मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २५१

श्री (नकल)
१७०१ पौष शुद्ध १३

यादी कराराची येणेंप्रमाणे ठरली. सुा समानीन मया व अलफ, मो जाहला. बि:-
७१००० तूर्त नक्त द्यावे.
५०००० मुख्यास.
२१००० दरबारचा खर्च,
५००० रावजी
५००० भाई.
४००० आबा चिटणीस.
२००० रामाजी पाटील.
२००० आपाजी साबाजी.
२००० निळे शामजी.
१००० जिऊबादादा.
-------------
२१०००
---------------
७१०००
१५०००० राजश्री अंताजी नागेश याजकडून हिशेब घ्यावा ह्या ऐवजीं.
१००००० दरबारचा खर्च.
५०००० मुख्यास.
------------------
१५०००० सदरहू याद तुमचे हातीं असावी.
३२००० सरंजाम किल्ले पायागड यांसीं लाऊन द्यावा ह्मणोन पहिला करार तलबाचा.
------
२५००० मुख्यास.
४००० रावजीस गांव एक चांगला.
३००० भाइस गांव एक चांगला.
------
३२०००
याच्या सनदा द्याव्या अथवा सनदा जवळ नसल्यास कराराची याद लिहून देऊन यांचे कारकुनाजवळ सनदा यजमानाजवळ गेलियावर द्याव्या.
सदरहु तीनही कलमें याजप्रमाणें ठरलीं. याची तरतूद लिाप्रमाणें करून पाठवावी. आपण म्हणतील कीं, तूर्त देणें. याचा ठराव सांगितल्याशीं अधिक जाला तर येथून गृहस्थ गेले याजमुळें आह्मांकडून बोलण्यास कमी जाहालें. तेव्हां प्रदिप्ता फार जाहली. दोघे मुद्दई सबल, येथें त्यांचीं सूत्रें नाना प्रकारचीं लागलीं. मग कोणेप्रकारें बंदोबस्त खचित व्हावा. यामुळें ठराव याजप्रों जाहला. हिशेबाचे वक्तीं ठराव जाहला. तो आपले सरकारचे बिफायतीचा आहे. सरंजाम ठरला तो पहिले बोलण्यांत आहे. त्यास शक, विशमता जाहाली. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञप्ति. मिति पौष शुा १३

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries