मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

पु॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी, विनंति उपरि. राजश्री जीवनराव पांढरे समशेरबहादर येथें आले. भेट जाली. यांनी आपलें वर्तमान सांगितलें. इतक्यांत तुम्हांकडील पत्रें आलीं कीं “राजश्री हणमंतराव सभापत यांचे विद्यमानें मा।रनिलेकडून कर्जाबाबत वगैरे ऐवज येणें, याजकरितां सन १२०२ सालचे मोकाशाची मामलत. त्यांजकडील आटकाऊन पांढरे म।।रनिलेकडे मामलतीचा वसूल न जाय ऐसा, बंदोबस्त व्हावा " ह्मणोन लिहिलें व ऐवज येणें . त्याची याद पाठविली यावरून समजलें. मा।रनिलेसही बोलण्यांत आलें कीं “आमचे ऐवजाचा फडच्या जाल्यासिवाय मामलतीचा ऐवज तुम्हांकडे पावणार नाहीं.”, या प्र।। बोलून सजावरुदौलाकडील आवराद निठूर दोनी माहालाचे मोकाशाचा ऐवज अनामत ठेवण्याविषई त्यास सांगोन बंदोबस्त केला. सिद्दी इमाम याजकडील बेदरचाही बंदोबस्त होत आहे. वसूल यापूर्वी हणमंतराव यांजकडे पावला, तो वजा जाऊन बाकी ऐवज अनामत राहील. कोटगीर, हुसें, पोतंगल घांसीमियाचे भरण्यांत सन १२०१ पावेतों आले. पुढें सन १२०२ सालचाही ऐवज बंद करविला. जीवनराव यांचें बोलणें कीं “आपले, ऐवजास काय गुंता आहे ? वाजवी हिसेबाचे रुईनें जो ऐवज असेल त्याचा फडच्या आपण ठराऊन देतील तसा करीन.'' आमचेंही बोलणें कीं “वाजवी ऐवज आमचा तोच घेऊं. गैरवाजवी होणार नाहीं. या प्र॥ जालें. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries