Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२११]                                                                               श्री.                                                                    १४ आक्टोबर १७९५.

श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना. त।। छ ३० माहे र।।वलपरियंत मु॥ भागानगर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथारित असे. विशेष. स्वामीकडील आज्ञापत्रें छ १९ जिल्हेजचीं छ २३ मोहरमीं व छ २० माहे सफरचें छ ३ र।।वलीं प्रविष्ट जालीं.

१. नबाब निजामअल्लीखान बहादूर यांजकडून करारापैकीं पहिले हप्त्याचा ऐवज अखेरसालीं यावयाचा तो अद्याप येत नाहीं. येविशीं बोलून ऐवज सत्वर सरकारांत पोंहोचते करणें ह्मणून आज्ञा. त्यास हा मजकूर नबाबाशी आज्ञेप्रों। बोलण्यांत आला. उत्तर जालें कीं, करारमदारांत तफावत काय, लेकिन तालुक्याची अमदनी मझेल्यामुळें बंद आणि खर्च ज्याजती वाढत जातो, खर्च तोडून आमदनीवर सबील करावी. तो प्रकार राहिला, त्या किस्ती अशा ठरून याव्या कीं, त्यांत निभाव व ऐवज आदा होय. इत्यादिक बोलण्याचे अन्वयें तपशील गोविंदराव भगवंत यांस लिहिला. विनंति करितां ध्यानांत येईल. किस्तीविशीं सरकारचा खरीता दिल्हा. उत्तर अलाहिदा कलम. १. नबाबाकडून कराराप्रों। पहिले हप्त्याचा ऐवज आला नाहीं, यास्तव नबाबास सरकारांतून थैलीपत्र पाठविलें आहे, तुमचे विचारें द्यावयाचें जाल्यास देणें, ह्मणून आज्ञा. त्यास, सरकारचें थैलीपत्र नबाबास प्रविष्ट केलें. त्याचा जबाब यांनीं दिल्हा तो विनंतिपत्रासाहित पेशजी सेवेसीं रवाना केला. त्यावरून ध्यानास आलें असेल. कलम.

१. नबाबाकडून जागीर कराराप्रमाणें यावयाची, त्याच्या सनदा व महालचा पट नबाबाकडून तुह्मीं आणिला, त्याची चौकशी करितां प।। हरदापूर व रेणापूर हे दोन्ही घ्यावयाचे नाहींत, व कोठें कोठें तनखा जास्त व बेरजेंत चूक मिळोन एक लक्ष तीस हजार येकूणतीस रुपये पांच आणे बाकी निघाली, पट अलाहिदा पाठविला आहे, नबाबाशीं बोलून परवाणी महलया बेरजेचा लाऊन घेऊन सनद हुजूर पाठवणें, ह्मणून आज्ञा. त्यास सदरहू बेरजेचा तालुका परबाणी हा महाल सरकारांत द्यावा हें याशीं बोलण्यांत आलें. सरकारचा पट आल्यानंतर मवाज्या करून तालुका लाऊन घ्यावयाचा येविशीं त।। गोविंदराव भगवंत यास लिहिलें आहे. विनंति करतील. परवाणी रोषनखान याजकडे आहे. दुसरा मुबादला घ्यावा ऐसें नबाबाचें ह्मणणें. मागाहून तपशील लिहितों. कलम.

१. अलीज्याह बहादूर निघून गेले, सदाशिव रड्डी वगैरेनीं फिसाद केला, याची तजवीज आपले सलाहास काय आली? दोन्ही दौलतीचे स्नेहभाव कैलासवासी नाना साहेबापासोन पुरंदरपावतों विस्तारें तुह्मासीं नबाब बोलले तो त।। लिहिला. त्यास दोन्ही दौलती एक; ऐक्यतेचा उपयोग समजोन वडिलापासोन पूर्व चालीवर नजर देऊन स्नेहांत दुसरा प्रकार न घडला व घडावयाचा नाहीं, तिकडील मात्र कायम असावी, खर्ड्यांवर करार ठरल्याप्रमाणें पैक्याचा मार्ग राहिलीं कलमें अमलांत येत नाहींत, दोस्ती व स्नेहांत अंतर नाहीं, असें नबाब लिहितात, त।। राजश्री बाळाजी जनार्दन यास आज्ञा केली ते लिहितील. याप्रमाणें तुह्मीं नबाबाशीं बोलून कराराप्रमाणें फडचे लौकर होत तें करावें. अलीजाह प्रकरणीं समेट व्हावा, नबाबाचे पत्राचे जाब पाठविले ते पावते करून उत्तर घेऊन पाठवणें, ह्मणून आज्ञा. त्यास जाब पावते केले. करारांत अंतर यावयाचें नाहीं, मगर निभावून घेतल्या फडचा होत जाईल, असें नबाब बोलिले. पेशजी सरकारचें पत्र नबाबांस आलें त्यासुद्धां जाब नबाबांनीं दिल्हा ते। छ १७ र।।वलीं खरीता सेवेशीं रवाना केला आहे. त्याजवरून ध्यानांत आलेंच असेल. हल्लीं राजश्री गोविंदराव भगवंत यांस लिहिलें आहे. विनंति करतील. कलम

चार कलमें. सेवेशीं श्रुत होय. हे विज्ञापना.