मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

गोपाळराव नळेगांवकर याणी                                                      लेखांक १००.                                                         १७१४ पौष वद्य १२.
गोविंदराव यांचे पत्र आपले कार्याकरितां
घेऊन पा होते त्याचे उत्तर गोविंदराव
याचे जुजांत लिा आहे व रावमजकूर
याचे पत्राचा जाब रा छ २५ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पाऊन मार समजला सजावरुदौला फौजेसुधा माठीचे गढीचे बंदोबस्ताकरितां नळेगांवानजीक आहेत त्यास न जाणो दगा करतील याजकरितां नवाब अजममुलउमराबाहादूर यांसी बोलून त्याचे पत्र दौलास यावे की नळेगावचे नाव न घ्यावे ह्मणोन लिहिले त्यास दौला एथील आज्ञे प्रो फौजसुधां तिकडे आहेत नळेगावास उपद्रव कसा करतील आज आपणहून बाहादूरमार यांस स्मरण करून पत्र मागणे हे ठीक नाही त्यास हरएक प्रकारें बोलून बाहादूरमार यांचे पत्र घेऊन पाठविण्यात येईल येविसी आह्मासहि आगत्य आहेच तुह्मीं ल्याहावेंसे नाही रा छ २५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries