Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२०५]                                                                               श्री.                                                                    

विनंति विज्ञापना--अलीज्याह बाहादूर बेदराहून निघोन गेले तेचसमयीं, मुसारेमू व पागावाले वगैरेइकडील सरदारांनीं ताकुब करावयाचा होता, तें न केलें. यावरून नबाबाचे चित्तांत सरदारांविषयीं रुष्टता व खफगी आहे. सरदार कोणी कोणांत नाहींत. एकाचे हुकुमानें वागणें एकास होईना. याजकरितां शिकंदरज्याह मीरपोलाद अल्लीसाहेब जादे यांची रवानगी केली असतां सरदार सर्व हुकुमाप्रमाणें राहातील, हें नबाबानीं मनांत आणून शिकंदरज्याह यास आपली तयारी असों द्यावी हे ताकीद केली. सरदारांसही इनायतनामे पिछा करण्याविषयीं रवाना जाले आहेत. सरदार बेदरावर अलीज्याह यांशीं त्यांशीं फासक लांब पडला. याजवर जें होईल व येईल वर्तमान त्यांनी विनंति लिहीन. अजमखान व घाशीमिया पाठलागास बेदरापासून कोसभर गेले, तेथें अलीज्याह यांजकडून मला मनुष्य निघोन आला. त्यानें यांस सांगितलें जे, पांच सहा हजार फौज, दहा बारा पैदळ इतका सरंजाम व तोफा आठ नऊ लैयनी याप्रमाणें मजबुतीनें आहेत. इतकेंही निवडक आहे. गाळ नाहीं. सर्वांचा एका होऊन शफत जाल्या. मरणाचा संकल्प करून संभाळून जातात. हें वर्तमान उभयतांनीं ऐकून विचार केला जे, आमचेजवळ मलक इसा मिळोन फार तर चार हजार फौज होईल. तोफ जंबुदा घेतल्याशिवाय जाणें ठीक नाहीं. ते मरणावर टेंकले आहेत. तेव्हां मजबूत असलें पाहिजे. त्यास मुसारेमूच्या लैना निवडक. कांहीं लैनी जंबुदे घेऊन जावें, ह्मणोन बेदरास येऊन मुसारेमूस विचार पुसला. तो ह्मणाला तुह्मीं आपली फौज घेऊन पिछा करावा. मला जबाबाचा हुकूम येईल तसें करीन. तेव्हां हे उगेच राहून यांनीं नबाबास अर्ज्या पाठवून वर्तमान लिहिलें कीं, फौज थोडी गाडद व आणखी फौज असावी तर निभाव होईल, याविशीं मुसारेमूस आज्ञा यावी. मुसारेमूनें लिहिलें कीं, पागावाले वगैरे पाठलागास दौड करून गेले. नाहींत. मला हुकूम येईल तसें करीन. त्याजवरून नबाब पागेवाले वगैरेवर रागें भरून शिव्यागाळी केल्या. आंतील कर्म समजून आज्ञा जाली नाहीं. त्यांचे पत्राचीं उत्तरें लिहविलीं कीं, जमीयत थोडी ऐसें आतां लिहितां, इतके दिवस कां न लिहिलें. टाळा देतां हें कार्यास येणार नाहीं. दौड करावी. मुसारेमूसुद्धां होते ह्मणोन बोभाट आज परियंत लिहिला नाहीं. मुसारेमू वेगळा. जाण्यास फौज कमीं. ऐसें त्यांचें लिहिणें. याचा विचारच नाहीं. खाविंदीचे मार्गे रागें भरून आज्ञा गेली. याप्रमाणें वर्तमान. र।। छ २० र।।वल. हे विज्ञापना.