Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२२४]                                                                               श्री.                                                                   २० आक्टोबर १७९५.

विनंति विज्ञापना. सरकारी जाबसालं करार बमोजीब नवाबाकडून उगवणें येविषयीं नबाबानीं सांगितलें कीं तुह्मीं व राजानीं बसोन एकएक जाबसाल ठरवावा. त्यावरून छ २९ र।।वलीं नबाबाचे दिवाणखान्यांत नेमाप्रों। आह्मीं जाऊन राजाजी रघोत्तमरावसुद्धां बैठक अस्तमानपर्यंत झाली. त्यांत सरकारचे तालुक्यापैकीं बरदापूर वगैरे वकलातीचे माविजा तालुका द्यावा. हे व सुभे बेदर येथील स्वराज्याचा अम्मल कराराप्रों। सन १२०४ पावेतों कमावीसदारांच्या बाक्याचा फडच्या व सालबसाल माहलीं स्वराज्याचा अम्मल फसलीचे फसलींस परवानगीचा उजूर नं करितां कैलासवासी माधवराव साहेब यांचे कारकीर्दीप्रों। फडच्या करीत जाण्याविषयीं जागीरदार व आमील जमीदारास इनायतनामे द्यावे, व सुभे वराडचा कच्चे आकाराप्रों। फैसल्ला होत लावा. तसेंच औरंगाबादेपैकीं कितेक माहलीं अम्मल सुरळीत येत नाहीं, तो कच्चे वहिवाटीनें फैसल्ला करीत जावा. इत्यादिक रकमा करारांतील याची भवति न भवति जाली. इनायतनामे यांचे मसविदे द्यावे, ह्मणजे नवाबास समजावून परवानगी घेऊं हें राजाजीचें बोलणें. त्यावरून बेदर, वराड व आदवनी व अवरंगाबाद हे तीन चार मसविदे कराराअन्वयें पारसी करून दिले. राजाजीशीं बोलिलों कीं तुह्मीं हजरतीस विचारून याचे जबाब सत्वर कळावे कीं त्याप्रों। सरकारांत आह्मांस विनंति लिहून, मसोदेही पाठऊन, तेथून ठरून, खचित आज्ञा आल्यावर इनायतनामे त्याप्रों। द्यावे, ऐसें जालें. मसविदे तीन चार दिवस राजे राजाजीस स्मरण देण्याचीही सूचना करविली कीं, मसविदे नबाबास दाखविले असतील, उत्तर काय जालें. आज उद्यां याप्रों। टाळा देत आले. त्यास नबाबाची परवानगी तुह्मीं राजाजी बसोन ठरवावें, ऐशी जाली असतां, हालीवाल्या देतात याचें कारण काय ? यावे बारीक रीतीनें शोध मनास आणितां समजण्यांत आलें कीं, यादवराव मोरेश्वर यांचा भाचा बाबाराव ह्मणोन पुण्यांत आहे. त्याचें पत्र सर बुलंदजंग यांचे मार्फतीनें नबाबाकडे आलें. त्यांत त्यानें लिहिलें कीं, हजूरचे व श्रीमंताचे सरकारचे जाबसाल काय आहेत त्याचा तपशील मजकडे लिहिला यावा, ह्मणजे येथें त्यांजकडून कलमांत कमदोष ठराव कोणे त-हेचा व काय होऊन येतो हें ध्यानास आणावें, तोंपर्यंत इकडे आज उद्यां याप्रों। दिवस घालवावे. त्याजकडून येण्यावर प्रतीक्षा. हें ध्यान दिसतें. यास्तव जाबसाल प्रकरणीं टाळावा व दिवसगत होत आहे असें वाटतें. बाबाराव यांनीं सरकारांत विनंति केली असल्यास काय असेल तें ध्यानांत आलेंच असेल. हें वर्तमान समजलें ह्मणून जाबसालाविषयीं टुमणी लावण्यास आह्मीं याशीं आळस करीतच नाहीं. जाबसाल कसे कसे करितात त्यावरून ध्यान समजेल तसें लिहिण्यांत येईल. र।। छ ६ माहे र।।खर. हे विज्ञापना.