मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

रसीद वीस हजाराची बाजीराव                                                     लेखांक १३१.                                                      १७१४ फाल्गुन शुद्ध ६.
शेषाद्रि व तिमाराव देशपांडे यांचे
नावें राजाराम गुमास्ता भुकणदासाकडील
याचे पत्रांत रवाना केली.

राजश्रीयाविराजित राजमान्य राजश्री बाजीराव अमील व तिमाराव देशपांडे पा वसमत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि पा उमरखेड या माहालापासोन शाहा मिर्जा याणी ऐवज घेतला तो ऐवज श्रीमंताचे सरकारांत नवाब बंदगानअली यांजकडून येणे त्याऐवजी बंदगानअली यांचे सरकारातून पा वसमत एथील ऐवजावर चाळीसहजार रुपयांच्या तनखा दोन जाल्या त्याचे वायदे दोन पैकी दुसरे वायद्याबाबत रुो २०००० वीस हजार तुह्मी दिल्हे ते मा सैदमुजवरखान अमील पा मजकूर वीस हजार रुो पावले असेत रा छ सुा सलास तिसईन मयां व अलफ सन फसली १२०२ बहुत काय लिहिणे लोभ कीजे है विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries