Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

माझे मनांत आतां कलिषता नाहीं असें हजरतीनीं फरमाविलें असतां काल राजाजीयास मजकडे आणखी शोध घेण्यास्तव पाठविले हेंच आश्चर्य वाटलें, कारण हजरतीची खातरजमा केली असतां त्याजवेगळ आणखी पृथक् पृथक् कोणकोणाची वेगळी खातरजमा करीत बसावें ! निश्चय कोणता मानावा? माझे बोलण्यांत फरक पडावयाचा नाहीं, कोणाशींही बोललों तरी एकच बोलणें, हजरतीनीं आपले करारांत अंतर येऊं न द्यावें, तसेंच श्रीमंतांकडून उभयपक्षीचा संतोष राहून जी दौलतखाही होईल ती आह्मी करावी हें आमचें काम, आमचे बोलण्याची पत राखणें हजरतीकडे, खरड्याचे जवाबसवालांत सरबुलंदजंग व मुनसीजी हीषरिक आहेत, मीरअलम बहाद्दूर व राजे रेणूरावजी तर श्रीमंतांपाशीं होते, यांनी सर्व फर्दा पाहिल्या आहेत, वाकफही आहेत, जशी मी हजरतीची दौलतखाही करीन असें ह्मणतों, तशीच सर्वांनीं श्रीमंतांची दौलतखाही असेल ती करावी, दोहीं दौलतीची बेहबूद असेल तीच सलाह एकवाक्यतेनें हजरतीस द्यावी, हजरतीनीं एकवाक्यतेनें नेक सलाह पुसावी, ह्मणजे यांत हुस्नकुमेह कोणती आहे ती ध्यानांत येईल, पृथक् एकएकानें येऊन हजरतीस अर्ज केला ह्मणजे चवघांच्या चार गोष्टी मनांत येऊन विचार पडतो, बुद्धीचा निश्चय होत नाहीं, आपले आपले अकलेमाफक दौलतखाहीनें बोलतों ह्मणोन अर्ज करितात, परंतु चौघांचें चहूं प्रकारचें बोलणें पडतें, कोणाचे बोलण्यावर अम्मल करावा हा विचार पडतो, चौघांनी चार चाली सांगितल्या, तितक्या करूं लागल्यास व्यत्यय पडूं लागतो, कारण मतलब एक असतो, विचार चहू प्रकारचे होतात, असें झालियावर एकही गोष्ट सिद्ध होत नाहीं. मार्ग निघत नाहीं, बुद्धीस स्थिरता रहात नाहीं, तेव्हां कार्याचा नाश, यास्तव मर्जीबहरम व्हावयाजोगी यांनीं पृथक् सलाह देऊं नये, हजरतीनीं ऐकूं नये, इतकें बोलावयाचें कारण श्रीमंतांचे व हजरतीचे दौलतीची बेहबूद असून ऐक्यता असावी, यांत सर्व दौलतीवर दाब आहे, हजरतीचे हे नौकर खानाजाद आहेत, यासही खावंदाचे कल्याणाचीच इच्छा आहे, बुद्धिमंत समंजस आहेत, जे नेक तेच सलाह देतील, ज्यांत परिणाम नीट, दोहीं दौलतीची बेहबूद तो निश्चय हजरतीनीं करून क्रम चालवावा. याजवर नवाब बोलिले, तुह्मी सांगतां हें प्रमाण, असेंच घडेल. नंतर असफज्याह वेळेची कथा सांगितली कीं, आपले जे आषखास लोक आहेत. त्यांस घेऊन मसलहत पुसून त्यांतील सारांश समजून आपल्या कर्तृत्वाचा परिणाम पाहून जें नेक तें करीत असावें. मी बोलिलों जे, दौलतदार यांच्या चाली अशाच आहेत, यांत व्यत्यय पडला ह्मणजे दौलतीस नक बसते, मुख्य गोष्ट आपलें करण्यास दोष न लागावा ऐसें मनन असल्या वर परिणामही चांगलाच आहे. याप्रमाणें सर्वांस समेटून मार्गाची गोष्ट ती बोलोन सर्वांनाही रुकार दिला. नंतर अलीज्याहाप्रकरणीं सरकांरांत पत्रें पाठवावीं हा मजकूर नवाबाचे बोलण्यांत आला. त्याचा तपशील अलाहिदा लिहिला असे. र।। छ ६ मोहरम. हे विज्ञापना.