मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

त्रिमलराव सुरापूरकर यांस पत्रे                                                  लेखांक २४४.                                                      १७१५ वैशाख वद्य २.
छ १६ सवाली पांडुरंग रघुनाथ
यानी मागितल्यावरून.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिमलराव स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावे विशेष मौजे बरूल पा नलदुर्ग एथील पाटीलकी राजश्री विठ्ठल रघुनाथ यांची आहे त्यास पाटीलकीसमंधे आंबराई मौजेमारी आहे ते जप्तीत आली ह्मणोन कळले त्यावरून हा मजकूर महमदकबीरखान यांसी बोलण्यात आला त्यानी सिवशंकरपंत यांस सांगितले त्यानी तुह्मास पत्रें लेहून दिल्हे ते रवाना केले असे त्यास विठल रघुनाथ हे आमचे पदरचे पाटीलकी आह्माकडील हें समजोन वतनबाबेचा हकलवाजिमा पूर्ववत व आंब्याची झाडे आंबराई चालवावी यास दिकत होऊ नये रा छ १६ बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries