Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सुलतान माजूम पातशहा इ. स. १७१२त मयत झाला. त्याचे पुत्र तक्ताविषयी भांडू लागले. त्या समयीं पातशाही दरबारांत शेख अबदुलखान व हुसेनखान हे दोघे सय्यद प्रमुख होते. त्यांनी सुलतान माजुमाचे पुत्राचा पुत्र फरोजसर यास पातशाही तक्तावर इ. स. १७१३त कायम केले. दक्षणचा अधिकारी दाऊदखान पन्नी याचे जागेवर चिनकुलिचखान यास नेमिले. चिनकुलिचखानाचें पूर्वीचें नांव कमरुद्दीन असे होतें. त्यास निजामुन्मुलुख असा किताब देऊन १७१३त दक्षिणेत पाठविलें. रामचंद्रपंत अमात्य याचे पदरचा दमाजी थोरात हिंगणगावचे गढीत राहून आसपास वीस कोस मुलूख लुटीत असे. त्याचे पारपत्यास बाळाजी विश्वनाथ यास महाराजांनी नेमिले. त्यावरून फौज बरोबर घेऊन अंबाजी त्रिंबक व स्त्री राधाबाई व उभयता पुत्र बाजीराव व चिमाजी अप्पा असे बरोबर घेऊन हिंगणगावास आले. ती फौज पाहून दमाजी थोरात यानें बाह्यात्कारी गरीबी दाखवून, तहाचे बोलणें लावून भेटीकरिता बाळाजी विश्वनाथ वगैरे मंडळीस बेलभंडाराचे इमानशफत देऊन विश्वासानें बोलावून गढीत येण्याबरोबर त्यांस कैद केले. तेव्हा त्यास बेलभंडार इमान दिल्याची ओळख देतां, त्यानें उत्तर दिलें की, बेल ह्मणजे झाडपाला व भंडार आह्मी नित्य पदार्थांत खातच असतो. असे सांगून त्यांजपुढें ऊनऊन राखेचे तोबरे ठेवून मनस्वी खंडणी मागू लागला. खंडणी आल्याशिवाय सोडणार नाहीं असा त्याचा निग्रह पाहून, त्याजपाशी ओलीकरितां राधाबाई स्त्री व बाजीराव व चिमाजी आप्पा पुत्र असे ठेवून पुरंदरे व आपण परत येऊन महाराजास झालेला मजकूर कळविला. त्यानंतर महाराजांनी त्याचे कराराप्रमाणें भुर्दंड भरून बाळाजी विश्वनाथ यांची मुलेमाणसें सोडवून आणिली. नंतर आणखी थोरातावर पंतसचिव यास जावयाविषयी आज्ञा झाली. त्याप्रमाणें ते गेले असता त्यासहि कैद केलें. कान्होजी आंग्रे बिन तुकाजी आंग्रे यांनी संभाजीचा पक्ष धरून महाराजाकडील सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग वगैरे कोंकणप्रांतीचे किल्ले घेऊन पेशवे पिंगळे यांचा कल्याण प्रांतहि घेतला, त्याचे पारपत्यास प्रथम बहिरोपंत पिंगळे पेशवे गेले असतां त्यास आंग्रे यांनी कैद केल्याचें वर्तमान समजताच बाळाजी विश्वनाथ यांस आंग्र्यावर स्वारीस पाठविले. त्यांनी आंग्रे यांचा पराक्रम जाणून युध्दापेक्षां तह करावा, असे मनांत आणून महाराजांकडील अवघड किल्ले १ खांदेरी, २ कुलाबा, ३ सुवर्णदुर्ग, ४ विजयदुर्ग, ५ जयगड, ६ देवदुर्ग, ७ कनकदुर्ग, ८ फत्तेगड, ९ उचितगड, १० यशवंतगड असे दहा किल्ले व सागरगड व त्या खालील मुलुख सरंजामी गांव वगैरे होते, त्यासुध्दा आंग्रे याजकडे ठेविले.

४+

४+१

४+२

४+३

४+४