Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२०९]                                                                               श्री.                                                                    ५ आक्टोबर १७९५.

विज्ञापना ऐशीजे--अलीज्याह बेदराहून निघणार ऐशीं वर्तमानें नबाबाकडे आलीं होतीं. ते वेळेस नबाबाचे मनांत येथपावेतों गोष्ट आलीं, तेव्हां काय बाकी राहिली ? जरब दिली ह्मणजे काय पाहिजे तसें ऐकेल. कदाचित् निघोन जाऊं लागल्यास मारून घेऊं. तेव्हां अलीज्याह आपली जमीयत आहे तितक्यानिशीं निघोन मजबुतीनें गेले. नबाबकडील जमेयत मुसारेमूसुद्धां पाठलाग करते तर ठीक होतें. तेंही न जालें. निघोन जाऊन पंतप्रधानाचे आश्रयास गेलियावर ठीक नाहीं. मग कठीण होईल. या विचारांत पडून आह्मांस बोलावून सांगितलें जे, शिकंदरज्याह यास बाहेर काढतों, तुह्मीं व मीरअलम मिळोन पुणियास जावें. दोन दिवस याजप्रमाणेंच गुलबांग होता. मीर आलम यांस नबाबानीं लिहून पाठविलें कीं, तुह्मीं पटणचरूसच मुकाम करून असावें. शिकंदरज्याह निघतात त्यांजबरोबर तुह्मीं आपली फौज देऊन तुह्मीं आणि फलाणें पुणियास जावें. त्याजवर आणखीं वर्तमान आलें कीं, अलीज्याह बेदराहून दहा पंधरा कोशीं आहेत. दरकुच गेले नाहींत. सलूखाचा जाबसालही त्यांजकडून आहे. जोंपरियंत जाबसालाचा शेवट समजतं नाहीं. तोंपावेतों त्याच मैदानांत असावें. कोठें जाऊं नये. कांहीं होत नाहीं. ऐसें जालियावर ईश्वर बुद्धि देईल तें करुं ऐसें वर्तमान नबाबाकडे आलें. त्याजवरून मलक इसाखान यास नबाबानीं बेदरास पाठविलें कीं तुह्मीं आपल्याकडून कोणी पाठवून काय बोलतात, कसें आहे हें समजून लिहून पाठवावें. कांहीं जाबसालाचें जमल्यास समेट करावा. बहकून जाऊं देऊं नये.ऐसें आतां नबाबाचे मनांत आलें. पंतप्रधान यांजकडे जावयाचा रुख अद्याप नाहीं, जाबसाल लागला आहे. त्याअर्थीं, शिकंदरज्याह यास आतांशींच बाहेर काढूं नये. आमची रवानगीही पुण्यास त्वरेनें न करावी. अलीज्याह यांचा समेट जालियावर. जाबसाल ठरवावयाकरितां सावकाश पाठवावयाशीं येईल. याप्रमाणें निश्चय होऊन मीर अलम, यांस पत्रें गेलीं कीं, तुह्मीं पटणराहून कुच करून बेदरास जावें, मलक इसाखान यास पुढें पाठविलें, ते सांगतील तें ऐकून तसें करावें, आणि वरचेवर आह्मांकडे लिहून पाठवावें. त्याजवरून मीर अलम बेदरास गेले. आमचे रवानगीचं तूर्त राहिलें. नबाबानीं यांतील कांहीं सांगितलें नाहीं. तुह्मांस दोन तीन दिवसांचे आरशांत रवाना करतों ऐसें ह्मटलें होतें. परंतु अमुक कारणामुळें स्थित जालें ऐसें सांगितलें नाहीं. खचित बातमी समजली त्याजवरून लिहिलें असे. पुढें होत जाईल तें लिहून पाठवीन. र।। छ २१ र।।वल. हे विज्ञापना.