[८६]                                                                               श्री.                                                                            २३ जुलै १७९५.

विनंति विज्ञापना. सजावरुदौला किल्लेदार उदगीरकर जमीयतसुद्धां अलिजाह यांस जाऊन मिळाला; ऐसें एक वर्तमान नबाबाकडे आल्यावरून, त्यांचेंहि वकिलीचें काम दिनकरराव यांजकडे, तो सदाशिवरड्डी पाशीं, सबब त्याचें हातचें हेंहि जाहलें असेल ऐसें मनांत येऊन दिनकरराव यांचे घरीं चौकी एक दिवस बसली. त्याजवर सजावरुदौल्याची अर्जी आली कीं, उदगीरचे किल्ल्यांत मी आहें, शिबंदी थोडी, किल्ला खालीं करून देतों, ऐशीं साहेबजादे यांचीं पत्रें येतात, याविषयीं काय इर्षाद ? हें पत्र आल्यावरून सजावरुदौला अद्याप तेथें गेला नाहीं, हें तहकीक होऊन दिनकरराव यांचे घरची चौकी उठविली. परंतु सजावरुदौलाचा संशय खास आहे. पदमसिंग कवलासवाला याची अर्जी नवाबास आली. त्यांत त्यानें लिहिलें आहे कीं, साहेबजाद्याकडून चार भलें मनुष्य व पत्र आलें कीं कवलासचा किल्ला खालीं करणें व जमीयत घेऊन येणें व पैका कांहीं पाठविणें, याचा जबाब मी सांगून पाठविला की जमीयत व पैका बंदगानअल्लीचे हुकमाशिवाय कसा येईल, किल्ल्याची दरखास्त केल्यास दारू व गोळा मजपाशीं हजर आहे, ऐसा जवाब गेला, हजरतीकडून इर्षाद येईल तसें करीन. याप्रमाणें अर्जीं पाहून नवाबास संतोष झाला. पदमसिंग यांची तारीफहि केली. खातरजमेचा इनायतनामा तयार करून रवाना करविला. जगत्पाल व वालगोंडा व कोपरकुंडा व कल्याण व आंवसें वगैरे किल्लेदारांच्या अर्ज्या नवाबाकडे आल्या कीं, किल्ल्यांत शिबंदी थोडी व शिबंदीचे तलबेचाही गवगवा, गल्ला, बारुद, गोळा सामान सरंजाम कमी, साहेबजाद्याकडून पत्रें येतात, यांस काय हुकूम. या अन्वयें अर्ज्या आल्या व येतात. कांहीं कांहीं किल्लेदार यांचे शिलशिले ऐसेंहि ऐकण्यांत येतें. काय असेल तें असो. होईल त्याप्रमाणें विनंति लिहिण्यांत येईल. रवाना छ ६ मेहरम. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries