारांच्या देणग्यावर ज्या संस्था अथवा व्यक्ती आज या क्षेत्रात कार्य करीत आहेत त्यांच्यापासून ग्रंथनिर्मिती होते, पण त्यामुळे प्रगतीचे पाऊल फारसे पुढे पडण्याची आशा नाही. अशा संस्था अथवा विद्वानांची येथे नावे घेणे योग्य नाही. पण हे विधान सत्य आहे हे खरे.
नाही तर शिक्षणक्रमात अथवा विद्वानांच्या चर्चेत अथवा रोज गाजणा-या सेमिनारचक्रात अथवा विद्वज्जनसभांमध्ये राजवाडे, कोसांबी, जायस्वाल यांचा नाममात्र सुद्धा उल्लेख न होण्याचे कारण कुणी सांगेल का ?
या कार्यासाठी पैसा कसा उभारायचा याचा विचार नंतर करावा. प्रथम वैचारिक सामग्री जमा करायला सुरुवात करावी.
ही योजना आखीत असताना प्रथम राजवाडे यांच्या लिखाणाचा, त्यांच्या भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, विचार विकारप्रदर्शनशास्त्र इत्यादींचा पूर्ण व एकसंघ सारांश तरी तयार व्हायला पाहिजे.
मोगल काळाचा योग्य इतिहास नाही. आहे तो जातीय अपप्रवृत्तींनी भरलेला आहे. हा कालखंड तर अत्यंत महत्त्वाचा, जवळचा व अद्याप हिंदुस्थानच्या समाजजीवनात व विचारसाधनिकेमधे खूप जीव धरून बसलेला आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा शेवटचा कालखंड म्हणजे मराठी राज्य व मराठ्यांचा राष्ट्रसमगुणी भावनांचा प्रबंध. त्याचा विचार राजवाडे सोडून इतरांनी नीटसा व फारसा केलेला नाही; कारण महाराष्ट्रधर्म, रामदास व इतर संतमंडळी यांच्या ऐतिहासिक कामगिरीबाबतच्या मतभेदात तो भाग बुडाला आहे.
मराठे समजायला मोगल समजले पाहिजेत व इंग्रज समजायला मराठे समजले पाहिजेत. नुसत्या मशिदी, देवळे, चर्च आणि त्यांची दानपत्रे किंवा भग्नखंड पाहून किंवा भूदान व गोदानाच्या सनदा पाहून इतिहास लिहिणा-यांनी बराच गोंधळ केला आहे. म्हणून आपल्या नव्या राष्ट्राच्या व नव्या समाजाच्या निर्मितीसाठी शास्त्रशुद्ध नवा इतिहास रचणे हे विचारवंतांचे काम आहे.
त्यासाठी प्रथम राजवाडे-वाङ्मयाचा नीट अभ्यास झाला पाहिजे. राजवाड्यांच्या ऐतिहासिक प्रस्तावना व मराठ्यांच्या इतिहासाची साधने शास्त्रशुद्ध आसंदीवर बसविली पाहिजेत.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
या सर्व खटाटोपांचा पाया एंगल्स यांचा "कुटुंबसंस्था, खाजगी मालमत्ता आणि शासनसंस्था यांचा उगम " हा ग्रंथ धरायलाच पाहिजे हे सांगायला नको.
पण त्या कामात हात घालण्यापूर्वी राजवाडे यांच्या संपूर्ण वाङ्मयाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
हिंदुस्तानच्या या नव्या इतिहासाची रचना करणे हे अवघड काम आहे. त्यासाठी एक कमिटी नेमून तिने कोणकोणाचा सल्ला घेऊन काम करावे असाही प्रश्न आहेच. काही नावे मला परिचित आहेत. त्यात सर्वश्री आर. एस. शर्मा, 'शूद्र' या ग्रंथाचे लेखक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रो. मिराशी, प्रो. नूर-उल-हसन, सोवियट इतिहासशास्त्रज्ञ बोनगार्द लेव्हिन इत्यादींचा सल्ला व सहाय्य घेणे जरूरीचे वाटते. आणखी विद्वान मंडळी आहेत पण त्या सर्वांची नावे घेऊ गेल्यास यादी फारच मोठी दिसेल. ( अभ्यंकरशास्त्री आज हयात असते तर किती तरी बरे झाले असते. त्यांच्या मारेक-यांनी संस्कृत व्याकरणशास्त्रावरच एक जीवघेणा वार केला आहे हे त्या मारेक-यानाही दिसले नसेल.) आपल्या देशात जे विकृत विचार इतिहासलेखनद्वारा पसरविले जात आहेत त्यासाठी हा खटाटोप जरूरीचा आहे.
या इतिहासग्रंथाचा पसारा ज्ञानकोशाएवढा नको. तसेच जुन्या भिकार इंग्रजी चाकोरीतलाही नको. म्हणूनच राजवाडे, कोसांबी व जायस्वाल यांच्या ग्रंथांचा प्रथम उल्लेख केला आहे. डॉ. भांडारकर आणि इतर पंडितांचेही लेखन मदतीला घ्यावे.
एंगल्सचा ग्रंथ मूलभूत धरल्याने कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करणे असा या सूचनेत उद्देश नाही. प्रत्यक्ष राजवाडे, कोसांबी, जायस्वाल यानी जी सामग्री काढून ठेवली आहे तिचा आराखडा दिला तरी प्राथमिक गरज भागण्यासारखी आहे. शिवाय कोसांबी यांना मार्क्स-एंगल्स मान्य होते हे सर्वश्रुत आहे.
या खटाटोपाचा उद्देश हा की हल्लीचे इंग्रज व तत्सम विद्वान यांचे भिकार खंड व विकृत विचार बाजूला सारून आपल्या नव्या तरुण पिढीला आपल्या देशाचे, समाजाचे, विचारांचे सत्यदर्शन देणे व त्यांचा अपप्रवृत्तीपासून बचाव करणे हा आहे.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
याच्या पुढची पायरी काय हे राजवाडे यांच्यासारख्या विचारवंताला सांगणे हे मी माझे महत्त्वाचे कर्तव्य समजत होतो. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आणि माझ्या तुरुंगवासामुळे ते करण्याची संधी मला साधता आली नाही याबद्दल दुःख वाटते. अर्थात् हा विचार अत्यंत धाडसीपणाचा किंवा उर्मटपणाचा दिसेल. पण राजवाडे विचाराने फारच प्रगतिमान व बेछूट झेप घेणारे असल्यामुळे मला त्यांची धास्ती किंवा माझी वरील आशा फोल आहे असे वाटत नव्हते. पण हे कल्पनातरंग चालविण्यात काय अर्थ आहे असे कुणीही म्हणू शकतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांचा हा अपूर्व ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासूंना पुस्तकरूपाने प्राप्त करून दिल्याबद्दल प्रागतिक पुस्तक प्रकाशनाचे आभार मानणे आवश्यक आहे. याच अपूर्व ग्रंथाबरोबर राजवाडे यांचा अत्यंत मूलभूत विचारसरणीचा दुसरा तात्त्विक निबंध म्हणजे "विकार-विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती" याच पुस्तकात घातला आहे हेही युक्तच झाले.
पुढचा टप्पा
आता यापुढे काय असा प्रश्न उभा राहातो. ‘प्रागतिक पुस्तक प्रकाशन' आणि अशाच प्रवाहाचे विद्वान यांच्यापुढे काय कामगि-या उभ्या राहतात याचा थोडासा विचार या प्रसंगानुसार मांडल्यास वावगे दिसणार नाही असे वाटते.
आपल्या देशाचा आणि समाजाचा, ऐतिहासिक भौतिकवादाची मूलतत्त्वे लक्षात घेऊन लिहिलेला, असा इतिहास किंवा त्याची आखणी अद्याप झालेली नाही. ती करणे आवश्यक झाले आहे. असा संपूर्ण इतिहास रचणारी सामग्री किंवा तज्ज्ञ मंडळी आजमितीला फारशी नाहीत. तरीपण हे काम आराखडा किंवा पायाभरणीच्या रूपाने उपयोगी सामग्री घेऊन तिचा उपयोग करणारे विद्वान अगदीच नाहीत असे नाही. यासंबंधी माझे काही कच्चे विचार येथे नमूद करण्याचे मी धाडस करू इच्छितो.
अशा ग्रंथाचा आराखडा करण्यासाठी तीन-चार संग्रहांचा प्रथम वापर करावा. पहिला संग्रह म्हणजे राजवाडे यांचे संपूर्ण लिखाण. दुसरा संग्रह म्हणजे डी. डी. कोसांबी यांचा हिंदुस्तानच्या इतिहासाची प्रस्तावना व इतर लेख. तिसरा संग्रह के. पी. जायस्वाल यांनी लिहिलेला ' हिंदू पॉलिटी' आणि चौथा माझ्या ' आदि भारत' या पुस्तकात केलेली यज्ञसंस्थेची विवेचना.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
हे मतभेदाचे मुद्दे ग्रंथ संपूर्ण झाल्यावर मी लिहिणार होतो. तेव्हा किती भाग भाषांतरित केले ते आज सांगता येत नाही व आठवतही नाही. चौथ्या प्रकरणाची राजवाड्यांची हस्तलिखित प्रत तशीच पडून राहिली व पुढच्या दंगलीत सगळेच गहाळ झाले. पण राजवाडे आपल्या लिखाणाची एक प्रत स्वतःकडे ठेवीत असत. शिवाय मी पाठवलेले छापील फॉर्म होतेच. ती प्रत पुढे धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभा व राजवाडे संशोधन मंदिर यांच्या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. त्या सर्वांना धन्यवाद द्यावयास पाहिजेत. श्री.भट यांनी मी कैदेत असताना राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर पत्राने चौकशी केली होती, की त्यांना जी चार प्रकरणांची हस्तलिखिते राजवाडे यांच्या दप्तरांत मिळाली त्यापेक्षा आणखी हस्तलिखिते माझ्याकडे पाठविली होती का ? व ती आहेत का ? अर्थात् मी नकाराथीं उत्तर दिले.
राजवाडे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्णपणे पाळली होती. मी जेव्हा एक फॉर्म छापून पाठवीत असे तेव्हाच ते दुसरा लिहीत. चौथ्या प्रकरणाचा भाग छापण्यापूर्वीच मी मार्च १९२४ मध्ये कैदेत गेल्यामुळे व माझ्या सहका-यांकडून त्यांना त्या प्रकरणांची छापील प्रत न मिळाल्यामुळे यांनी पुढचा भाग लिहिण्याचे सोडून दिले. मी १९२७ साली सुटून आलो तोपर्यंत ते दिवंगत झाले होते. राजवाडे यांच्या चौथ्या प्रकरणाच्या भागात ते स्त्री-पुरुषांच्या सांघिक अशा लैंगिक समागमातून एकपतिपत्नीक पद्धतीचा (मोनोगामीचा ) ऐतिहासिक विकास कसा दाखवतात याची मला नितान्त जरूर होती; कारण त्या घटनेचा खाजगी मालमत्तेच्या वे राज्ययंत्राच्या उदयाशीं निकट संबंध आहे. तो अत्यंत महत्त्वाचा तसाच गुंतागुंतीचा प्रश्न चौथ्या किंवा पाचव्या प्रकरणानंतर येणे अपरिहार्य होते. त्याच वेळी मी त्यांना एंगल्सच्या पुस्तकाची प्रत देणार होतो. ते जर मी करू शकलो असतो तर माझी खात्री आहे की राजवाडे यांनी आमचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धान्त मान्य केला असता. हे विधान करण्याचे धाष्टर्य मी करतो याचे कारण असे की त्यांच्या विवेचनात व विचारसरणीत हिंदु धर्म भावनेला धर्म नात्याने कुठेच स्थान नव्हते. वैदिक इतिहासावर लिहिताना ते नेहमी "आमचे रानटी ऋषिपूर्वज" असाच उल्लेख करीत. धर्मभावनेबद्दल त्यांची ऐतिहासिक वृत्ती काय होती याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा “ विकार आणि विचार प्रदर्शनांच्या साधनांची उत्क्रांती " हा लेख पाहावा. सध्या आपली घटना व समाजधारणा सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे असे जाहीर झाले आहे; पण हा केवळ जाहीरनामा आहे, सत्यनामा नाही. तो सत्य करावयाचा असेल तर सर्व शाळा-कॉलेजांतून, विशेषतः सर्व मंत्रिमंडळे, विद्वान शिक्षक आणि नोकरवर्ग यांना, या लेखाचे वाचन व मनन सक्तीचे करावे असे मला वाटते. या लेखातील एकच वाक्य नमुन्यादाखल उद्धृत करतो.
राजवाडे लिहितात : " स्थूलमूर्तीवरचा चित्रावरचा, वृक्षपशुपक्षादिकांच्या प्रतिमांवरचा तरी भ्रांत विश्वास अद्याप लुप्त कुठे झाला आहे ? आणि अद्यापि कुठे कुठे क्वचित् क्वचित् झाला. तथापि स्वर्ग, नरक, देव, देवदूत, जीव्होवा, गॉड, अल्ला या अमूर्त भ्रांत कल्पना अद्याप सर्वत्र विराजमान आहेतच. फक्त अद्वैती वेन्दाती म्हणून ज्यांना म्हणतात व भौतिक शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना म्हणतात त्याच्यातून काहींशा या कल्पना नष्ट झाल्या आहेत. परंतु या थोड्या काहींची संख्या पृथ्वीवरील लोकसंख्येच्या कितवा लक्षांश आहे ? अद्यापि जग बाल्यावस्थेत कसले शैशवावस्थेतच आहे " ( राजवाडे लेखसंग्रह पा. २६ प्रकाशन : साहित्य अकॅडमीतर्फे संपादक लक्ष्मणशास्त्री जोशी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. ). या लेखाची व वरील विधानांची बौद्धिक व शास्त्रीय झेप आमच्या अनेक विद्वानाना झेपायचीसुद्धा नाही.