मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

घोंटाळा मोडून व्यवस्था कशी केली ?
प्रकरण १० वें.

मागील भागांत सांगितल्याप्रमाणें, राष्ट्रीय स्वातंत्र्यार्थ वीस वर्षे चाललेल्या या युद्धाच्या शेवटीं, शाहू राजाची मोंगलांच्या छावणींतून सुटका झाली, व तो दक्षिणेंत आला. सर्व मराठे लोकांनीं त्यास आपला राजा असें कबूल केलें. ‘ महाराष्ट्रांतील सर्व लोकांची एकी करावयाची ' याबद्दल शिवाजीनें सुरू केलेला प्रयत्न सिद्धीस नेण्याचा शाहूनेंही बेत केला. मोंगल बादशहाच्या त्या प्रचंड सैन्याबरोबर लढाई जुंपण्यांत जे मुख्य हेतू होते, ते आतां सिद्धीस गेले असें जरी म्हणतां येईल, तरी या लढाईपासून मराठ्यांच्या प्रमुख सरदारांच्या डोक्यांत मयंकर वेडगळ कल्पना शिरल्या. प्रत्येकास असें वाटे कीं, आपण लढलों तें फक्त सापल्या हिताकरितांच. आपण मिळविलेलें स्वातंत्र्य घालवून आपण --णाचेंही चाकर होणार नाहीं. यायोगानें लढाई संपली, तरी मागें ---ळा व बेबंदशाई चालू राहून पुढें कांहीं वर्षेपर्यंत देशांत व्यवस्था ताब्य--- शांतता होणें अगदींच अशक्य असें दिसून आलें. एकाचें कार्य --- सर्व लोकांचें कार्य, अशा बुद्धीनें सर्व प्रमुख सरदारांनीं एक जुटीनें लढाई चालविली; परंतु बादशहाच्या सैन्याचा पराभव होऊन शेवटीं औरंगजेबही मरण पावला. तेव्हां आधींच एकमेकांशी तुटकपणानें वागंणारे हे स्वदेशभक्त पुढारी यांच्या मनावरचा दाब नाहींसा होऊन एकजुटीनें काम करण्याची त्यांची इच्छाही नाहीशी झाली. शाहूस कैदेंतून सोडून दिलें तें सर्व मराठे लोकांना बरें वाटावें म्हणून, असें वाह्यात्कारी दर्शवून, आंतून तर शाहू महाराष्ट्रांत आला ह्मणने लोकांत विरोध व कलह आपोआपच उत्पन्न होतील, असा हेतू मनांत धरूनच औरंगजेबाच्या सल्लामसलत गारांनीं शाहूची सुटका करण्याविषयीं बादशहास कानमंत्र दिला असावा असें दिसतें. शाहू परत आला तेव्हां राजारामाच्या हाताखाली नोकरी केलेल्या व नंतर ताराबाई व तिचा मुलगा यांचा पक्ष उचललेल्या पुष्कळ लोकांनीं शाहूचें नुसतें स्वागतही केलें नाही. पंत सचिव व पंत अमात्य शाहूपासून अगदीं अलग राहिले. जुन्या पुढारी मंडळापैकीं ताराबाईचा पक्ष सोडून देणारे प्रसिद्ध सरदार म्हटले म्हणजे धनाजी जाधव हे होत. धनाजी जाधवाला शाहूच्या आगमनास प्रतिबंध करण्याकरितां पाठविलें होतें; परंतु शाहूराजाचा गादीवर हक्क जात अशी खात्री झाल्यावरून त्यानें शाहूबरोबर समेट केला. धनाजी जाधवाचा कट्टा प्रतिस्पर्धी संताजी घोरपडे याच्यावर म्हसवडचे माने देशमुख यांनी क्रूरपणानें हल्ला करून त्याचा खून केला होता. त्याचे तीन मुलगे कर्नाटकांत मोंगलांशी आपल्याच हिताकरितां लढाई सुरू ठेवण्याच्या खटपटींत होते. शाहू सत्ताधीश झाल्यावर धनाजी जाधव फार दिवम वाचला नाही. त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव हा फार स्वच्छंदी असल्यामुळें या स्वातंत्र्ययुद्धांत त्याच्या बापास ज्या उदात्त विचारांमुळें सर्व राष्ट्रीय सैन्याचा पुढारीपणा प्राप्त झाला होता त्या उदात्त विचारांचा ह्या त्याच्या मुलावर कांहींच अंमल झाला----पुढें प्रसिद्धीस आलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याबरोबर ----- शिकार करीत असतां कांहीं क्षुल्लक कारणांवरून दोघांचा तंटा---तेव्हां चंद्रसेन जाधव, आपल्या धन्याची नोकरी सोडून को----गेला, व नंतर तेथून हैदराबादेच्या निजामाच्या पदरी राहिला. तर---- अर्थात् च त्याच्या कर्तबगारीचा महाराष्ट्रास कांहींच फायदा मिळाला नाहीं. इतर पुढारी मंडळीपैकी खंडेराव दाभाडे गुजराथेवर स्वारी करण्याच्या हेतूनें खानदेशांत सैन्याची जमवाजमव करीत होते. राजारामाचा एक प्रमुख प्रतिनिधि नेमाजी शिंदे हा सुद्धां पुढें मोंगलास जाऊन मिळाला. दाभाड्याप्रमाणेंच परसोजी भोंसले हाही व-हाड व गोंडवण या प्रांतांत आपलें नशीब काढावें म्हणुन झटत होता. खंडेराव दाभाडे व परसोजी भोंसले या दोघांनींहीं आपलें स्वातंत्र्य संभाळून ताराबाईविरुद्ध शाहूराजाचा पक्ष उचलला. यामुळें शाहूच्या मणगटांत वराच जोर आला. गंगथडींत ठाणें देऊन राहिलेले हैबतराव निंबाळकर हे कोणाचा पक्ष स्वीकारावा या विचारांत होते. पुढें लवकरच त्यांचा अधिकार काढून घेतल्यामुळें हैबतरावानीं शाहूची चाकरी सोडली व ते निजामास मिळाले. याप्रमाणें पहिल्या प्रतीच्या सरदारांची फाटाफूट होऊन कांहीं शाहूच्या बाजूस, कांहीं ताराबाईकडे व कांहीं निजामाच्या पदरीं, अशीं त्यांची बरोबर वांटणी झालीं. दुस-या प्रतीच्या सरदारापैकीं कान्होजी आंग्रे यांनीं ताराबाईचा पक्ष स्वीकारिला व सर्व कोंकणप्रदेश त्यांनीं आपल्या ताब्यात घेतला. थोरात, चव्हाण व आठवले हे तर स्वतंत्र होऊं पहात होतेच. साता-यास शाहू राजा सिंहासनावर बसला, त्यावेळेस पहिल्या दोन घराण्यांतील सरदारांनी मोठा धुमाकूळ मांडिला होता.आसमंतात् त्यांनीं लुटालूट सुरू केली, व प्राचीन वहिवाटीस एका बाजूस सारून, मुख्य राजे ज्याप्रमाणें चौथाई व घासदाणा वसूल करीत, त्याप्रमाणें या सरदारांनींही आपल्या स्वतःकरितां वरील हक्क मिळविण्याची अस्सल वरहुकूम नक्कल वठविण्याची सुरवात केली. एका ब्राह्मण लुटारूस मोंगलाचा सुभेदार महाराज म्हणत असे. त्या लुटारूनें ---- -यापासून वीस मैलांच्या आंतच खटाव येथें स्वतंत्रपणें आपलें ठाणें ---विलें, तेव्हां आतां सातारा शहर व त्याच्या स्वतःच्या सरदारांनी--- केलेलें थोडेसें डोंगरी किल्ले, एवढाच मुलूख काय तो शाहूच्या----त राहिला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries