मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ शु. ७ राविवार शके १७१५

विनंति उपरि. नबाबाचे पत्राचा जबाब श्रीमंताकडून रघोतमराव यांचे विद्यमानें यांजकडें आला. तो नबाबांनीं मध्यस्त समीप असतां वाचून पाहिला. छ. ५ जिल्कादीं मध्यस्ताकडें कोन्हेरपंतास पाठऊन विचरिलें कीं “श्रीमंतांकडलि जबाब आला तो हजरतींनीं पाहिला कीं नाहीं” मध्यस्त बोलले “मी जवळ असतां पत्र अक्षरशा हर्फबहर्फ पाहिलें. त्यावरून हजरतीची मर्जी बहुत खफा जाली; आणि बोलले कीं मागती याचा जबाब राव पंत प्रधान यांस मी लिहितों” याजवर मीं अर्ज केला कीं “पुन्हां या पत्राचा जबाब लिहिण्याचें कारण नाहीं, येकवेळ पत्र लिहिलें. त्याचा जबाल तिकडून या त-हेचा आला, आतां पत्र लिहिल्यानंतर तिकडून जवाब काय येईल ? तकरारीनें तकरार वाढेल. यांत फायदा नाहीं. सबब मागतीं पत्र लिहिण्याचें मवकुफ करविलें” याप्रा मध्यस्त बोलले, रा छ, ६ जिल्काद. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries