मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.


विनंति ऐसी जे -निर्मळ वगैरे माहलबाबत तनख्याचे वसुलाकरितां सरकारांतून कारकून सखो जिवाजी अवरंगाबादेस गेल्यानंतर फकरूदौला व अजीमुदौलासी ऐवजाचें बोलणें म।।रनिलेचें जालें, याचा तपसील बजिनस त्यांचें पत्र आलें व मध्यस्ता- ........ दौलास ताकीद निक्षुण पाठवण्याचा राजश्री...... व यांनीं आज्ञेप्रमाणें लिहिल्यावरून मध्यस्ता....शवालीं सविस्तर बोलण्यांत आलें. व पत्राची नकल....दाखविली. त्यावरून मध्यस्त बोललें कीं, “ तनख्याचे ऐवजाचा फैसला मागेंच जाला असतां सुभेदारीचे बंदोबस्ताकारतां आरसा जाला. याउपरी ऐवजास गुंता नाहीं. नगदीच ऐवज पदरीं पड़े याप्र॥ जगधन साहुकाराचा दुकान तेथें आहे त्याजवर कांहीं ऐवजाची चिठी व कांहीं अजीमुदौवलाकडून फैसला करवितों. परंतु माजी अमलदाराकडून तनखापैकीं वसूल काय पावला व बाकी काय राहिली हें खचित समजलें पाहिजे. लेहून आणवावें, त्याप्र।। फैसला करून देवितों. '' त्यावरून विनंति कीं, एकंदर तनखा बाबत सरकाराचा ऐवज सुभ्याकडून येणें त्यापैकीं वसूल पोंहचला तो वजा होऊन बाकी ऐवज येणें किती याचे तपासलाची याद दप्तरांतील शोधोन इकडे रवाना करावयास आज्ञा व्हावी. र। छ. ६ जिलकाद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries