मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे–मेलगीरराव देशमुख चींच....गोलकुंडा येथें होता. त्याचें बोलणें विमलराव व्यंकटेश सुरापुरकर यांचे विद्यमानें मध्यस्तांसीं होऊन तूर्त मेलगीरराव यांचे सुटकेची परवानगी जाली. मेलगीरराव यांचे भावाच्या दोन मुली उपवर-लग्नाच्या त्यांचे लग्नास्तव सुटकेविषई अर्ज केल्यावरून मेलगीरराव बायकोसहित किल्यांतून सोडून चिंचोलीस रवाना करण्याचें ठरलें. लग्न होतांच त्यास हजर करावें, हा जिमा विमलराव यांनी करून सोडविलें. पुढें लग्न होऊन हजर करण्याचें समंई काय ठरेल त्याप्र।। विनंति लिहिण्यांत येईलः र॥ छ० ६ जिलकाद हे विनंति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries