[४७]                                                                               श्री.                                                                           ८ जुलै १७९५.

विज्ञापना ऐसीजे. नवाबांनीं अलीज्याहा गेले या प्रकरणीं व पलटणें दोन बोलाविलीं ह्मणून दोन खलिते स्वामीचे नांवाचे दिले ते पेशजीं पाठविले आहेत. पूर्वीं मला बोलावून ह्मणूं लागले कीं, तुह्मांकडेही अलीज्याहा याचा चोपदार आला होता कीं काय ? मीं ह्मटलें, आला होता, बोलिला जे हजरतीचे हवेलीवर बलवा झाला, सर्व लोक येऊन हजर झाले, तुह्मांसही बोलाविलें आहे, तेव्हां त्यास सांगितलें कीं, हुजूर येण्याचा संप्रदाय यावेळेस कधीं नाहीं, जाणें झालें तर अवल वक्तीं जातों, आतां रात्र पहांटेची आहे, यावेळेस आह्मी येत नाहीं, दिवस उगवल्यावर येऊं, इतक्यांत पंचवीस तीस हजार स्वार दरवाजाजवळ येऊन उभे राहिले. चोपदार मागती येऊन ह्मणूं लागला जे, भले लोक हजुराहून आले त्यास दरवाजा आंत बोलावून घ्या, अथवा तुह्मी दरवाजापर्यंत येऊन त्याशीं दोन गोष्टी बोला, याजवरून आह्मास यांत कांहीं कृत्रिम आहे असें वाटून त्यास सांगितलें कीं, तुझें बोलणें ठीक दिसत नाहीं, भले लोक कोण काय? आह्मास त्याशीं बोलावयास गरज काय? नजर ठीक दिसत नाहीं, जर अधिक उणी वाल दिसल्यास तुझी तुंबी करूं, असें दाबून सांगितल्यावर चोबदार आणि स्वार गेले, पुन्हा कोणी आलें नाहीं. जर भ्रम पडून त्याशीं बोलावयाशीं गेलों असतों तर मला धरून घेऊन जाते, याप्रमाणें वर्तमान झालें. प्रातःकाळ झालियावर शहरांत षोहरत झाली कीं, गोविंदराव कृष्णही गेलें, बहुत लोकांकडील जासूद माझे येथें आले, मी स्नान करून बसलों होतों, हें वर्तमान ऐकून बाहेर दिवाणखान्यांत येऊन बसलों! असें सांगितलें. नंतर नवाब ह्मणाले कीं, सर्वांचे घरीं चोबदार याप्रमाणेंच आले होते, तुह्मी बाहेर निघाला नाहीं, बरें केलें, सर्वांस बदनाम करून आपले सोबती करावे ऐसा त्याचा मनसुबा होता, परंतु घडलें नाहीं. मीं उत्तर दिलें कीं, आपले जिवावर उदार जो होतो त्यास दुस-याचे जिवाची काय काळजी ? जितके बदनाम होतील तितके त्यास बरेंच, परंतु श्रीमंतांचे आणि हजरतीचे कृपेमुळें अरिष्ट टळलें. नंतर अलीज्यांहा निघून गेले. त्याची कथा सांगत होते. राजेरेणूराव जवळ बसले होते, त्यास ह्मणाले कीं, तुह्मीं सदाशिवरड्डीचे. जाबसालांत आहां, फौजेची निगादास्त ऐशी बातनी वरचेवर येत होती, शहराजवळ हा फौज येऊन राहिला असतां तुह्मीं त्याचे तरफेची खातरजमा करीत होता, ह्मणून आह्मीं दगा खाल्ला, नाहीं तर त्याची तंबी करणें किती होतें? तेव्हां राजाजी ह्मणूं लागले जे, तकशीर मजकडून झाली, लायक सजा करण्याचें आहे, मर्जीस येईल ती मला सजा करावी. हें ऐकून उगेंच राहिले. मला ह्मणूं लागले कीं, जमीदार आणि सुभेदार यांनीं अलीज्यास बहकाविल्यावरून तो गेला, याची तजवीज कशी? तेव्हां त्यास ह्मटलें कीं, मला सुचतें त्याची पर्याप्ति करून मर्जीस येईल तसें करावें, हजरत त्यांस बुजुर्ग, हजरतीनीं ममतायुक्त त्याजकडे सांगून पाठवावें जें, तुझी निष्ठा आजपर्यंत कशी आणि आमची कृपा तुजवर कोणेप्रकारें हें मनोमन साक्ष आणि जे वाकफकार घरांतील बायका यांस माहीत त्या चालीस अशी गोष्ट तुजकडून होणें मुनासब नसतां? हें कसें घडलें ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries