Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१२४]                                                                               श्री.                                                                  १८ आगस्ट १७९५.                                  
विनंति विज्ञापना. अलिजाहबहादूर यांजकडील जमीयत दोन हजार स्वार व दोन हजार पयेदल याप्रमाणें टुकडी सदाशिवपेठेस उतरून लुटून ताराज करून तेथून छ २४ मोहरम सोमवारीं दोनप्रहर रात्रीं मौजे पातरंपल्ली, सदाशिवपेठेहून चार कोस अलीकडे, तेथें जमियत नमूद झाली. गांवांत शिरून लुटीस आरंभ केला. भांडीकुंडीं नगदी व पांघुरणेंदेखील बायकांचीं वस्त्रें राहूं न देतां सर्व घेऊन कित्येक माणसें गांवांतील जखमी ठार व नाकें कानें कित्येकांचीं करून शेवटीं गांवास आग लावून मोकळें केलें. हें होऊन पिछली सहा घटिका रात्रीं रहातां रुद्रवरं, पटणचरुपलीकडे तीन कोस, येथें आले. तेथीलही प्रकार तसाच जाला. पठणचरु येथें नबाबाकडून सिताबराव दोनशें स्वार, तीनसें पयेदल जमियतसुद्धां बंदोबस्तास होता. त्यास वर्तमान,रुद्रवरं येथें जमियत पोहोंचून ताराजी भांडिली हें, समजतांच सिताबराय एकाकी पटणचरूहून निघोन शहरास पळोन आला. त्याचे तैनातीस लोक होते, त्यांस सिताबराय पळाला हें समजल्यावर, तेहि फरारी झाले. कांहीं दम धरून राहिले. छ २५ रोजीं मंगळवारीं पटणचरूवर सहा घटिका दिवसा जमीयत येऊन गांव लुटला. शेवटीं आग दिल्ही. सिताबराय अगोधरच निघून शहरास आला. मागाहून पटणचरु जाळिलें. खबर आली. दरवाजे हवेली आदीकरून शहराचा बंदोबस्त. शहराबाहेर दोन तीन कोसीं नाकेबंदी करविली. दिवसा व रात्रीस गडबड भारी जाली होती. पटणचरु लुटोन जमियत निघोन गेली. सरकारचे टप्याचे जासूद, पोतरंपल्ली, रुद्रवरं, पटणचरु येथील, या हंगाम्यांत लुटले गेले. उघडे बोडके होऊन येथें आले. त्यांस खर्चास देऊन ठेविलें. पुढें होईल ते विनंति लिहिण्यांत येईल. जासुदांस खर्चास देऊन एक जोडी टप्याचे खबरीस पाठविली होती कीं, जोड्या कोठपर्यत उठल्या. चारपांच जोड्या भागानगरापासून लुटल्या गेल्या त्या उठल्या बाकीच्या कायम आहेत. याप्रमाणें येथून जोडी पाठविली ती खबर घेऊन आली. त्यास ज्या जोड्या उठल्या त्यांस मागती टप्यावर रवाना केलें आणि हल्लींचा टपा सेवेसी लिहून पाठविला आहे. र।। छ २ सफर. हे विज्ञापना.