Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्याजवरी काहीएक दिवसी भिवजी आमचा वडिल बेदराहून थोरले सुपेयास आला. तो इकडील वर्तमान पुनाजीचे आवघेच कळले. मग भिवजीने द्वितीयसमंध केला. त्यास पुत्र दोघे फुलाजी व बाजी ऐसे जाले. आपले मुलाकतीस आले. तो भिवजी मा। तेथेच वारला. मग दादाजी कोंडदेव याचे कारकिर्दीस फुलाजी व बाजी मौजे मिडमावणे निमे ता। मा। येथें उतरले. तो सिलीमकर आवघे पळोन गेले. त्यावरी फुलाजी नाईक याणे दादाजीपंताकडे जाऊन आपले आवघे वर्तमान विदित केले जे सिलीमकर याणी माझे वडिलाचा मारा करून माझे वतन घेतले आहे, ते त्यापासून देविले पाहिजे. तेव्हां दादाजीपंतांनी सिलीमकर यास बोलाऊन आणून चौकसी केली. माहालो माहालच्या साक्षी पाहिल्या. तो सगळेच वतन हे खरे. तेव्हा दादाजीपंतानी फुलाजीस विचारिले जे, सिलिमकर व तुह्मी ऐसे निमे निमे वतन खाणे. तुमच्या वाटणी करून देतो. तेव्हा फुलाजी ह्मणाला कीं, त्यास सुईच्या आग्रावरील मृतिका देत नाही. तेव्हां दादाजीपंतानी मध्यस्त घालून फुलाजीस कितेक प्रकारचे सांगितले; परंतु फुलाजी ऐकेना. तेव्हां फुलाजीने दादाजीपंताचे न ऐकतां माघारा का। केतकवणियास आला. उपरांतिक सिलिमकर याणी दादाजीपंतास गैरवाका समजाऊन लांच दिल्हा. त्यावरून दादाजीपंती सिलिमकर याचे आगत्य धरून फुलाजीस नेऊन बासाचा मार देऊन जीवे मारिले. त्याचे प्रेत माघारे घरास हेमाजी दिघा व कालोजी फदाम घेऊन आले. तो त्याचा भाऊ बाजी याने फुलाजीचे प्रेत पाहून आपणहि आपली जीभ आसडून तोहि मेला. मग दोघाचे सार्थक सेजारीच करून बाजीचा पुत्र आबाजी चौ महिन्याचा होता, तेव्हा फुलाजीचा खानाजाद तुलाजी व मडाजी ऐसे होते त्याणी आबाजीस पळऊन ता। मोसेखोरे येथे मौजे वरसगावास नेले. मागे दादाजीपंती सिलीमकराचा पक्ष धरून आह्मी हाजीर नसता सिलीमकर याणी सांगितले त्याप्रमाणे पत्रं करून दिल्ही आणि वतन जबरदस्तीने खाऊ लागले. त्यास आबाजी वीस पंचवीस वर्षांचा होय तोपर्यंत मौजे वरस गावी तुलाजी व मडाजी खानेजाद याणे तेथे राहून पालग्रहण आबाजीचे केले. त्याजवरी आबाजी आपले उमेदीत आलियावरी ता। म॥ देशमुखी करावयास आले. तो तेव्हा सिलीमकर याचा बेटवळा फार जमला होता, वाद सांगावा तो आबाजी वाद सांगावयास एकटा व नातवानी होती, तेव्हा काही उपाय नाही. त्याजवरी सिलीमकर यास पुसिले की, आह्मास काही वतनाची वृत्ती द्यावयाची आहे किंवा नाही ? त्याजवरी सिलीमकर याणी सांगितले की तुह्मी प्रस्तुत पाच गावचा हक व मौजे विरवडी इसापत ऐसी खाऊन राहाणे. त्यास आपण सगळया वतनाचा जाबसाल पुसोन वाद सांगावा तो प्रस्तुत वाद सांगावयास समर्थ नाही. याजकरिता कामावरी नजर देऊन वतनाचा उपभोग जितका हातास आला तितका अनभऊन घेत आलो. तो इतकियांत पुढे राजक्रांत जाली. तेसमई आबाजी नाईक मौजे मोहडे खुर्द ता। हिरडसमावळ येथे भाणोसदरियांत राहिले. त्याजवरी संताजी नाईक बांदल देशमुख ता। हिरडसमावळ याणी आबाजी नाईक यास वतनाची हकिकत पुसिली. तेव्हा आबाजी नाइकानी वतनाचा मजकूर सांगितला. त्यास संताजी नाईक याणी जाबसाल केला की, तुह्मास नेऊन श्रीमंत कैलासवासी शंकराजी नारायण याजपासी नेऊन भेटविले आणि आबाजी नाईक याचे वतनाची हकीकत जाहीर केली की, ता। मा। येथील देशमुखीचे वतन आमचे सगळे असता सिलीमकर याणी मारे करून वतन घेऊन खात आहेत. त्यास साहेबी कृपाळु होऊन माझे वतन देविले पाहिजे. त्यास श्रीमंत साहेब याणी आज्ञा केली जे, तुह्मी आपल्या वतनावरी जाणे जो वतनाचा उपभोग घेत असाल तो घेणे आणि पुढे तुमचा वतनाची चौकसी पाहून चौघा गोतमते निवाडा करून तुमचे वतन तुह्मास देविले जाईल. त्याजवरी राजक्रांत निवारल्यानंतर आबाजी नाईक वीरवाडीस येऊन वतन अनभवू लागले. पुढे आबाजी नाईक याणी सगळया वतनाचा वाद सांगावा ऐसे ध्यानात आणिले, तो त्याचा काल जाहाला. तो भिकाजी नाईक याची उमर लहान होती, तेव्हा वाद दाहावीस वरीस जाला नाही, मग वाद अमृतराव याणीं उभा केला श्रीमंत कैलासवासी आनंदराव साहेब याजकडे मांडण भाडत सिलीमकरासी पुणियास गेले. तेव्हा सिलिमकर श्रीमंतापासी बोलिले की, आमचा भाऊ आह्मी आपल्या घरी समजावितो. त्यास आह्मास घरास घेऊन आले आणि महालचे पाटील जमा करून माहालो माहालचे देशमुख यास बोलाऊ गेले. आणि पंचाईत करून समजाविसी करावी तो माहालचे देशमुख याणी सांगितले त्यास अमृतराव ऐकेनात. सरकारात रागे रागे उठोन जाऊ लागले. त्यास सिलीमकर याणी गुंजणमावळचे पाटील यास मध्यस्ती घातले कीं, तुह्मी सरकारात न जाणे आता आगोटीचे दिवस आले, पाऊस लागला, पंचाईतीस महिनापंधरा दिवस लागतील. त्यास माहालो माहालचे देशमुख यास व पाटिल यास जाणियाची निकड, आगोट नजिक आली. त्याजवरी अमृतराव याणी पाटिलासी उत्तर केले की, चौ महिनीयाचा अवकाश देतो, परंतु कागद लेहून द्यावा की तुमची वतनाची समजाविसी चौ महिन्यानी पंचाईत मेळऊन करितो. त्यास सिलिमकर याणी मान्य करून कागद लेहून दिल्हा कीं, विजयादशमीस तुमचा वाद तोडून तुमचा वतनाचा औंश असेल तो देतो, ह्मणून सिक्याचा कागद लेहून दिल्हा. त्याजवरी आमचा वतनाचा उगलडा करून दिल्हा नाही. सबब आम्ही वतनाच्या जप्‍ती साहेबापासून करवित आलो. त्याजवरी हाली साहेबी कृपाळू होऊन जेजुरीच्या मुकामी सिलिमकराचा व आमचा इनसाफ गोतमतें करावयास आज्ञा केली. त्यास सिलिमकराचा व आमचा वतनाचा लढा तोडणार धणी समर्थ आहेत, हा करीणा लेहून दिल्हा सही शके १७१८ नलनाम संवत्सरे भाद्रपद शु॥ २ मु॥ जेजुरी.

छ १ रा।वल.