Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ३२१

श्री. १७४५


यादी महिपतराव कृष्ण साठे व यशवंतराव परशुराम परांजपे सु।। अर्बा अशरीन गया तैन व अलफ. कारणें अर्जी लिहिली ऐसीजे. कैलासवासी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांणीं आमचे आजे पणजे यांस पुण्यास आणून व तैनात सालीना रु० दहा हजार करून मामले वगैरे कामकाज सवाईमाधवराव साहेब यांचे कारकिर्दी पावेतों हरएकाविसी चालवीत गेले. व वडिलांचे कारकिर्दीत राजे रजवाडे व सरंजामी व सरकार पेशवे यांजकडे ऐवज येणें व लोकांची देणीं शके १७१७ पावेतों होत आलीं. नंतर श्रीमंत बाजीराव साहेब पुण्यास येऊन कारभार राज्याचा करूं लागले. त्यांणीं आह्मांसी वांकडें मनांत ठेविलें कीं सवाई माधवराव यांचे आप्त यांचें नीट नसावें. ह्मणोन आमचा सावकारी व्येव्हार दरोबस्त बुडाला व तैनात सुद्धां बंद केली. व कामकाजें काहाढली. यामुळें दरोबस्त आमची खराबी जाहाली. वस्तीस मुखवस्तु राहिलों. त्यांत होळकराने खंड घेतला. ते समई दरोबस्त गेलें. आणि पंचवीस वर्षे बे रोजगार. उभयतां कोण्ही पुस्तपना राखी असा नाहीं. तशांत कुंपनी सरकारांतूनही सर्वास सरंजाम व कोणास पगार व कोण्हास इनाम चालाविलें. आणि आपली अनास्था केली. एक गांव करवीरकरांकडून इनाम तो चालविण्याविशीं पांच वर्षे साहेबांचे कानावर घातलें. चकत्याही हुबळी धारवाडास दिल्ह्या. परंतु अद्यापि गांव पदरीं पडत नाहीं ! आणि हल्ली आह्मांवर सावकार फिर्याद देऊन अर्ज्या देतात. त्यांसीं जाबसल करावयास कोण्ही कारकूनही जवळ राहिला नाहीं व देणें ज्याचें ते आबरु ठेवित नाहींत. या करितां साहेबीं मेहेरबान होऊन आह्मीं निराश्रित, आह्मांस सावकाराचें देणें याविसीं तोशीस न लागे आबरु राहोन साहेबाचे वस्तीस कांहीं दिवस काळ कंठे असें जाले पाहिजे. दुसरे कोठें जावें तरी ठिकणाही नाहीं. व जवळ अर्थ कोण्हे विसींच राहिला नाहीं.

पत्रांक ३२०

श्री. १७४२


हककित जंजीरे मुंबईन्युसपीपर छापून आलें. त्यांतील हासील मजकूर, सन १८२१ इसवी या सालांत दक्षणेंत कोणीही शककर्ता उत्पन्न होईल. तो सन ३० पर्यंत गुत्प राहील. सन १८३१ चे सालापासून किंचित् प्रगट होत जाईल. तो सन १८३३ पासून प्रकट होऊन राज्य करूं लागेल. हिंदुस्तानप्रांतीं चांभार यांचे जातींत एक शककर्ता पैदा होईल. तो हिंदुस्तानचें राज्य सात दिवस करील. त्याचा पराभव सन १८२१ चे सालीं शक करिता दक्षिणेंत जाहला आहे, तो चांभार याचे जातींत जाहला आहे, त्याचें पारिपत्य करून वलयांकित पृथ्वीचें राज्य यथान्यायानें करून करील, त्यास मंत्री तिघे होतील. त्यांची नांवें, दुर्जितसिंग व हिराशेट पारसी व फकीर महंमद ऐसे मिळोन, इंग्रजास कैद करून, राज्यकारभार चालवितील. हिराशेट पारसी शककरिता याजजवळ जाऊन, रदबदली करून, इंग्रजास मुक्त बंदनांतून करील. सन ३३ सांपासून कुंपिणी सरकारचा अंमल चालणार नाहीं. सन ३७ चे सालीं ज्यलमार्गी च्याळीस हजार फौज माहीम जिल्हे मुंबईस येऊन मातबर लढाई करून, मुंबई ठाणें घेऊन, गाढवाचा नांगर फिरवितील ! तेथील अंमल शककरिता याचे स्वाधीन करून मुंबई घेईल. तो चाकर होऊन राहील. पुढें चाळीसांचे सालीं दुष्काल पडेल. हें वर्तमान लिहिलें कशावरून ह्मणाल तर, रूमचे पाछाय यांजवळ कोणी रमलवाला आहे. त्यांणीं भविष्य पूर्वी लिहित गेला तें खरें होत आहे. हालीं त्याणे लिहिल्यावरून छापिलें आहे. श्रीनारायण प्रा।.

पत्रांक ३१९

श्रीलक्ष्मीकांत. ७३८ ज्येष्ठ वद्य ७


राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीं:-


छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें, राजश्री सुभेदार-नाईक-निंबाळकर हे सरकारचे पदरीं आहेत व यांचा अगत्यवाद ज्यापक्षीं येथें आहेत त्यापक्षीं तुम्हांसहि जरूरच आहे. त्यास, यांचे चुलते राजश्री आपाजी नाईक निंबाळकर हे राजश्री पंतसचीव यांचे खटल्यामुळें तेथें अटकेत आहेत. व येविशीं पेशजी तुम्हांस तपसीलवार लिहिण्यांत * आलेच.
पो छ २० रजब जेष्ठमास.

पत्रांक ३१८

श्रीलक्ष्मीकांत. १७३७ आश्विन शुद्ध ६


पो छ ४ जिल्काद, आश्वीन शुद्ध ६ शके १७३७ मु।। पुणें सु।। सीत अशर.


राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविले ते पावलें. लिहिला मजकूर कळला. त्यास, त्याचीं उत्तरेंहि पूर्वी पाठविलींच आहेत. तीं पोहचून मजकूर समजलाच असेल. रांगडा ब्राह्मण याजबराबर तुह्मीं चिरंजीव राजश्री बाबा याजकरितां आंगारा पाठविला तो पोंहोचून, तुमच्या लिहिल्याप्रमाणें चिरंजीवास आंगारा लाऊन त्याचा गुण कसा काये तोहि पाहण्यांत आला. हा सारा तपशील ब्राह्मणाचे समक्षच जाला आहे. व सांप्रत तोच ब्राह्मण माघारें आला आहे. जबानीं तुम्हांस सविस्तर सांगेल, त्याजवरून कळेल. रा। छ ५ माहे शवाल, * बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसूद.

पत्रांक ३१७.

श्री ( नकल.) १७३७-३८.

यापूर्वी तहनामा शराकत व मवाफिकत तरफैनचा मुकरर व्हावा ऐसें जरनेल गोरनर लाटसाहेब बाहादर यांहांचे अंतःकर्णात होतें. परंतु राजेसाहेबांचे खातरेस बिलकुल मंजूर न पडला. याजकरितां बंदोबस्ताची तजवीज दुसरी कीं त्यांत फायदा तहनाम्याचा सरकार इंग्रज बाहादूरांचा मोहेसर होय हें लाजीम जालें. त्यास, नवाबवजीर महमदखान भोपाळवाले यांचे Khvashishi ख्वाहिसी दरखास्तीप्रमाणें लाटसाहेबांचे हुजुरांत या दिवसांत कबूल पडून खानमजकूर सरकार कुंपनीचे बसालती सिलसिल्यांत दाखल जाला आहे. त्यास, राजेसाहेबांनी महाराज दवलतराव शिंदे बाहादूर यांचे शरातीनें आपली फौज तैनात केली आहे कीं, मुलुक भुपाळचा आपले कबज्यांत अणावा. परंतु मुनासिब आहे जे, आपले सरदारांस या इराद्यापासून मना करावें. हा अर्थ लाटसाहेबाचे हुकुमाप्रमाणें श्रीमंत माहाराजांचे खिजमतेंत अर्ज करितों. व मुखलिसानें या दिवसांत लाटसाहेबबाहादुराकडून दोस्तीचे मरातीब दोनतीन वेळां राजेसाहेबांचे सरकारांत जाहीर करण्यांत आणिलें आहे. याजकरितां सांप्रत करणें जरूर न होतें की, नव्या शिरत्यानें पुन्हां बोलणियास मूळ दिसलें, परंतु लाट साहेबास अंदेशाची जागा आहे कीं, शायद गरजगो मनुष्याचे सांगण्यावर शुबाह व वसवास राजे साहेबांचे अंतःकर्णात प्राप्त होईल. या सबब तैशा मणुशाची जुबान बांधली जावी कीं, ते मानसें बिलकुल राजेसाहेबाचे सरकारचे खैरख्वा नाहींत, बलके लटकें बोलून विच्छितात कीं, सरकारचे कामाचे बेहबुदीत खलेल आदां न व्हावे, या सबब लाटसाहेबास मुनासब दिसलें कीं, मुखालिसांचे नांवानें या बेबारतीचा खासदस्तुरानें इनायतनामा लिहिला. त्यास त्या मजमुनाची अक्षरशा अर्ज करितों. लाट साहेब

बाहादुरानें तमाम बजिदगीनें लिहिले आहे कीं, राजेसाहेबांचे खिजमतींत अर्ज करावा तें इकडील चित्तांत. शिवाय दोस्ती राजेसाहेबांचे सरकारांत. दुसरा खियाल नाहीं व न जाला. व राजेसाहेबांचे मुमसानांचे खांदा इच्छित नाहीं. बलके, खातरा चित्तांत हमेशा आमचे ऐसे होते कीं, राजेसाहेबांची रियासत दुसरियाचे रियासतीनें निसबतीपेक्षां वावकर व सरसबाज व मजबूत राहावी. ज्या वेळेपासून राजेसाहेबाचे नारजावंदीचा सबब दर मोकदम करार पावणें सिलसिला शराकत मवाफिकत दोस्ती इंग्रेज बाहादुराचें सरकारासीं, तेव्हां आह्मांस उचित जालें जे नवी मसल्हत धुंडावी. आपसोस केली कीं, शायद या मसल्हतीनें राजेसाहेबांचे मर्जीस गिरानी येईल तर हकीम आहे कीं, निसबत सरकार मवासुफ फायेदा जाहीर होत आहे. याजकरितां यांस खातर राजेसाहेबांची मंजूर येऊन, या मसल्हतीची पैरवीस ढील टाकिली होती. परंतु सबब चंददरचंद मुसकिलीचें जालें आहे. प्रसंगास राजेसाहेबांनी आमचे चित्तांतील मरातीब मंजुर न फर्माविलें. तेव्हां आह्मांसही तैसेंच जालें कीं, बलके दोस्तीचे मुर्बीचे लवाजम्यानीं उचित व वाजवी होतें कीं, मजबुती व बंदोबस्त सरकारकुंपनीइंग्रेजबाहादुरांची आवघ्या गोष्टींवर अधिक जाणून, त्या रस्त्याची कोशीस ठेवावी. अस्तु. जे दोस्ती राजे साहेबांचे सरकारची आमचे सरकारास जैसी आहे तैसीच आहे. यापरता दुसरा खियाल समजूं नये. हरयेक प्रकारें आह्मीं इच्छितों जे, दोस्तीचे व स्नेहाचे सिलसिल्यांनी तमाम सरदार हिंद व दक्षणचे आपले कुदरतीचे हुकुमाप्रमाणें मजबूत असोन, बलकी दिवसों दिवस विशेशात्कार घडावा. याजकरितां हेंहि आहे जे, नजरसूद बेहबूद उमुराद सरकारइंग्रेजबाहादुरांचे जे जरूर पडेल त्यास ढील करितां येत नाहीं. व दरबाब मुकरर करणें शिरस्ते हिफाजत मुलूक सरकारइंग्रेजबाहादुरांचे प्राप्त जाले, त्यास महकूप करणें होऊं सकत नाहीं. याजकरितां जो नक्षा सदरीं लिहिला गेला यांतच फायदा लक्षांत आला. याविरहित लाटसाहेबांचे चित्तांत दुसरें आणीक कांहीं नाहीं. जेव्हां राजेसाहेब गौर फर्मावितील कीं, बायेसना किंवा ऐसें नारजावंदी ? रजावंदी आमचे दरबाब करार पावणें. नक्षा शराकत व हिफाजत दौहि दौलतीची कीं बहुतवेळां ख्यायेश आंग्रजाचे सरकारांतून जाली होती. करार पावणें या बंदोबस्ताची बहूत दिवसांपासून लाजिम होती. परंतु यांस खातर खुद्द व दौलतचे तहामुनवत व वकूफ राहिला होता. येकीन, जाणतील कीं लाटसाहेबांसी सिर्फ नाइकजीचे हे मसल्हत कबूल केली. तहकीक आहे जे, आंग्रेजीं जमियत भोपाळचे जिल्ह्यांत राहिल्यानें पेंढारी यांचे खारीज होणें या मुलखांतून व हिफाजत मुलूख राजेसाहेबांची बेखलश होईल व राजेसाहेबांचे सरकारांत बहुत फायेदा मालुम होत आहे. आंग्रेजांचे बाह्यात्कार राजेसाहेबांचा इरादा भोपाळचे मुलकावर होता, तो या नक्षामुळे हरकतीस पावला. त्यास, सरकार आंग्रेजांस या सबबाची लाचारी असे. त्यास राजेसाहेबांनी येकिन समजावें कीं, लाटसाहेब बेशक तरकीचे च्याहणार या रियासतीचे व दवलतीचे आहेत. बाकी, राजेसाहेबांस याचा तपसील दरयात्फ करावयाचा व जबाब देणें यांचें जें मंजूर असेल त्यासीं ज्या वेळेस हुकूम होईल त्या वेळेस हजर होईन व मुखलिसानें या मोकदम्याचा जबाब काय ल्याहावा हें उत्तर जलद व्हावें.

आपल्या वतनाचा करीना सांगितला त्यावरून स्वामीने आपणास हुजूर बोलाविले, वर्तमान साकल्य विचारिले. त्यास, आपण बुनादीपासून आपले वतनाचें वर्तमान व कागदपत्र तमाम दाखविले. त्यावरून राजश्री पती व सभानाईकीं मनास आणून हा वतनदार खरा, परतु बेतकवी, यासी हर कोणाचा आधार जाहालियावेगळा हा सावरेना, ऐसें सभानाईक बोलिले त्यास आपण बोलिलों जे, आपले पदरी एका दिवसाचें खावयास नाहीं, उगेच मरावें याकरिता वडिलाचे कागदपत्र आपणापासी आहेती ते घेऊन, दरबारास जाऊन, कोण्ही त-ही वतनास वा आपणास धणी जाहाला तरी वाचोन. नाहीं तरी आपले प्रालब्धी असेल तें होईल. ऐसें आपले बोलणे सभानाइकीं ऐकिलें. मग सभानाईक बोलिले जे- वतनदार खरा, कोणे गोष्टीस खता नाही मग सभानाईक व कासीराम कुलकर्णी, मौजे काभेरी , यानीं विचार करून राजश्री रामचद्र नीळकठ यांसी बोलिले जे, स्वामीने या गोष्टीस मन घालून निमे देसकुळकरण व गावकुळकरण व ज्योतिष ऐसे द्यावे ऐसा तह जाहाला गावकुळकर्ण देहाय १८ पैकी वजाः-

रामाजी अनंत व नरहरी अनंत व गोपाळ अनंत ठकार वशिष्ठ गोत्री यासी गावकुळकर्ण व ज्योतिष, मौजे दरुण, पा। मजकूर.
कासीराम अंगापूरकर खुर्द कुळकर्णी, मौजे काभेरी, किल्ले परळी, यासी गांवकुळकर्ण व ज्योतिष, मौजे विसापूर, पा। मजकूर.

बारी गावकुळकर्णे व ज्योतिषें खेरीज जोतीस मौजा कुरोळी देहाय १६ बितपशील-

मौजे नेर मौजे नायगाव मौजे अंभेरी
मौजे कोकराळ मौजे रामेश्वर मौजे दरजाय
मौजे पळसगाऊ मौजे येलनारवाडी मौजे उबरमळई
मौजे दव्हवडी मौजे बनपुरी मौजे कुरोळी खेरीज
ज्योतिष
मौजे पुसेगाऊ मौजे कोट उर्वी मौजे भोसरे
मौजे वडूर

एकूण देहाय १६, गावकुळकर्णे व ज्योतिषें पधरा व देशकुळकर्ण पा। मजकूर, हे निमे आपले सतोषे देतो आपली पाठी व साहेता पुरवावी. जे जे वेळेस जैसा प्रसंग पडेल तैसा आपण जीवानसी उभा. आणि स्वामीनें सर्वस्वे वित्तदतेसी आपली पाठी पुरवावी. ऐसे कृष्णाजी बुलगो, व मल्हार बुलगो, व गोमाजी बुलगो, व बाबाजी शिवदेव, व राधो शिवदेव, व मल्हार शिवदेव व समस्त पांच थोर ऋग्वेदी बोलिले हे गोष्टीस राजश्री रामचंद्र नीळकंठ यानीं मान्य केलें जे, तुह्मांस पांच पोर देशकुळकर्णी व गांवकुळकर्णी व ज्योतिषी ऋग्वेदी, पा। मजकूर, हे आपण पदरीं घेतले, आजीपासून हे आपले भाऊ, यानीं व आपण अथर्वण मजकूर देवमुखें व गोतमुखें व दामशाही मिराशीदार यांच्या विद्यमानें मारून काहाडावे, सदर्हू निमें वतन खावें, वडीलपण कृष्णाजी बुलगो व मल्हार बुलगो व बावाजी शिवदेव, व राघो शिवदेव यांसीं आधीं तश्रीफ व पानें, त्यामाघें रामचंद्र नीळकंठ यांनीं घ्यावी. बाजे हक्क, लाजिमा, सेव, धार व राबिता माहार दो ठायीं घ्यावें. हक्क जुने व नवे जें उत्पन्न होईल तें दो ठायीं खावें. यासी जो कोण्ही चुकेल त्यास श्री कृष्णवेणी साक्ष व वडिलाचे आण असे ; व मात्रागमनाचें पाप असे, व काशीस गाईब्राह्मणवध केलियाचें पाप असे. हे नेमपत्र सही.

पत्रांक ३१६

श्री १७३६ आश्विन शुद्ध १

राजश्री नारायणराव गोसावी यांसीः-


अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. दारकूजीनाईक गायकवाड यांणीं सरकारांत विनंती केली कीं, मौजे पिंपळगांव सराई, पा। देउळघांट, वे मौजे आनंद, पा। जाफराबाज, व मौजे रुईखेड, पा। चांडोल, हे तीन्हीं गांव माझे पाटीलकीचे आहेत. या गांवांपैकीं, देउळघाट व जाफराबाद या दोहों महालांची वांटणी गांवगन्ना जागीरदार मोकासदार, सरदेशमुख बाबते वगैरेची जाली. त्या वांटणींत दों माहालचे गांव जागीरदारांचे हिशांत लागले. एक रुइखेड, मात्र, सामलांतींत आहे. त्यास, हरदो गांवास जागीरदारांचा मनस्वी उपसर्ग लागतो. कौल एके रीतीनें द्यावा आणि वर्तणूक मनास येईल तैसी करावी! या चालीचे पोटांत रयेतीचे व आमचे घरांत वसीयेत राहिली नाहीं. रुईखेड तो जुमल्यांत! तेव्हां तेथें सर्वत्रांचाच उपसर्ग होतो. याजमुळें नांदणूक न होतां, गांव खराबींत आले आहेत. वृत्तीचा विशय, तेव्हां गांवचा बंदोबस्त असावा, यास्तव हे तीन्ही गांव मल्हार रेणूराव यांचे चिरंजीवानीं राजश्री राणे गोविंदबक्ष यासीं बोलून गांवचा इस्तावा सांत सालां करून, करार करावा आणि बंदोबस्त करून घ्यावा. बलकी, आपले आंगीं लाऊन घेतल्यासारखें करावें, ऐसें जाल्यास गांव आबादीस येऊन वसायेत होईल व जागीरदाराचा वगैरे उपसर्ग लागणार नाहीं. इस्ताव्याप्रमाणें सरभरा आह्मी त्याची करूं. कारण, घांटमाथां अंमल राजश्री पंतप्रधान यांजकडील. तेव्हां मल्हार रेणूराव यांचे चिरंजीवास राजश्री सदाशीवपंतभाऊ यांणीं सांगितलें असतां, तेहि करून घेतील, ऐसें नाईकमजकुरांनी योजिलें आहे. याजवरून हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. व येविसींचा तपसिल राजश्री सदाशीव बापूजी व गंग्या तूपकर यांसीं लिहिला आहे. त्याप्रमाणें ते तुह्मांस समजावितील. तो समजून घ्यावा. व भाऊंसही पत्र लिहिलें आहे तेहि पावतें करून, उभयतांचे सांगितल्याप्रमाणें तुह्मींहि बोलून, ज्यांत यांचे गांवचा बंदोबस्त घडे तें करावें. नाईकमजकूर यांचे अगत्य सरकारांत किती, हे तुह्मांसहि माहीत व या करण्यांनीं यांचे गावचा बंदोबस्त होत आहे व कांहीं कोण्हाचे आंगावरहि बाबत पडत नाहीं. ज्याचा पैसा तोच देत आहे हें समजोन, तुह्मीं राजश्री सदाशीवपंतभाऊ याजकडून मल्हार रेणूराव यांचें चिरंजीवास सांगऊन, सदरहू लिहिल्याप्रमाणें यांचे गांवचा बंदोबस्त करून देवावा. रा। छ ११ माहे रमजान * दारकूजीची अगत्या येथें. तेव्हां राजश्री भाऊंस अगत्य सहाजच आहे, व नुकसानीचीहि गोष्ट नाहीं, व तेथील केल्यानीं हा बंदोबस्त घडेल, ऐसें समजोन लिहिलें आहे. तर लिहिल्या प्रो। चित्त पुरवून, बंदोबस्त जरूर करून घ्यावा. बहुत काय लिहिणे. हे विनंती. मोर्तबसुद. पो छ २९ सवाल, आश्वीन शुद्ध १ भृगुवार, शके १७३६

पत्रांक ३१५

श्री लक्ष्मीकांत १७३६ वैशाख शुद्ध १५

पु।। राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-

दंडवत विनंती उपरी. कारभारी इकडील विसीं फारच कळमळ ठेऊन आहेत. त्यास, त्यांचा येथून संतोष करावा, हें मनांत आहे. त्यास, ही दौलत त्यांणीं आपली मोजावी आणि ज्यावेळेस जसा त्याचा इशारा येत जाईल त्याच रीतीनें येथूनहि करण्यांत येईल, हेंच पाहणें येथील आहे. यांत गुंता नाहीं, ही खातरजमा त्यांणीं आपली पक्की ठेऊन, जितकें उचित व चांगले तितकें या दौलतीविसीं जातीनें पाहत जावें. येविसींचे मजकुराची आज्ञा राजश्री नारायण यशवंत यांसीं केली आहे. ते तुह्मांस लिहितील, त्याजवरून कळेल. रा। छ ४ माहे जमादिलावल. हे विनंती. मोर्तब सुद.
पो छ १३ जा।वल, सन अर्षा अशर, शके १७३६ वैशाखमास. मु।। पुणें.

पत्रांक ३१४

श्री.

अजम फ्रान्सिस्क आंतोन दावीयोग काबराल गोवर्णदोर कपतान जनराल रुस्तुमुल्मुल्क सरफराजुद्दौले मुस्तकीम जंग बहादूर बंदर गोवा दाममोहोबतहूः--

शाहामत आवाली-मर्तबत व हशमत-मंजलत मवाकत दस्तगाहा–एतजादा दोस्तां आजज्यानीव दौलतराव शिंदे सलाम आंकी: येथील खैरखुषी जाणोन आपली खैरखुषी कलमी करीत जावी. दीगर: तुह्मीं पत्र पाठविलें तें मेजर फिलोस यांचे मार्फातीनें पालखी व किताब-मरातब वगैरै बादशाही वस्त्रांसुद्धां कृपा करून पाठविलें तें पावोन परम संतोष पावलों, म्हणोन लिहिलें तें कळलें, मेजर-मजकूर यांस किताबत करून पाठविली तीहि ध्यानास आली. खाजगत सरकारांत बंदुका-चकमकी, फिरंगी-विलायतीची दरकार आहे. यास्तव, तुमचे येथें विलायतेहून आल्या असतील त्या पाठविणें. हजार बंदुका, चांगली कीळकांटा-तोखतान–सुद्धां, तयार करवून, चौल-बंदर येथें पाठवून द्यावा. त्याची किंमत सर्व सरंजामासुद्धा होईल त्याचा आकार व चौलपर्यंतचा खर्च लिहून पाठवावा. त्याप्रमाणें ऐवज येथून मिंगेल खलीमसोज फिरंगी ममईकर याचें विद्यमानें पावता होईल. वरकड मजकूर मिंगेल-सोज लिहितील त्याजवरून कळेल.

पत्रांक ३१३

श्री १७३३

यादी ४८३०० रु।।

पौ वजाः रघोजी भोसले सेनासाहेबसुभा यांजकडेस सन तिसातिसैनापासून अमल होता. ते समई वहिवाटीस आकार जाला नसतां बेरजा लाऊन भरती केली. त्या बेरजेचा महाल अगर इतलाख ऐवज घ्यावयाचा. त्याचें कलम फडशा होण्याकरितां आलाहिदा लि।।. ते रु।। १९८५४॥।..॥• बाकी सरकारअन्वयाचे आकाराची बेरीज दरसाल रु २८४४५ 6-॥.. पो सन इसन्नेअशरमयातैनांत भरसालचा आकार जाला म्हणोन.........बाबूराव
(* हा जोत्याजी टिळेकराचा मुलगा.)
यांणीं समजाविलें. ती बेरीज २९६६९. पौ वजा वहिवाटीस खर्च लि।। आहे त्या प्रों १८९०३ रु।। बाकी ९६७७।।-- .।.
ता।
बा। गु।।
रसद
खासगी

पौ सालमजकुरीं माहालीं पेंढरीयांचा वगैरे दंगा जाला, म्हणोन समजाविलें. सा। वजा रु।। तकुब. हुंडणावळ महालीं दंगा वगैरे सा।.