Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१९५]                                                                               श्री.                                                                  १ अक्टोबर १७९५.                           
विज्ञापना ऐसीजे. मीरअलम व रघोत्तमराव आले. प्रथम मी त्याजवर फार गिल्ला केला. नंतर त्यांनीं कांहीं परिहार व कांहीं गिल्ला मजवर केला. आजपर्यंत माझी खबर मदारुलमहाम यांनीं कधीं निरोप पाठवूनही घेतली नाहीं हें आश्चर्य! तेव्हां त्यास ह्मटलें जे, अव्वल आपला आमचा परिचय, बादतज मदारुलमहाम यांचा, हैदराबादेस तुह्मी आलेत, आह्मी आलों, आजपर्यंत एके ठिकाणींच असतां मीरसाहेब नवेच दिसावयाशीं लागले, नबाबापाशीं गिल्ला आमचा केलात ही गोष्ट अपूर्व वाटली. तेव्हां बोलिलें कीं, मी तुमचा गिल्ला असा केला नाहीं कीं, पुन्हा तुमचें आमचें बोलणें न व्हावें, इतकाच गिल्ला जे हजरतीची रावपंतप्रधान याशीं मुलाकात करविली असती तर बरें होतें. याचें उत्तर, त्यांस दिलें कीं, मुलाकातीचा निश्चय करून आलों, हजरतीस खर्ड्यावर सांगितलें, नवाबच बोलले जे, बादज दसरा ह्मणोन राहिले, याचें आह्मांकडे काय ? तेव्हां बोलिले, हें मला ठाऊक नाहीं. तेव्हां यास ह्मटलें, जें जें तुह्मी बोलाल त्यांत असेंच निघत जाईल, वास्तव काय कसें हें तर तुह्मांस तर ठाऊक नाहीं, आणि संशय उत्पन्न झाला, तुह्मांस संशय झाला तेव्हां आह्मासही झालाच, सरकार कामाचे दुरुस्तीची षकल तुह्मीं नवाबापाशीं असतां कांहींच दृष्टीस पडेना, तेव्हां मदारुल्महाम यांचें मनांतही संशय, कांहींच. समजेनासें झालें, हवाच फिरली, तेव्हां आंदेषेही प्राप्त, मदारुलमहाम यांजवर हर्फ ठेवावा असें नाहीं, तुमचे मनांतील प्रकार आह्मास समजावा, आह्मी मदारुलमहाम यांस लिहावें, तेव्हां निःसंशय आह्मांस कांहींच समजेना, तेव्हां कसें करावें, असो, जे झालें तें गुजष्त, पुढें काय तजवीज सफाई करावी असें मनांत खचित जेथें असतें तेथेंच गिल्लाही करावा लागतो, कारण मनांत उगीच संशयाची गर्द आली असते. ती काढून टाकली ह्मणजे साफ, कांहींच खतरा रहात नाहीं, इतका बयान करून सांगण्याचें कारण जर याजउपर उपेक्षा करून काळहरण केलियास नवाबाचे दौलतीस बेत-हा धक्का बसेल, रावपंतप्रधान याशीं नबाबानीं करार केला त्याप्रमाणें कांहींच अमलांत येत नाहीं, नबाब आह्माशीं काय बोलले हें तुह्मासच ठाऊक आहे, तितका बयान श्रीमंतांस लिहिला असता तर सर्व बाजी आफ्तर होती, यास्तव आजपर्यंत संभाळून राखलें. नवाबाचे मनांत कांहीं फिकीरीच नाहीं, तुह्मांस कांहीं विचार सुचत नाहीं असें नाहीं, परंतु संशयांतच गिरिफ्तार, तुमची अवस्था अशी, कोठेंच ठिकाण लागत नाहीं, तुह्मीं आपले कार्यावर चाललां तेव्हां दौलतीचा आंजाम समजला, याजउपरी जसा जो प्रकार आहे त्याप्रमाणें आह्मांस खाविंदाकडे लिहून पाठविणें प्राप्त दूरंदेशीं कोणांत नाहीं, तेव्हां आह्मीं काय करावें, खावंदाचा शब्द आह्मांकडे. आलियावर मग काय राहिलें, तुमचेच बोलण्यांत आहे कीं लटकेंलांडें बोलून आह्मीं खावंदाची मिजास खुष करून घेतली, त्यास आमचें खावंदाजवळ लटलें बोलण्याचें कारणच पडत नाहीं, जें वास्तविक खरें आहे तें बोलावें ह्मणजे आमचे खाविंद खुष होतात, असें आह्मीं कां न करावें. याजवर फार हांसले. खरें बोलावयासी जावें तर कबाहत उठेल. ती आटोपणें मुषकील. लटकें बोलावें तर संप्रदाय नाहीं. तेव्हां उगेंच रहाणें प्राप्त. असे दिवसही आजपरियंत गुजरले. आतां उगेच राहण्यात नबाबाची दौलत बुडते. हें तरी कोणापाशीं बोलावें. कितेक बारीक याची समजही कोणास येथें नाहीं. यास्तव तुह्मापाशीं इतकें बोलावयाचें कारणः–मुषीरुल्मुलुक यासारखे मनुष्यास काढून टाकावें, हा मनसुबा तुह्मीं आह्मीं मिळोन केला. याचें हेंच फळ कीं, दोही दौलतीचा खलष निघून उभयतांनीं सफाई आणि एकदिलीनें असावें.ह्मणजे दोहीं दौलतीचा बंदोबस्त.