Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५८ ]
श्री. शके १६६४ पौष शुद्ध २.
राजश्री पिलाजी जादोराऊ सुभदार.
कबज बइसम रामचंद वादे बिलोई दिमत बेणीराम प्रोहत गढ मुक्तेश्वर. अगों हमोनें कावेड गंगाजल बाबत रुपये १६ अंके सोळेवा, प्रोहत्तेक रुप १६, जुमले रुपये ३२ बत्तीस सरकारसे पाये. संमत १७९९ पुस सुदी २ वार शुक्र.
बिकलम रामचंद्र वादे बिलोई.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५७ ]
श्री. शके १६६४ मार्गशीर्ष वद्य १४.
पै॥ छ ११ जिल्हेज.
श्रियासह चिरंजीव दामोधरजीस. प्रति बापूजी महादेव हिंगणे मु॥ प्रांत अहिरवाडा आशिर्वाद उपरि. येथे गां। भा। भीऊबाई चिंचोलीकर नाशकीपुर्यामध्यें राहतात. यांहीं येथें आह्मांपासीं दिल्हे नगद रुपये १७५ अंके पाउणे दोनशें, याचे निमे ८७॥ साडे सत्यांसी याचे दुणे करून लिहिलेप्रों। पावणेंदोनसें देणें. पावलियाचें कबज घेणें. हा कागद घेऊन उत्तम रुपये देणें. अनमान न करणें. हा आशीर्वाद. मिति मार्गेश्वर वद्य १४ सके १६६४ दुंदुभीनाम संवत्सरे. वळी अकरा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५६ ]
श्री. शके १६६४ कार्तिक शुद्ध ३.
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री बापूजी महादेव गोसांवी यांसिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ सलास अर्बैन मया अलफ. संवस्थान बुंदी येथील मख्ता साल गु॥प्रमाणें सालमजकुरीं रुपये ५०,००० पन्नासहजार करार केले आहेत. त्यास, या ऐवजावरी तुह्मांपासून घेतली रसद रुपये ३८,००० अडतीस हजार घेतले. यास व्याज दरमाहे दर सदे रुपये १॥ दीढप्रमाणें. सदरहू रसदेचे रुपये सरकारांत जे मितीस पावतील ते मितीची कबजें घेऊन सवस्थान मजकूरचे ऐवजी मुद्दल रुपये व व्याज उगवून घेणें. जाणिजे. छ. २ रमजान.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२८
श्री १६७५ आश्विन शुध्द ३
अज दिवाण किले वंदनगड ता। मोकदमानी मौजे गोवे सा। निंब प्रात वाई सु॥ अर्बा खमसैन मया अलफ मौजे मजकुरी किला नि॥ जमीनपैकी तपोनिधी राजश्री भवानगिरी बावा महत वास्तव्य का। निंब याकडे जमीन 6 ५ पाच बिघे ठेविले आहेत यास गड नि॥ जमिनीची पाहणी जाहली ते समई याकडे पाच बिघे ५ चालिले अस्ता गोसावी यास ऐवज पावत नाही ह्मणून कळो आले तरी सदरहू पाचा बिघ्याचा दळा दुमाला करणे तेथील जो ऐवज येईल तो घेतील याउपरी फिरोन बोभाट येऊ न देणे जाणिजे रा। छ १ जिल्हेज मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२७
श्री १६७४ वैशाख शुध्द ९
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब याणी ता। मोकदमानी मोजे इरमाडे प्रा। कराड यासि आज्ञा केली ऐसी जे सु॥ इसने खमसैन मया व अलफ मौजे मजकुरी कृष्णगिरी महत याची जमीन । तीस बिघे इनाम सदानद गोसावी याचा आहे त्यास मौजे मा।री इनामघरवटा करितील अगर वाटेकरी यास कळेल तैसा लावितील तुह्मी गावकरी इनामासी हिक हरकत न करणे फिरोन बोभाट हुजूर आलीया कार्यास येणार नाही ऐसे पष्ट समजणे जाणिजे छ ७ माहे जमादिलाखर सु॥ इसने खमसैन मया व अलफ
मोर्तब
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५५ ]
श्री. शके १६६४ आषाढ शुद्ध १२.
हिसेब दाखला मखलासी प्रा। पेटलाद नि॥ राजश्री बापूजी माहादेव हिंगणे. सन सलास अर्बा. छ. ११ जमादिलावल. पौष मास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५४ ]
पौ छ. १६ सफर. श्री. शके १६६४ वैशाख शुद्ध ११.
तीर्थरूप राजश्री नाना स्वामीचे सेवेशीः--
अपत्ये सदोबानें साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ. १० सफर मुकाम ठाणें, सुपें, प्रांत सोंधे, पर्यंत वडिलांचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं च्यार प्रतीनें पत्रें पाठविलीं तीं एका मागें एक पावलीं. लिहिला मजकुर कळला. त्यांची उत्तरें अलाहिदा पुरवण्यांत लिहिलीं असेत. त्याजवरून कळेल. चिरंजीव राजश्री रघुनाथ यांस * लग्नास पाठविलें. श्रीकृपें लग्नसिद्धी करून आलेच असतील. वर्तमान लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२६
श्री १६७३ आश्विन वद्य ११
सदानंद
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणी मोकदमानी मौजे गोवे प्रा। वाई सुहूरसन इसन्ने खमसैन मया व अलफ कृष्णगीर गोसावी मठ मौजे निंब याचे इनाम मौजे मजकुरी आहे त्यात बोरी व बाभळ वगैरे झाडे आहेत त्यापैकी झाडे वठली आहेत तो विकत आहे त्यास तुह्मी अडथळा न करणे वगैरे झाडास काडीमात्र अडथळा न करणे जाणिजे छ २४ जिलकाद लेखनावधी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५४ ]
पौ छ. १६ सफर. श्री. शके १६६४ वैशाख शुद्ध ११.
तीर्थरूप राजश्री नाना स्वामीचे सेवेशीः--
अपत्ये सदोबानें साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ. १० सफर मुकाम ठाणें, सुपें, प्रांत सोंधे, पर्यंत वडिलांचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं च्यार प्रतीनें पत्रें पाठविलीं तीं एका मागें एक पावलीं. लिहिला मजकुर कळला. त्यांची उत्तरें अलाहिदा पुरवण्यांत लिहिलीं असेत. त्याजवरून कळेल. चिरंजीव राजश्री रघुनाथ यांस * लग्नास पाठविलें. श्रीकृपें लग्नसिद्धी करून आलेच असतील. वर्तमान लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५३ ]
श्री. बापाजी. शके १६६४ चैत्र शुद्ध ७.
पुरवणी राजश्री मानाजी आंगरे वजारत माब गोसावी यांसीः-
विनंति उपरि. राजश्री तुळाजी आंगरे यांजकडील कारभारी तेथें येऊन, धातुपोषण बोलोन मनसुभा उपस्थित केला आहे. राजश्री यमाजीपंत यांणी मनावर घेतलें आहे. पद त्यास देणार. तरी हे गोष्ट होऊं दिल्यानें आपणांस आमचा शब्द लागतो. राजश्री स्वामी अंजनवेलीचे मसलती जो करील त्यांस देणार. तरी आधीं धणी यांचे कार्य करावे. व त्यांचे वस्तु झालेसें झालें तरी मग त्याकडे दिल्यानें आह्मांस असंतोष नाहीं. ह्मणोन कितेक बिशदे दोनचार वेळा लिहिलें. व राजश्री शिवरामजी यांस लिहून पाठविलें. त्यांणीही आपली पत्रें दाखविलीं, त्यांजवरून कळों आलें. ऐसियास, तुह्मी त्यांस वडील परंपरा पाहतां, वडिलांकडे पद असावें. हे गोष्ट यथार्थच, परंतु मनसुब्यामुळें तिकडील संदर्भ झाला होता. त्यांस राजश्री स्वामीसंन्निध कितीएक रीतीनें समजावयाचें तें समजाविलें, व शिवरामजी यांजपासूनही अर्ज करविला. तुळाजी आंगरें याचाही मनसुबा धातुपोषणसा दिसोन आला. ऐशा तिन्ही गोष्टींचे साहित्य पडोन तिकडील विचार राहिला. त्यांस, राजश्री स्वामीचें चित्तीं अंजनवेलीचा मनसुबा करणें अगत्य. तुह्मांकडील साहित्य सांप्रतच येईल, किंवा कसे काय ? हेंही पुसत होतें. त्यास, दूरप्रांत, दिवस अखेरीचे, यासमयीं कैसे होईल, हें जाणोन पर्जन्य झाल्या उपरी भाद्रपदमासीं करावें ऐसा सिध्दांत झाला आहे. त्यास, आपणांस येऊन कार्यभाग सिद्धीस पावावयाचा विचार होत असेल, तरी तैसेंच विचार करोन लिहोन पाठवावे. त्यासारिखी अगोदर पैरवी करावी लागेल. जो हें कार्य करील त्यास पद देणार. श्रावण मासानंतर राजश्री यमाजीपंत उतरणार. त्यासमयांत मार्ग काढिला पाहिजे. तुळाजी आंग्रे यांणीं अरगजलें तरी पाहिलें हालीप्रमाणें तिकडेस वतन देतील, तेव्हां, तुह्मी
आह्मांवरि शब्द आणाल, यास्तव लिहिलें आहे. आपला पुरता विचार करून उत्तर पाठविणें. जातसाल खेळवणें. येविसीची आज्ञा राजश्री स्वामींनीं राजश्री शिवरामजी यांजवळही केली आहे. हे सांगतील त्याजवरोन कळों येईल. रा॥ छ. ५ सफर. बहुत काय लिहिणें ! लोभ असो दीजे. हे विनंति.