मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५१९

श्री.
१७२२ माघ वद्य ४

श्रीमंत राजश्री नानाजी दीक्षित यां प्रतिः-

परश्रामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम ता। माघ वा। ४ इंदुवासर जाणून सुखरूप असो. विशेष. श्रीमंत राजश्री बापू यांची लग्नाकरितां मूळचिठी आली कीं, अगत्य अगत्य यावें, असें लिा आहे. वे रा। परश्राम नाना शिंद्याच्या लष्करांत गेले होते, ते गांवास आले. भेटहि निवळहि जाली नाहीं ! आशीखहि दाहावीस ब्राह्मण गेले होते. त्यांस दक्षणा विठ्ठलपंत बापूंनीं देऊन वाटे लाविलें. असामीस दोन रुपये देऊन वाटे लाविलें. परश्रामभटासहि शेंपन्नास रु। मिळाले. रा मल्हारराव होळकर सुभेदार यांचा पुत्र समागमेंच आहे. गोट, निशाण, वेगळाच चालत असतो. लष्कर दर कुच गेलें. ब-हाण पुरापावेतों मुक्काम होत नाहीं. ++++ श्रीमंत पुणियास आले. फडक्यांचे वाड्यांत आहेत. सरकार वाड्यांत अद्यापि गल नाहींत. लष्कर गारपिरावर आहे. पुन्हां लष्करांत येणार ऐसी वदंता आहे. बाहेर स्वारी निघणार ऐसें ऐकिलियांत आलें. + ++ हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries