मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पैमाजी निशा भावसिंग चौधरी                                                    लेखांक १२७.                                                      १७१४ फाल्गुन शुद्ध ४.
निा तोफखाना सरकार बंदगानअली
याचे मागीतल्यावरून आपाजी
भीमराव अमील पा शाहगड यांचे नावें पत्र दिल्हें
छ २ रजब सन १२०२ फसली.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामी गोसावि यांसी-
सेवक गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष राजश्री शंकरलाल यांचा व हरबाजी नाईक वानवले यांचा देण्याघेण्याचा प्रसंग आहे सबब शंकरदास यांचा गुमास्ता मनुलाल यास नाईकमजकुर याणी तुह्माकडून मनुलाल औरंगाबादेहून हैदराबादेस जात असतां अटकाव करविला आहे त्यास पत्र द्यावें कीं मनुलाल यास हैदराबादेस पाठवून द्यावे उभयतांचा जाबसाल आहे तो एथे मनास आणावयास येईल तुह्मी तेथें कोणे गोष्टीचा गुंता न करितां मनुलाल यांस पाठऊन द्यावें दोन मनुष्ये त्याचे समागमी तुह्मी आपली देऊन एथे आह्मापासीं पोंहचतें करावें रा छ २ रजब बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries