मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि:-ऐवज क्षेपनिक्षेप पदरीं पडे ऐसीं परभारें आणिक पत्रें जावीं, इकडे पाठवावयाचीं असतींल तें पाठवावीं. याविसीं स्वस्त असों नये. पैक्यास लांबण पडों नये ऐसें व्हावें म्हणोन लि. त्यास तनख्याचे ऐवजाची तपसिलाची याद लिहिलीच आहे, निकी बाकी.
२२० ७९० ॥ निघाली याची चिठी-रोषनराय यांचे मोहरेची, जगधन यांचे दुकानीं इ॥ छ २० जिल्हेज पासोन दोन महिन्यांत द्यावे याप्र।। खचित चिटी-आहे. तथापि तुमचे लिहिल्यावरून मागाहून आणिक ही परभारें ताकीद लिहिविण्यांत येईल. हालीं फखरुदौला नवे सुभेदार यांचे पत्र मध्यस्तास आले कीं:---सखोपंडत-रावपंतप्रधान यांजकडील-तनख्याचे ऐवजाचे वसुलास येथें आहेंत. हे खर्चास मागतात. यांस फार तसदी आहे. दोनदिवस बिलकुल यांस कांहीं मिळालें नाहीं. तिसरें हिवशीं पन्नास बैल गेल्याचे रसदेचे घेऊन नेऊन रोजमरा केला. याजबराबर जमयेतही आहे. त्यास, आज्ञा आल्यास काहीं ऐवज द्यावयास येईल. त्यावरून मध्यस्तांनीं आम्हांसीं सदरहू म।।र केला; आणि बोलले कीं:- तनख्याचें बाकीचे ऐवजाची चिठी जगधन याचे दुकानीं करून दिल्हीं त्यापक्षीं आह्मीं ऐवज कां द्यावा ? आणि ते ग्रहस्त खर्चाविन हैराण आहेत. जर तुम्हीं कांहीं यैवज देत असाल तरी आम्ही जगधन याचे दुकानींहून देवितों; नाहीं तरी जबाब साफ. लिहिलें असे, व रसीदीचीही नकल प।। आहे र॥ छ २९ मोहरम. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries