Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति उपरि. गोपाळराव पांढरे तेथें आले आहेत. जीवनराव यांचा त्यांचा प्रकार तुमचे माहीतगिरींतच आहे. सांप्रत जीव नराव यांचें व कारभारी यांचें वैमनस्य, यास्तव ते कांही गोपाळराव यांस चिमटा घेऊन फंद उभा करतील. रकारनामक तुह्मांस बोध करून नानाप्रकार समजावितील. ते मनांत न आणितां, बोलतील तें ऐकून घेऊन आंतृन जीवनराव यांचे लक्ष चित्तापासोन ठेऊन गोपाळराव समंधीं नवीन दरज कांहीं न चाले, पूर्वी नेम जाला त्या प्र।। त्यानें आपला दरसाल ऐवज घेणें तो घेऊन स्वस्थ राहावें, दौलतीचा कारभार जीवनराव यांजकडे सर्व ठरल्याप्रा। चालावा, ऐसा बंदोबस्त जरूर करून ल्याहावें. कारण कीं जीवनराव यांची चाल आपल्यासि बहुत घरोब्याची व निखालसपणें आहे. यांत तथा नाहीं. तो प्रकार बदमामलीचे सिरोमणी, सर्व भाताचा वैश्वदेव करून पाहतां कशास कांहीं ठिकाण नाहीं. हा स्वभाव पुर्ता विचार समजला हे तुमचेंही मनांत आसावें. सारांश गोपाळराव वगैरे हरयेक फंद उभे राहिल्यास त्यांचें निराकरण करून जीवनराव यांजकडे लक्ष राखून बंदोबस्ताच्या शकली ल्याहाल त्याप्रा येथें पकें करितां येईल. या गोष्टीचा वाच्यांश तेथें न होतां येहतीयातीनें या बंदोबस्तांत मन ठेवावें, ज़रूर ! रा। छ, १५ जिल्काद हे विनंति.