[६७]                                                                                श्री.                                                                       १७ जुलै १७९५.                                                       
विनंति विज्ञापना. अलीज्याहा बहादूर यांनीं बेदरचा किल्ला घेतला. शिद्दी अबदुलाखान याजवर छापा घालून लोक मारिले. व खानमजकूरही ठार झाले, ह्मणून पेशजीं येथें वर्तमान आल्याचा मजकूर विनंति पत्रीं लिहिण्यांत आला आहे. त्याजवरून ध्यानास आलें असेल. तदनंतर दुसरें वर्तमान आलें कीं, किल्ला घेतला नाहीं. त्याजवरून येथून कुतबुद्दीखान फराषखान्याचे दरोगे यास किल्लेदारीचें काम करार करून शें दोनशें स्वार बारयाची जमयत मुकरार करून देऊन येथून रवानगी केली. ते बाहेर जाऊन उतरले. पुढें जलदीनें कूच करून जावें असा नेम हवा. मध्यवर्ती मागती वर्तमान आलें कीं, अलीज्याहाबहादूर ज्यालकलनजीक उतरले होते. तेथून वेदरचा किल्ला चार कोस. बहादूर मवसूफ यानीं किल्लेदाराकडे सांगून पाठविलें कीं, आह्मी बंदगानअलीचे ज्येष्ठ पुत्र, दौलतीचा अधिकार आह्मांकडे, असें असतां तुह्मीं अमुल हुकमी करून बेदरचा किल्ला देत नाहींत हें ठीक नाहीं. याचें उत्तर किल्लेदाराकडून आलें कीं आपण एकले थोडके जमयतनशीं आल्यास मकान देतों. त्याजवरून बहादूर मवसूफ किल्ल्यानजीक थोडके जमयतनशीं गेले. किल्लेदारानें दरवाजा उघडून यास आंत घेतलें, आणि दरवाजे बंद केले. याप्रमाणेंही वर्तमान आलें.परंतु वास्तविक वर्तमान समजण्यांत आलें त्याचा तपशील. एक मनुष्य बेदरचा राहणार येथें कोणी एक गृहस्थापाशीं चाकरीस आहे, तो आपल्या घरास गेला होता. त्याचे जबानी कीं, अलीज्याहाबहादूर छ २२ जिल्हेज रोज शुक्रवारीं किल्ल्याचे दरवाजानजीक गेले. किल्लेदारानें दरवाजे उघडावयास अनमा केला. तेसमयीं जमीदार व रयत लोक जमा झाले. यांनीं किल्लेदारास सांगितलें कीं, हे तक्ताची, त्यांत नवाबाचे ज्येष्ठ पुत्र दैालतीचे धनी खुद्द आले असतां तुह्मीं याशीं विन्मुखं होता, त्यास तुह्मीं चिठ्ठीचे चाकर, आह्मीं वतनदार, आह्मांस. दुसरी गोष्ट सांगतां येत नाहीं, ईश्वरसत्तेकरून याचा अम्मल फैला प्रांतांत झाल्यानंतर आह्मांस कच्चेबच्चेसुद्धां जबे करून बेवतन करितील. याजकरितां आह्मीं दरवाजे, उघडितों. तेव्हां किल्लेदार लाचार, कांहीं एक शिबंदीचा भेद हेाता, सबब दरवाजे उघडले. अलीज्याहा बहाद्दूर किल्लेदाखल होऊन मुलतानीसाहेब याचे दरग्यांत जाऊन तवाफ करून साखरा वांटल्या. उपरांतिक बाले किल्ल्यांत गेले. मोगलअली हुमाउज्याहा तेथें अटकेंत होते त्यांस बाहेर काढिलें. उभयतांची भेट झाली. फारच सद्गद होऊन, त्यांचा खुलासा केला. पेशजीं मोगलअल्ली किल्ल्यास नेले तेसमयीं अलीज्याहा बहाद्दूर यांनीं नवाबास अर्जी केली होती कीं, हे बेतकसीर आहेत. इतकें लिहावयाचें कारण अलीज्याहा बहाद्दूर यांची कन्या मोगलअल्ली याचे पुत्रास दिली आहे. आणि पहिलेपासून तर्फेनें प्रेमा विशेष; परंतु दौलाचा कदम दरम्यान होता ह्मणून अलीज्याहा बहाद्दूर यांची गोष्ट पेषरफ्त झाली नाहीं. ते हल्लीं घडली. याजमुळें परस्परें प्रेमयुक्त भेटणें बोलणें झालें. इतका प्रसंग माणसानें आपले दृष्टीनें पाहून, छ २५ रोजीं सोमवारीं येथें येऊन आह्मांस वर्तमान सांगितलें. मागाहून नवाबाचें येथेंही वर्तमान आलें. त्याजवरून कुतबुद्दीखान नवे किल्लेदार होऊन जात होते. ते सोमवारीं रात्रीं माघारें गांवांत फिरून आले. येथें तहकीकं वर्तमान येत नाहीं. जे बातनीस जातात, त्यांस तेथें कैद करितात. आजपावेतों येथील वीस जोड्या तेथें कैद आहेत. जागा जागा चौक्या पहारे. तालुका सदाशिव रड्डीचा, याजमुळें बंदोबस्त अधिक. पेशजीं येथून खुषरकमखान अलीज्याहा बहाद्दूर याचे वस्ताद व दिनकरराव रड्डी मजकूर याचा वकील यांसही शिष्टाई करावयास पाठविलें होतें. त्यांस तेथेंच ठेवून घेतलें. निरोप माघारे येण्याविषयी देंत नाहींत, ह्मणून उभयतांचें पत्र आलें. र।। छ २२ जिल्हेज. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries