मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २३४

१७०१ आश्विन.
मुबईकर इंग्रजास पत्र रा छ.

इजहार आंकी मुदत मुदत आं शहामतपन्हांकडील किताबत येऊन दिलखुषी होत नाहीं, तर हमेषा मोहबतनामा इबलाग करोन मसरूर करीत जावें. दिगर सरकारांतून वकील लाला सेवकराम याजला कलकत्यास रवाना केलें. व सरकारचे मदारुलमहाम यांनी खतृत गरसूल केलें. त्याचा दरजबाब कोसल कलान कलकत्तेकर यांनी निगारप केला. त्या खात्यांतील फिकरा पारसी व त्याचा तरजमा हिंदवी करून पाठविला आहे त्याजवरोन मुफसल मुषहुद होईल. व कोसल कलान कलकत्तेकर यांनी कलमी केलें आहे कीं, या बमेजिव खत अशामतपन्हांस व तेथील कोसलदारांम कलकत्त्याहून पर भारें मुंबईस इरसाल केलें आहे. येकीन कीं तें खत रसीद होऊन मतलब जाहीर झाला असेल. त्यास कविले माही दादा साहेबाबाबें व चिखली वगैरे रो फत्तेसिंगराव गायकवाड यांचे मुलखाबाबद मजकूर मरकूम केला आहे. त्याचा दर जबाब इजानेवास लिहून पाठवावा. व चिखली वगैरे मुलुख मये वसूल दुसाला सरकारचे अमलदारांचे सुपूर्द करावा. वे बमोजिम करारनामा तीन लाखांचा मुलुख आशामतपन्हां ज्यांस देवितील त्यांचे सुपूर्द सरकारांतून करविलें जाईल, दिगर मनाफ करारनामा बारा लाखांचे वसुलांत पो जंबूसरचा ऐवज देविला आहे. त्यास परगणे मजकूरची ऐवज वसूल करोन आंशाहामतपन्हांकडील लोकांचे पदरीं घालावा ह्मणोन सरकारांतून रा महादजी रामचंद्र यांजला पाठविलें आहे. मशारनिलेरा जाऊन कमकसर एक साल गुजरलें, हानोज आंशाहामतपन्हांकडील अमलदार पो मजकुरांत दाखल देत नाहीं. तर येबाबें आंशाहामतपन्हांनी आपलेकडील लोकांस निगारष करावें कीं, सरकारचा का महादजी रामचंद्र पो मजकूरचा वसूल करोन ऐवज पदरीं घालीत जाईल, त्यांची कबजें देत जाणें. याहून पेशजीं साल गुदस्तां व सालहालचा पो मजकूरचा वसून घेतला असेल त्याची रसीद देणें, म्हणोन निगारष करावें. जो करार ठरला आहे त्यास सरकारांतून तफावत होत नाहीं व आंशाहामतपन्हांकडून तफावत अमलांत न यावा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries