मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

आबाजीपंत फडके यांचे पत्राचा                                                       लेखांक ९९.                                                         १७१४ पौष वद्य १२.
जाब रा छ २५ जावल सन १२०२.

राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री आबाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी पत्र पा तें पाऊन मजकूर समजला मौजे आवराप एथील मुलाणा व येलम मौजे किटे पा कल्याण याणी कांहीं जमयेत करून किट्यास जाऊन तेथील मखदूम पाटील यास जीवें मारून आले हें वर्तमान आह्मास कांही ठाऊक नाही समजल्यानंतर मुलाणा याचे घरी त्यास धरावयास पाठविलें तो मुलाणा पळोन गेला हाती लागला नाही एक येलम व दोन व दोन तीन चाकरमाणसें हाती लागलीं त्यास धरून कैद केले आहे हें वर्तमान मीर सियादतअलीखान अमील पा कल्याण यांस समजल्यानंतर त्याणी आह्मास पत्र लिहिले की आसाम्यास पाठऊन द्यावें प्रथम आह्मी थाक लागूं दिल्हा नाही दुस-याने पत्र आलें तेव्हां ऐलमास त्यांचे हाती दिल्हे बाकी असाम्या कैदेत आहेत त्या मागतात त्यास असाम्या न दिल्या तर गांवावर व पेठेवर हांगामा करणार एक पेठेस धका बसल्या बाजार मोडतो त्यास येविसीं जसी आज्ञा येईल तसें करीन ह्मणोन लिहिलें त्यास तीन आसाम्या कैदेंत आहेत त्या मीरमजकूर यांचे हवाली करून तुमचे पत्र सियादतअलीखान बाहादूर यांजपासी आसाम्या आह्मांपासी आहेत जे वेळेस मागाल ते वेळेस पाठऊन देऊ ह्मणोन आहे ते माघारें हे पत्र घेऊन तीन आसाम्या मीरमवसूफ यांचे हवाली करून रसीद घ्यावी व एथून नवाब मुमताजउलउमरा बाहादूर यांचे मोठे मोहरेचा कौल गांवास व पेठेस व बेपारी वगैरेस घेतला तो व एक पत्र मीरसियादतअलीखान अमील पा कल्याण यांचे नावे नवाब-मवसुफ यांचे तुमचे हरएकविसी साहित्य करण्याकरितां व कौल देण्याविसी वगैरे एकूण दोन पत्रें पा आहेत पावतील पावलि याचे उत्तर पाठवावें र॥ छ २५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries